ETV Bharat / state

काँग्रेसचा गड 'स्वाभिमानी' परत मिळवणार का? सांगलीत तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी

गेल्या पाच वर्षात सांगली लोकसभा मतदारसंघ आणि जिल्ह्यात अनेक राजकीय बदल घडले आहेत. काँग्रेस आणि भाजपतील संघर्ष दोन्ही पक्षातील नेत्यांनी चव्हाट्यावर आणत विरोधी पक्षाबरोबर वैरत्व घेण्याऐवजी स्वकीयांचे शत्रूत्व घेतले आहे. याचा फटका भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्याबरोबर काँग्रेसमधील वसंतदादा घराण्याला बसला आहे.

author img

By

Published : Apr 15, 2019, 10:11 AM IST

Updated : Apr 15, 2019, 3:26 PM IST

भाजप गड राखणार का?

सांगली - भाजपकडून गड राखला जाणार की? काँग्रेसच्या हातातून गेलेला गड स्वाभिमानी परत मिळवून देणार? की वंचित बहुजन आघाडी बाजी मारणार याबाबत सांगलीत जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत. ७० वर्षे काँग्रेस आणि ३५ वर्षे वसंतदादा पाटील यांच्या हातात सांगली लोकसभा मतदारसंघ राहिला आहे. मात्र, २०१४ मधील निवडणुकीत मोदी लाटेत सांगलीत काँग्रेसच्या बालेकिल्याला सुरुंग लावत भाजपचे संजयकाका पाटील यांनी विजय मिळवला. त्यावेळी काँग्रेसच्या प्रतीक पाटलांचा पराभव झाला होता. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी या निवडणुकीत प्रयत्नांची पराकाष्टा केली होती. मात्र, तरीही काँग्रेसचा गड कोणालाही शाबूत ठेवता आला नाही.

भाजप गड राखणार का?

यावेळी या मतदारसंघातून पुन्हा भाजपने संजयकाका पाटील यांना तर आघाडीकडून स्वाभिमानीतर्फे विशाल पाटील हे मैदानात उतरलेत. तर वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर उभे राहिल्याने विशाल पाटील आणि संजयकाका पाटील यांच्यासमोर आव्हानं निर्माण झाले आहे.

गेल्या पाच वर्षात सांगली लोकसभा मतदारसंघ आणि जिल्ह्यात अनेक राजकीय बदल घडले आहेत. काँग्रेस आणि भाजपतील संघर्ष दोन्ही पक्षातील नेत्यांनी चव्हाट्यावर आणत विरोधी पक्षाबरोबर वैरत्व घेण्याऐवजी स्वकीयांचे शत्रूत्व घेतले आहे. याचा फटका भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्याबरोबर काँग्रेसमधील वसंतदादा घराण्याला बसला आहे.


२०१४ ची परिस्थिती

२०१४ च्या निवडणुकीत २ वेळा सांगली लोकसभेचे नेतृत्व केलेल्या वसंतदादा घराण्यातील माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांचा भाजपच्या संजयकाका पाटील यांनी तब्बल २ लाख ३८ हजार मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीच्या विजयाचे परिणाम जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघावरही झाले. ६ पैकी ४ विधानसभा मतदारसंघात ३ भाजप आणि १ शिवसेनेचे आमदार विजयी झाले. भाजपच्या या विजयी घौडदौडीमुळे जिल्ह्यातील काँग्रेस जवळपास संपुष्टात आल्याप्रमाणे झाली. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रतीक पाटील यांनी मतदारसंघाशी असणारा सर्व संपर्क तोडून अघोषित संन्यास घेतला.


काँग्रेसमधील अंतर्गत कलह

काँग्रेसमध्ये सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून बराच कलह झाला होता. प्रतीक पाटील यांना उमेदवारी देण्यावरून काँग्रेसमधील वसंतदादा विरुद्ध पतंगराव कदम गटातील संघर्ष उघड झाला. या संघर्षामुळे गेली ७० वर्षे आणि त्यातील ३५ वर्षे एकहाती सांगली लोकसभा मतदारसंघावर वर्चस्व ठेवणाऱ्या दादा घराण्याचा पत्ता कट झाला. काँग्रेसने सांगलीची जागा मित्रपक्ष असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी पक्षाला दिली.


