ETV Bharat / state

सावरकरांना भीत्रा म्हटल्याने उद्धव ठाकरे यांचा राहुल गांधीवर जोरदार प्रहार

सावरकर यांना इंग्रजांनी ज्या तुरुंगात ठेवले होते. तो तुरुंग मी प्रत्यक्ष जाऊन पाहिला आहे. स्वातंत्र्यासाठी सावरकरांइतका त्याग जवाहरलाल नेहरू यांनी केला आहे का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

author img

By

Published : Apr 12, 2019, 12:46 PM IST

Updated : Apr 12, 2019, 1:07 PM IST

सांगलीच्या इस्लामपूरमध्ये महायुतीच्या विजय संकल्प सभेत बोलताना उद्धव ठाकरे

सांगली - स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भित्रा म्हणणाऱ्याला संसदेत पाठवू नका, असे आवाहन करत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. इस्लामपूरमध्ये आयोजित हातकणंगले मतदार संघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेकडून धैर्यशील माने हे निवडणूक लढवत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या विरोधात माने यांची लढत आहे. गेल्या वेळी युतीकडून लढणारे राजू शेट्टी यावेळी काँग्रेस महाआघाडीमधून निवडणूक लढवत असून त्यांच्या विरोधात युतीच्या धैर्यशील माने यांनी चांगलीच टक्कर देण्यास सुरुवात केली आहे. आज धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ सांगलीच्या इस्लामपूरमध्ये महायुतीची विजय संकल्प सभा झाली. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची या सभेला प्रमुख उपस्थिती होती. या सभेसाठी शिवसेनेचे नेते व परिवहन मंत्री दिवाकर रावते, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार शिवाजीराव नाईक, हातकणंगले मतदारसंघातील उमेदवार धैर्यशील माने यांच्यासह शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही युती केली, ती चांगली आणि जास्त मंत्री पदे द्या म्हणून नाही, तर शेतकऱ्यांसाठी आणि देशहिताचे निर्णय घेण्यासाठी. शरद पवार यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, आम्हाला शेतीतील काही कळत नाही असे म्हणता मग तुम्हाला क्रिकेटमधील काय कळत ? मी शेतकरी नेता नाही पण शेतकरी मित्र नक्की आहे, असा टोला यावेळी उध्दव ठाकरे यांनी लगावला.

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेताना ठाकरे म्हणाले, सावरकर यांना इंग्रजांनी ज्या तुरुंगात ठेवले होते. तो तुरुंग मी प्रत्यक्ष जाऊन पाहिले आहे. १४ वर्षे जी शिक्षा भोगली, त्याची माहिती आहे. स्वातंत्र्यासाठी सावरकरांइतका त्याग जवाहरलाल नेहरू यांनी केला आहे का?

स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले ,गेल्या निवडणुकीत चुकीच्या माणसाला ही जागा दिली. शेट्टी यांना पाठिंबा देणे ही माझी मोठी चूक झाली, पण आता तुम्ही माझी चूक दुरुस्त करून धैर्यशील माने यांना विजयी करा.

सांगली - स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भित्रा म्हणणाऱ्याला संसदेत पाठवू नका, असे आवाहन करत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. इस्लामपूरमध्ये आयोजित हातकणंगले मतदार संघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेकडून धैर्यशील माने हे निवडणूक लढवत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या विरोधात माने यांची लढत आहे. गेल्या वेळी युतीकडून लढणारे राजू शेट्टी यावेळी काँग्रेस महाआघाडीमधून निवडणूक लढवत असून त्यांच्या विरोधात युतीच्या धैर्यशील माने यांनी चांगलीच टक्कर देण्यास सुरुवात केली आहे. आज धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ सांगलीच्या इस्लामपूरमध्ये महायुतीची विजय संकल्प सभा झाली. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची या सभेला प्रमुख उपस्थिती होती. या सभेसाठी शिवसेनेचे नेते व परिवहन मंत्री दिवाकर रावते, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार शिवाजीराव नाईक, हातकणंगले मतदारसंघातील उमेदवार धैर्यशील माने यांच्यासह शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही युती केली, ती चांगली आणि जास्त मंत्री पदे द्या म्हणून नाही, तर शेतकऱ्यांसाठी आणि देशहिताचे निर्णय घेण्यासाठी. शरद पवार यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, आम्हाला शेतीतील काही कळत नाही असे म्हणता मग तुम्हाला क्रिकेटमधील काय कळत ? मी शेतकरी नेता नाही पण शेतकरी मित्र नक्की आहे, असा टोला यावेळी उध्दव ठाकरे यांनी लगावला.

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेताना ठाकरे म्हणाले, सावरकर यांना इंग्रजांनी ज्या तुरुंगात ठेवले होते. तो तुरुंग मी प्रत्यक्ष जाऊन पाहिले आहे. १४ वर्षे जी शिक्षा भोगली, त्याची माहिती आहे. स्वातंत्र्यासाठी सावरकरांइतका त्याग जवाहरलाल नेहरू यांनी केला आहे का?

