ETV Bharat / state

जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांना शासनाच्या सुविधा तातडीने द्या - विशाल पाटील

author img

By

Published : May 3, 2019, 1:53 PM IST

दुष्काळी भागाला शासनाच्या जाहीर निकषाप्रमाणे सवलती मिळाव्यात, आवश्यकतेनुसार चारा छावण्या सुरू कराव्यात तसेच पिण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा करावा, त्याच बरोबर टेम्भू, म्हैसाळ, ताकारी आणि आरफळ योजनांचे पाणी कॅनॉलद्वारे सोडून बंधारे, पाझर तलाव भरण्यात यावेत, तर ओढा नाल्यातही पाणी सोडण्याची मागणी विशाल पाटलांनी लावून धरली

जिल्हाधिकाऱ्यांना दुष्काळी उपायोजना करण्याबाबत निवेदन देताना विशाल पाटील

सांगली - जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांना शासनाने तातडीने सुविधा द्याव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते विशाल पाटील यांनी केली आहे. या बाबतच्या मागण्यांचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.


सांगली जिल्ह्यात सध्या दुष्काळीची दाहकता वाढत आहे. मे महिना सुरू झाला असून या महिन्यात दुष्काळी भागात नागरिकांना पाणी टंचाईसह अनेक समस्यांना मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागणार आहे. शासनाने दुष्काळी सवलत जाहीर केली आहे. मात्र ती दुष्काळग्रस्त जनतेपर्यंत पोहोचत नसल्याचा आरोप स्वाभिमानीचे नेते आणि सांगली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विशाल पाटील यांनी केला. तसेच दुष्काळी तालुक्याना शासनाने जाहीर केलेल्या सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांची भेट घेऊन केली. यावेळी विशाल पाटील यांनी दुष्काळी भागातील जनतेच्या समस्यांवर जिल्हाधिकाऱ्याशी तासभर चर्चा केली.

दुष्काळी भागाला शासनाच्या जाहीर निकषाप्रमाणे सवलती मिळाव्यात, आवश्यकतेनुसार चारा छावण्या सुरू कराव्यात तसेच पिण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा करावा, त्याच बरोबर टेम्भू, म्हैसाळ, ताकारी आणि आरफळ योजनांचे पाणी कॅनॉलद्वारे सोडून बंधारे, पाझर तलाव भरण्यात यावेत, तर ओढा नाल्यातही पाणी सोडावे, त्याच बरोबर आचारसंहितेमुळे दुष्काळी जनतेची सुरू असणारी होरपळ आणि जनावरांचा टाहो याकडे आपण लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

प्रशासनाने आचारसंहितेची तमा न बाळगता तातडीने जत, आटपाडी, तासगाव, कवठे महांकाळ या दुष्काळी परिसरात शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या दुष्काळी सुविधा देण्याची आग्रही मागणीही विशाल पाटील यांनी केली. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती अण्णासाहेब कोरे, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे,अमित पाटील यांच्यासह दुष्काळी भागाचे प्रतिनिधी व शेतकरी उपस्थित होते.

सांगली - जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांना शासनाने तातडीने सुविधा द्याव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते विशाल पाटील यांनी केली आहे. या बाबतच्या मागण्यांचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.


सांगली जिल्ह्यात सध्या दुष्काळीची दाहकता वाढत आहे. मे महिना सुरू झाला असून या महिन्यात दुष्काळी भागात नागरिकांना पाणी टंचाईसह अनेक समस्यांना मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागणार आहे. शासनाने दुष्काळी सवलत जाहीर केली आहे. मात्र ती दुष्काळग्रस्त जनतेपर्यंत पोहोचत नसल्याचा आरोप स्वाभिमानीचे नेते आणि सांगली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विशाल पाटील यांनी केला. तसेच दुष्काळी तालुक्याना शासनाने जाहीर केलेल्या सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांची भेट घेऊन केली. यावेळी विशाल पाटील यांनी दुष्काळी भागातील जनतेच्या समस्यांवर जिल्हाधिकाऱ्याशी तासभर चर्चा केली.