पक्षातील नेत्यांनी थेट वरिष्ठ पातळीवर संजयकाका पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. त्यामुळे पाटील यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार होती. अखेर राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन ऐनवेळी संजयकाका पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. पण यातून पक्षातील एकेकाळचे स्टार प्रचारक व धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी बंड केले. तर काँग्रेस आणि पर्यायाने वसंतदादा पाटील घराण्यातून सांगली लोकसभेची उमेदवारी गेल्याने वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांनी बंडखोरीचा झेंडा फडकवला. मात्र, स्वाभिमानीने विशाल पाटील यांना पक्षाची उमेदवारी देत लोकसभेच्या मैदानात उतरवले.


गोपीचंद पडळकरांचे बंड

भाजपचे बंडखोर मानले जाणारे गोपीचंद पडळकर यांना स्वाभिमानीतून उमेदवारी निश्चित मानली जात असताना ऐनवेळी त्यांचा पत्ता कट झाला. त्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीमधून संजयकाका पाटील आणि विशाल पाटील यांच्या विरोधात शड्डू ठोकला.


१२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

सांगली लोकसभा मतदारसंघात भाजप, काँग्रेस महाआघाडीचे स्वाभिमानी शेतकरी पक्ष, वंचित बहुजन आघाडी, बहुजन मुक्ती पार्टी, अपक्ष असे १२ जण निवडणूक लढवत आहेत. मात्र, यामध्ये भाजप, काँग्रेस महाआघाडीतून स्वाभिमानी शेतकरी पक्ष, वंचित बहुजन आघाडी यांच्यात खरी लढत होत आहे. या तिरंगी लढतीमुळे सांगली मतदारसंघात रंगत आली आहे.

मतदारसंघातील प्रश्न

गेल्या ५ वर्षात जिल्ह्यात ठोस असा उद्योग उभा राहू शकला नाही. सांगली जिल्ह्यातील पूर्व भाग अजून दुष्काळाच्या छायेत आहे. टेंभू, ताकारी, म्हैसाळ या सिंचन योजना या जिल्ह्यासाठी वरदान मानल्या जात आहेत. मात्र, अद्याप त्या पूर्णत्वास गेल्या नाहीत. यामुळे दुष्काळी जनता अद्याप पाण्यापासून वंचित आहे. जिल्ह्यातील औद्योगिक इंडस्ट्रीजच्या विकासाचे घोंगडे अद्याप भिजत पडले आहे. यामुळे उद्योजक अडचणीत आहेत. रोजगाराचा प्रश्नही गंभीर आहे. हळद आणि द्राक्षांची आगार असणाऱ्या पेठेसंदर्भात अनेक अडचणी आहेत. व्यापाऱ्यांना सेवाकर नोटीसा हा प्रश्न केंद्र स्तरावर रेंगाळत पडला आहे, अद्याप तो सोडवला गेला नाही. शिवाय सांगली महापालिकेच्या विकासाचा मुद्दाही महत्त्वाचा आहे.