स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले ,गेल्या निवडणुकीत चुकीच्या माणसाला ही जागा दिली. शेट्टी यांना पाठिंबा देणे ही माझी मोठी चूक झाली, पण आता तुम्ही माझी चूक दुरुस्त करून धैर्यशील माने यांना विजयी करा.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

AVBB

Feed send - File name - R_MH_1_SNG_12_APR_2019_SHIVSENA_SABHA_SARFARAJ_SANADI - R_MH_4_SNG_12_APR_2019_SHIVSENA_SABHA_SARFARAJ_SANADI


स्लग - नालायक राहुल गांधीच्या हातात सत्ता देऊ नका - उद्धव ठाकरे .

अँकर - स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भित्रा म्हणणारया नालायक,कारटयाच्या हातात सत्ता देऊ नका,असे आवाहन करत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे.तर राजू शेट्टी यांना मागील वेळेस पाठींबा दिला ही माझी चूक होती,अशी कबुली देत काँग्रेस,राष्ट्रवादीवरही तोफ डागली.इस्लामपूर मध्ये आयोजित
हातकणंगले मतदार संघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
Body:व्ही वो - सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदार संघात शिवसेनेकडून धैर्यशील माने हे निवडणूक लढवत आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या विरोधात माने यांची लढत आहे.गेल्या वेळी युतीकडून लढणारे राजू शेट्टी यावेळी काँग्रेस महाआघाडी मधून निवडणूक लढवत असून त्यांच्या विरोधात युतीच्या धैर्यशील माने यांनी चांगलीच टक्कर देण्यास सुरुवात केली आहे.आज धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ सांगलीच्या इस्लामपूर मध्ये महायुतीची विजय संकल्प सभा पार पडली.शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झालेल्या या सभेसाठी शिवसेनेचे नेते व परिवहन मंत्री दिवाकर रावते,महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत,आमदार शिवाजीराव नाईक , हातकणंगले मतदार संघातील उमेदवार धैर्यशील माने यांच्यासह शिवसेना आणि भाजपाचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बोलताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वाभिमानाचे उमेदवार राजू शेट्टी यांच्यावर निशाणा साधताना ,शेट्टी यांनी पडायला भाजपा-शिवसेना लागत नाही,कारण शरद पवार खूप हुशार नेते आहेत, ते त्यांना शिव्या देणारयांना सोडतील का,असा टोला लागवात,शेट्टी यांना आता असे पराभूत करा की ते परत कधी निवडणुकीत उभारणार नाहीत,असं आवाहन यावेळी मंत्री पाटील यांनी केले.

बाईट - चंद्रकांत पाटील - महसूल मंत्री.

व्ही वो - शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी बोलताना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानीच्या नेत्यांवर यावेळी जोरदार तोफ डागली.आम्ही युती केली ,ती चांगली आणि जास्त मंत्री पदे द्या म्हणून केली नाही,तर शेतकरयांसाठी आणि देश हिताचे निर्णय घेण्यासाठी केल्याचे ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले .तसेच शरद पवारांच्या टीका करताना आम्हाला शेतीतील काही कळत नाही असं म्हणता मग तुम्हाला क्रिकेट मधलं काय कळत,असा खोचक सवाल करत,मी शेतकरी नेता नाही पण शेतकरी मित्र नक्की आहे,असा टोला यावेळी उध्दव ठाकरे यांनी लगावला.

तर राहुल गांधी यांनी स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेताना,मी सावरकर यांना इंग्रजांनी ज्या तुरुंगात ठेवले होते.ते प्रत्यक्ष जाऊन पाहिले आहे, १४ वर्षे जी शिक्षा भोगली,त्याची माहिती आहे.तर स्वातंत्र्यासाठी सावरकरांइतका त्याग व कष्ट जवाहरलाल नेहरू यांनी केली आहेत,असा संतप्त सवाल करत राहुल गांधी यांनी त्यांची पुस्तकातून माहिती घ्यावी असा सल्ला देत.अश्या नालायक करट्याच्या हातात सत्ता देऊ नका असा आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी केले.

तर स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांच्यावर टीका करताना ,गेल्या निवडणूकीत चुकीच्या माणसाला ही जागा दिली.आणि शेट्टी यांना पाठिंबा देने ही माझी मोठी चूक झाली.पण आता तुम्ही माझी चूक दुरुस्त करून धैर्यशील माने यांना विजयी करावे असे आवाहन यावेळी ठाकरे यांनी केले.

बाईट - उद्धव ठाकरे - पक्ष प्रमुख,शिवसेना.Conclusion:
Last Updated : Apr 12, 2019, 1:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.