दुष्काळी भागाला शासनाच्या जाहीर निकषाप्रमाणे सवलती मिळाव्यात, आवश्यकतेनुसार चारा छावण्या सुरू कराव्यात तसेच पिण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा करावा, त्याच बरोबर टेम्भू, म्हैसाळ, ताकारी आणि आरफळ योजनांचे पाणी कॅनॉलद्वारे सोडून बंधारे, पाझर तलाव भरण्यात यावेत, तर ओढा नाल्यातही पाणी सोडावे, त्याच बरोबर आचारसंहितेमुळे दुष्काळी जनतेची सुरू असणारी होरपळ आणि जनावरांचा टाहो याकडे आपण लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

प्रशासनाने आचारसंहितेची तमा न बाळगता तातडीने जत, आटपाडी, तासगाव, कवठे महांकाळ या दुष्काळी परिसरात शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या दुष्काळी सुविधा देण्याची आग्रही मागणीही विशाल पाटील यांनी केली. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती अण्णासाहेब कोरे, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे,अमित पाटील यांच्यासह दुष्काळी भागाचे प्रतिनिधी व शेतकरी उपस्थित होते.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

AVB

Feed send file name - MH_1_SNG_03_MAY_2019_VISHAL_PATIL_ON_DUSHKAL_SARFARAJ_SANADI - to - MH_5_SNG_03_MAY_2019_VISHAL_PATIL_ON_DUSHKAL_SARFARAJ_SANADI

स्लग - जिल्ह्यातील दुष्काळी तालुकयांना तातडीने शासनाच्या सुविधा द्या - विशाल पाटील .

अंकर - जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्याना शासनाने तातडीने सुविधा द्याव्यात अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते विशाल पाटील यांनी केली आहे.याबाबतच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारयांना देण्यात आले आहे.
Body:व्ही वो - सांगली जिल्ह्यात सध्या दुष्काळीची दाहकता वाढत आहे.मे महिना सुरू झाला असून या महिन्यात दुष्काळी भागात नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाण्याच्या बरोबर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.शासनाने दुष्काळी सवलत जाहीर केली आहे.मात्र ती दुष्काळग्रस्त जनतेपर्यंत पोचत नसल्याचा आरोप स्वाभिमानीचे नेते आणि सांगली लोकसभा मतदार संघाचे उमेदवार विशाल पाटील यांनी करत दुष्काळी तालुक्याना शासनाने जाहीर केलेल्या सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी दुष्काळी शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांची भेट घेऊन केली आहे. यावेळी एक तास विशाल पाटील यांनी दुष्काळी जनतेच्या भावना जिल्हाधिकारी चौधरी यांच्यासमोर मांडल्या.यावेळी दुष्काळी भागाला शासनाच्या जाहीर निकषाप्रमाणे सवलती मिळाव्यात, आवश्यकतेनुसार चारा छावण्या सुरु कराव्यात तसेच पिण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा करावा,त्याच बरोबर टेम्भू, म्हैसाळ, ताकारी आणि आरफळ योजनांचे पाणी कॅनॉल द्वारे सोडून बंधारे,पाझर तलाव भरण्यात यावेत,तर ओढा नाल्यातही पाणी सोडावे,त्याच बरोबर आचारसंहितेमुळे दुष्काळी जनतेची सुरु असणारी होरपळ आणि जनावरांचा टाहो याकडे आपण लक्ष देऊन आचारसंहितेची तमा न बाळगता तातडीने दुष्काळी जत,आटपाडी, तासगाव,कवठे महांकाळ या परिसरात शासनाच्या केलेल्या दुष्काळी सुविधा देण्याची आग्रही मागणीही विशाल पाटील यांनी केली.यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती अण्णासाहेब कोरे, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे,अमित पाटील यांच्यासह दुष्काळी भागाचे प्रतिनिधी व शेतकरी उपस्थित होते.

बाईट: विशाल पाटील - नेते , स्वाभिमानी शेतकरी संघटना ,सांगली.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.