मुद्यांऐवजी आरोप-प्रत्यारोप

सांगलीत विकासाच्या मुद्यांवर बोलण्यापेक्षा सर्वच पक्ष जात, घराणेशाही, व्यक्तीगत आरोप यावर अधिक भर देत आहेत. गोपीचंद पडळकर यांच्यावर धनगर समाजाचे नेते म्हणून शिक्का मारण्यात येत आहे. तर भाजपच्या संजयकाका पाटील यांच्यावर गुंडगिरी, कारखाने बुडवले, अशी टीका करण्यात येत आहे. तर विशाल पाटील यांच्यावर घराणेशाहीची टीका होत आहे. आतापर्यंत निवडणुकीत वसंतदादा पाटील घराण्याच्या पाठीत खंजीर खुपसला, संग पहिला आता जंग पहा, गुंडगिरी मोडून काढू, घराणेशाही कशाला असे आरोप-प्रत्यारोप भाजप, स्वाभिमानी आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये सुरू आहे. जिल्ह्यात मराठा समाजाचे अधिक प्राबल्य आहे. त्या पाठोपाठ धनगर समाज, दलित समाज आणि मुस्लीम समाज त्याचबरोबर लिंगायत समाजाचेही लोकसंख्या लक्षणीय आहे.

मतदारसंघातील पक्षीय बलाबल

सांगली लोकसभा मतदारसंघात ६ विधानसभा क्षेत्रांचा समावेश होतो. यामध्ये ३ भाजपचे तर शिवसेनेचा, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक आमदार आहे.

मिरज - सुरेश खाडे (भाजप)
सांगली - सुधीर गाडगीळ (भाजप)
जत - विलासराव जगताप (भाजप)
खानापूर - विटा - अनिल बाबर (शिवसेना)
पलुस-कडेगांव - विश्वजीत कदम (काँग्रेस)
तासगांव-कवठे महांकाळ - सुमनताई पाटील (राष्ट्रवादी)

जिल्हा परिषद, सांगली महापालिका, तासगाव नगरपालिका आणि दोन पंचायत समित्यांमध्ये भाजपची एकहाती सत्ता आहे. असे असले जरी भाजपमध्ये जोरदार अंतर्गत कलह आहे. तूर्त पक्षीय पातळीवर हा संघर्ष मिटवण्यात आला आहे. पण तो कितपत मिटला हाही प्रश्न आहे ?

मतदारसंख्या

एकूण मतदार - १८ लाख ३ हजार
पुरुष मतदार - ९ लाख २९ हजार २३२
स्त्री मतदार - ८ लाख ७३ हजार ७४९ आहेत
१९ तृतीयपंथी मतदार आहेत.

सुरुवातील भाजपला सोपी वाटणारी निवडणूक विशाल पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीमुळे अवघड बनली आहे. भाजपला पक्षातील नाराज नेत्यांची कितपत साथ मिळते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्वाभिमानीला प्रत्यक्ष किती मदत मिळते. तसेच वंचित बहुजन आघाडीचे जातीचे समीकरण आणि पडळकर यांची जादू कितपत चालते. हे येत्या २३ मे ला पाहायला मिळणार आहे. या तिरंगी लढतीमुळे सांगली लोकसभा निवडणुकीत काँटे की टक्कर होणार हे मात्र नक्की.

सांगली - भाजपकडून गड राखला जाणार की? काँग्रेसच्या हातातून गेलेला गड स्वाभिमानी परत मिळवून देणार? की वंचित बहुजन आघाडी बाजी मारणार याबाबत सांगलीत जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत. ७० वर्षे काँग्रेस आणि ३५ वर्षे वसंतदादा पाटील यांच्या हातात सांगली लोकसभा मतदारसंघ राहिला आहे. मात्र, २०१४ मधील निवडणुकीत मोदी लाटेत सांगलीत काँग्रेसच्या बालेकिल्याला सुरुंग लावत भाजपचे संजयकाका पाटील यांनी विजय मिळवला. त्यावेळी काँग्रेसच्या प्रतीक पाटलांचा पराभव झाला होता. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी या निवडणुकीत प्रयत्नांची पराकाष्टा केली होती. मात्र, तरीही काँग्रेसचा गड कोणालाही शाबूत ठेवता आला नाही.

भाजप गड राखणार का?

यावेळी या मतदारसंघातून पुन्हा भाजपने संजयकाका पाटील यांना तर आघाडीकडून स्वाभिमानीतर्फे विशाल पाटील हे मैदानात उतरलेत. तर वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर उभे राहिल्याने विशाल पाटील आणि संजयकाका पाटील यांच्यासमोर आव्हानं निर्माण झाले आहे.

गेल्या पाच वर्षात सांगली लोकसभा मतदारसंघ आणि जिल्ह्यात अनेक राजकीय बदल घडले आहेत. काँग्रेस आणि भाजपतील संघर्ष दोन्ही पक्षातील नेत्यांनी चव्हाट्यावर आणत विरोधी पक्षाबरोबर वैरत्व घेण्याऐवजी स्वकीयांचे शत्रूत्व घेतले आहे. याचा फटका भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्याबरोबर काँग्रेसमधील वसंतदादा घराण्याला बसला आहे.


२०१४ ची परिस्थिती

२०१४ च्या निवडणुकीत २ वेळा सांगली लोकसभेचे नेतृत्व केलेल्या वसंतदादा घराण्यातील माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांचा भाजपच्या संजयकाका पाटील यांनी तब्बल २ लाख ३८ हजार मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीच्या विजयाचे परिणाम जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघावरही झाले. ६ पैकी ४ विधानसभा मतदारसंघात ३ भाजप आणि १ शिवसेनेचे आमदार विजयी झाले. भाजपच्या या विजयी घौडदौडीमुळे जिल्ह्यातील काँग्रेस जवळपास संपुष्टात आल्याप्रमाणे झाली. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रतीक पाटील यांनी मतदारसंघाशी असणारा सर्व संपर्क तोडून अघोषित संन्यास घेतला.


काँग्रेसमधील अंतर्गत कलह

काँग्रेसमध्ये सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून बराच कलह झाला होता. प्रतीक पाटील यांना उमेदवारी देण्यावरून काँग्रेसमधील वसंतदादा विरुद्ध पतंगराव कदम गटातील संघर्ष उघड झाला. या संघर्षामुळे गेली ७० वर्षे आणि त्यातील ३५ वर्षे एकहाती सांगली लोकसभा मतदारसंघावर वर्चस्व ठेवणाऱ्या दादा घराण्याचा पत्ता कट झाला. काँग्रेसने सांगलीची जागा मित्रपक्ष असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी पक्षाला दिली.


पक्षातील नेत्यांनी थेट वरिष्ठ पातळीवर संजयकाका पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. त्यामुळे पाटील यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार होती. अखेर राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन ऐनवेळी संजयकाका पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. पण यातून पक्षातील एकेकाळचे स्टार प्रचारक व धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी बंड केले. तर काँग्रेस आणि पर्यायाने वसंतदादा पाटील घराण्यातून सांगली लोकसभेची उमेदवारी गेल्याने वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांनी बंडखोरीचा झेंडा फडकवला. मात्र, स्वाभिमानीने विशाल पाटील यांना पक्षाची उमेदवारी देत लोकसभेच्या मैदानात उतरवले.


गोपीचंद पडळकरांचे बंड

भाजपचे बंडखोर मानले जाणारे गोपीचंद पडळकर यांना स्वाभिमानीतून उमेदवारी निश्चित मानली जात असताना ऐनवेळी त्यांचा पत्ता कट झाला. त्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीमधून संजयकाका पाटील आणि विशाल पाटील यांच्या विरोधात शड्डू ठोकला.


१२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

सांगली लोकसभा मतदारसंघात भाजप, काँग्रेस महाआघाडीचे स्वाभिमानी शेतकरी पक्ष, वंचित बहुजन आघाडी, बहुजन मुक्ती पार्टी, अपक्ष असे १२ जण निवडणूक लढवत आहेत. मात्र, यामध्ये भाजप, काँग्रेस महाआघाडीतून स्वाभिमानी शेतकरी पक्ष, वंचित बहुजन आघाडी यांच्यात खरी लढत होत आहे. या तिरंगी लढतीमुळे सांगली मतदारसंघात रंगत आली आहे.

मतदारसंघातील प्रश्न

गेल्या ५ वर्षात जिल्ह्यात ठोस असा उद्योग उभा राहू शकला नाही. सांगली जिल्ह्यातील पूर्व भाग अजून दुष्काळाच्या छायेत आहे. टेंभू, ताकारी, म्हैसाळ या सिंचन योजना या जिल्ह्यासाठी वरदान मानल्या जात आहेत. मात्र, अद्याप त्या पूर्णत्वास गेल्या नाहीत. यामुळे दुष्काळी जनता अद्याप पाण्यापासून वंचित आहे. जिल्ह्यातील औद्योगिक इंडस्ट्रीजच्या विकासाचे घोंगडे अद्याप भिजत पडले आहे. यामुळे उद्योजक अडचणीत आहेत. रोजगाराचा प्रश्नही गंभीर आहे. हळद आणि द्राक्षांची आगार असणाऱ्या पेठेसंदर्भात अनेक अडचणी आहेत. व्यापाऱ्यांना सेवाकर नोटीसा हा प्रश्न केंद्र स्तरावर रेंगाळत पडला आहे, अद्याप तो सोडवला गेला नाही. शिवाय सांगली महापालिकेच्या विकासाचा मुद्दाही महत्त्वाचा आहे.

मुद्यांऐवजी आरोप-प्रत्यारोप

सांगलीत विकासाच्या मुद्यांवर बोलण्यापेक्षा सर्वच पक्ष जात, घराणेशाही, व्यक्तीगत आरोप यावर अधिक भर देत आहेत. गोपीचंद पडळकर यांच्यावर धनगर समाजाचे नेते म्हणून शिक्का मारण्यात येत आहे. तर भाजपच्या संजयकाका पाटील यांच्यावर गुंडगिरी, कारखाने बुडवले, अशी टीका करण्यात येत आहे. तर विशाल पाटील यांच्यावर घराणेशाहीची टीका होत आहे. आतापर्यंत निवडणुकीत वसंतदादा पाटील घराण्याच्या पाठीत खंजीर खुपसला, संग पहिला आता जंग पहा, गुंडगिरी मोडून काढू, घराणेशाही कशाला असे आरोप-प्रत्यारोप भाजप, स्वाभिमानी आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये सुरू आहे. जिल्ह्यात मराठा समाजाचे अधिक प्राबल्य आहे. त्या पाठोपाठ धनगर समाज, दलित समाज आणि मुस्लीम समाज त्याचबरोबर लिंगायत समाजाचेही लोकसंख्या लक्षणीय आहे.

मतदारसंघातील पक्षीय बलाबल

सांगली लोकसभा मतदारसंघात ६ विधानसभा क्षेत्रांचा समावेश होतो. यामध्ये ३ भाजपचे तर शिवसेनेचा, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक आमदार आहे.

मिरज - सुरेश खाडे (भाजप)
सांगली - सुधीर गाडगीळ (भाजप)
जत - विलासराव जगताप (भाजप)
खानापूर - विटा - अनिल बाबर (शिवसेना)
पलुस-कडेगांव - विश्वजीत कदम (काँग्रेस)
तासगांव-कवठे महांकाळ - सुमनताई पाटील (राष्ट्रवादी)

जिल्हा परिषद, सांगली महापालिका, तासगाव नगरपालिका आणि दोन पंचायत समित्यांमध्ये भाजपची एकहाती सत्ता आहे. असे असले जरी भाजपमध्ये जोरदार अंतर्गत कलह आहे. तूर्त पक्षीय पातळीवर हा संघर्ष मिटवण्यात आला आहे. पण तो कितपत मिटला हाही प्रश्न आहे ?

मतदारसंख्या

एकूण मतदार - १८ लाख ३ हजार
पुरुष मतदार - ९ लाख २९ हजार २३२
स्त्री मतदार - ८ लाख ७३ हजार ७४९ आहेत
१९ तृतीयपंथी मतदार आहेत.

सुरुवातील भाजपला सोपी वाटणारी निवडणूक विशाल पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीमुळे अवघड बनली आहे. भाजपला पक्षातील नाराज नेत्यांची कितपत साथ मिळते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्वाभिमानीला प्रत्यक्ष किती मदत मिळते. तसेच वंचित बहुजन आघाडीचे जातीचे समीकरण आणि पडळकर यांची जादू कितपत चालते. हे येत्या २३ मे ला पाहायला मिळणार आहे. या तिरंगी लढतीमुळे सांगली लोकसभा निवडणुकीत काँटे की टक्कर होणार हे मात्र नक्की.

Intro:सरफराज सनदी - सांगली.

PKG

Feed send - file name - R_MH_1_SNG_14_APR_2019_SANGLI_LOKSABHA_REPORT_SARFARAJ_SANADI - TO - R_MH_8_SNG_14_APR_2019_SANGLI_LOKSABHA_REPORT_SARFARAJ_SANADI


स्लग - सांगली लोकसभेसाठी तिरंगी लढती मुळे काट्याची टक्कर..

अँकर - राजकीय दृष्ट्या संवेदनशील असणारया सांगली लोकसभा निवडणुकीसाठी तिरंगी लढत होत आहे.
भाजपा,विरुद्ध स्वाभिमानी पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळत असून
विकासाच्या मुद्द्याऐवजी जात, घराणेशाही आणि व्यक्तिगत आरोप या मुद्यांवर ही निवडणूक पार पडत आहे.
भाजपाकडून गड राखला जाणार की काँग्रेसच्या हातातून गेलाला गड स्वाभिमानी परत मिळवून देणार का ? की वंचित बहुजन आघाडी बाजी मारणार याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.पाहूया सांगली लोकसभेचा ग्राउंड रिपोर्ट .Body:व्ही वो - सांगली लोकसभा मतदार संघ गेल्या पाच वर्षापर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला होता.७० वर्षे काँग्रेस आणि ३५ वर्ष वसंतदादा पाटील यांच्या हातात सांगली लोकसभेचा मतदार संघ राहिला आहे.मात्र २०१४ मधील निवडणूकीत मोदी लाटेत सांगलीचा काँग्रेस बालेकिल्याला सुरुंग लागला आणि भाजपाच्या संजयकाका पाटील यांनी निर्विवाद विजय मिळवला.त्यावेळी काँग्रेस कडून प्रतीक पाटील यांनी कडवी झुंज दिली होती.राज्यातील सत्तेत असणारे दिग्गज नेते तत्कालीन गृहमंत्री स्वर्गीय आर आर पाटील यांनी या निवडणुकीत प्रयत्नांची परिकाष्टा केली होती.मात्र तरीही काँग्रेसचा गड कोणालाही शाबूत ठेवता आला नाही.

गेल्या पाच वर्षात सांगली लोकसभा मतदार संघ आणि जिल्ह्यात अनेक राजकीय बदल घडले आहेत.काँग्रेस आणि भाजपातील संघर्ष दोन्ही पक्षातील नेत्यांनी चव्हाट्यावर आणत विरोधी पक्षाबरोबर वैरत्व घेण्याऐवजी स्वकीयांचे शत्रूत्व घेतले आहे.आणि याचा फटका भाजपाचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्या बरोबर काँग्रेस मधील वसंतदादा घराण्याला बसला आहे.

गत निवडणूकीत सांगली लोकसभा मतदार संघाचे दोन वेळा नेतृत्व केलेल्या वसंतदादा घराण्यातील काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील यांचा भाजपाच्या संजयकाका पाटील यांनी तब्बल २ लाख ३८ हजार मतांच्या फरकाने विजयी झाले होते.
या निवडणुकीच्या विजयाचे परिणाम जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघावरही झाले आणि सहा पैकी चार मतदार संघात ३ भाजपा आणि १ शिवसेनेचे आमदार विजयी झाले.
भाजपाच्या या विजयी घौडदौडमुळे जिल्ह्यातील काँग्रेस जवळपास संपुष्टात आल्याप्रमाणे झाली. तर लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रतीक पाटील यांनी मतदार संघाशी असणारा सर्व संपर्क तोडून अघोषित सन्यास घेतला.

उमेदवारीचे संघर्ष..

परिणामी यावेळी काँग्रेस मधून सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून बराच कलह झाला.प्रतीक पाटील यांना उमेदवारी देण्यावरून अंतर्गत आणि काँग्रेस मधील वसंतदादा विरुद्ध पतंगराव कदम गटातील उघड संघर्षामुळे गेली ७० वर्षे आणि त्यातील ३५ वर्षे एकहाती सांगली लोकसभा मतदार संघावर वर्चस्व ठेवणाऱ्या दादा घराण्याचा पत्ता कट झाला आणि काँग्रेसने सांगलीची जागा ही मित्र पक्ष असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी पक्षाला देऊन टाकली .

तर दुसरीकडे भाजपा मध्येही उमेदवारी देण्यावर सर्व आलबेल अशी स्थिती नव्हती ,कारण गेल्या पाच वर्षात खासदार संजयकाका पाटील यांनी भाजपातील आमदार आणि पक्षातील दिग्गज नेत्यांनी सोबत पंगा घेतला होता.
यामुळे पक्षातील नेत्यांनी थेट वरीष्ठ पातळीवर संजयकाका पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला,त्यामुळे पाटील यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार होती.अखेर राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन ऐनवेळी संजयकाका पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.पण यातून पक्षातील एकेकाळचे स्टार प्रचारक व धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी बंड थोपटला .

तर काँग्रेस आणि पर्यायाने वसंतदादा पाटील घराण्यातुन सांगली लोकसभेची उमेदवारी गेल्याने दादांचे नातू विशाल पाटील यांनी बंडखोरीचा झेंडा फडकवला,यामात्र स्वाभिमानीने विशाल पाटील यांच्या गळ्यात आपल्या पक्षाची उमेदवारीची माळ घालून लोकसभेच्या मैदानात उतरवले.

तर तिकडे भाजपाचे बंडखोर मानले जाणारे गोपीचंद पडळकर यांना स्वाभिमानीतुन उमेदवारी निश्चित मानली जात असताना ऐनवेळी त्यांचा पत्ता कट झाल्याने त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या तंबु गाठत वंचित बहुजन आघाडीमधून संजयकाका पाटली आणि विशाल पाटील यांच्या विरोधात शड्डू ठोकला .

सांगली लोकसभेसाठी आता १२ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.
यामध्ये भाजपा,काँग्रेस महाआघाडीचे स्वाभिमानी शेतकरी पक्ष ,वंचित बहुजन आघाडी, बहुजन मुक्ती पार्टी,आणि अपक्ष असे १२ जण निवडणूक लढवत आहेत.

मात्र यामध्ये भाजपा,काँग्रेस महाआघाडीचे स्वाभिमानी शेतकरी पक्ष, वंचित बहुजन आघाडी यांच्यात खरी लढत होत आहे.या तिरंगी लढतीमुळे सांगली लोकसभेच्या मैदानात रंगत आली आहे.

जिल्ह्याचे महत्त्वाचे प्रश्न..

गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात ठोस असा उद्योग उभा राहू शकला नाही.
सांगली जिल्ह्यातील पूर्व भाग अजून दुष्काळाच्या गराड्यात आहे.
टेम्भू,ताकारी, म्हैसाळ या सिंचन योजना य जिल्ह्यासाठी वरदान मानल्या जात आहेत.मात्र अद्याप त्या पूर्णत्वास गेल्या नाहीत,यामुळे दुष्काळी जनता अद्याप पाण्यापासून वंचित आहे.जिल्ह्यातील औद्योगिक इंडस्ट्रीजच्या विकासाचे घोंगडे अद्याप भिजत पडले आहे.यामुळे उद्योजक अडचणीत आहेत,यामुळे रोजगाराचा प्रश्नही गंभीर आहे.हळद आणि द्राक्षांची आगार असणाऱ्या पेठेचे अनेक अडचणी आहेत.तर व्यापाऱ्यांना सेवाकर नोटिसा हा प्रश्न केंद्र स्तरावर रेंगाळत पडला आहे,अद्याप तो सोडवला गेला नाही.शिवाय सांगली महापालिकेच्या विकासाचा मुद्दाही महत्वाचा आहे.

मुद्द्यां ऐवजी आरोप-प्रत्यारोप अधिक..

सांगली लोकसभेच्या निवडणूकीत विकासाच्या मुद्द्यांवर बोलण्यापेक्षा सर्वच पक्ष जात,घराणेशाही,व्यक्तगत आरोप यावर अधिक भर देत आहेत.

गोपीचंद पडळकर यांच्यावर धनगर समाजाचे नेते म्हणून शिका मारण्यात येत आहे.तर भाजपच्या संजयकाका पाटील यांच्यावर गुंडगिरी ,कारखाने बुडवले अशी टीका करण्यात येत आहे,तर विशाल पाटील यांच्यावर घराणेशाहीची टीका करण्यात येत आहे.

आता पर्यंत ता निवडणूकीत वसंतदादा पाटील घराण्याच्या पाठीत खंजीर खुपसला ,संग पहिला आता जंग पहा, गुंडगिरी मोडून काढू ,घराणेशाही कश्याला असे आरोप-प्रत्यारोप भाजपा,स्वाभिमानी आणि वंचित बहुजन आघाडी मध्ये सुरू आहे.

जिल्ह्यातील सोशल इंजिनेअरिंग..

जिल्ह्यात मराठा समाजाचे अधिक प्राबल्य आहे.त्या पाठोपाठ धनगर समाज,दलित समाज आणि मुस्लिम समाज त्याच बरोबर लिंगायत समाजाचेही लोकसंख्या लक्षणीय आहे.

मतदार संघातील राजकीय स्थिती .

सांगली लोकसभा मतदार संघात ६ विधानसभा मतदार संघांचा समावेश असून यामध्ये ३ मतदार संघात भाजपचे तर १ मतदार संघात शिवसेनेचा आमदार आहे.तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी १ आमदार आहेत.तर जिल्हा परिषद,सांगली महापालिका, तासगाव नगरपालिका आणि दोन पंचायत समित्यांमध्ये भाजपाची एक हाती सत्ता आहे.असे असले जरी भाजपा मध्ये जोरदार अंतर्गत कलह आहे,तूर्त पक्षीय पातळीवर हा संघर्ष मिटवण्यात आला आहे..पण ते कितपत मिटला आहे ..हा प्रश्न आहे ?

एक नजर मतदार संघातील मतदार संख्येवर .

एकूण मतदार संख्या - १८ लाख ३ हजार

पुरुष मतदार - ९ लाख २९ हजार २३२.

स्त्री मतदार - ८ लाख ७३ हजार ७४९.

तृतीयपंथी - १९

अशी स्थिती सांगली लोकसभा निवडणुकीची आहे.तर सुरुवातील भाजपाला सोपी वाटणारी निवडणूक विशाल पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारी मुळे अवघड बनली आहे.

बाईट - शिवाजी मोहिते - जेष्ठ पत्रकार ,सांगली .Conclusion:भाजपाला पक्षातील नाराज नेत्यांची कितपत साथ मिळते,तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्वाभिमानीला प्रत्यक्ष किती मदत मिळते आणि वंचित बहुजन आघाडीचे जातीचे समीकरण आणि पडळकर यांचा जादू कितपत चालतो हे येत्या २३ एप्रिल रोजी पाहायला मिळणार आहे.पण या तिरंगा लढतीमुळे सांगली लोकसभेची निवडणूक मध्ये काट्याची टक्कर होणार आहे.हे मात्र नक्की...
Last Updated : Apr 15, 2019, 3:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.