ETV Bharat / state

चार दिवसापासून पुरात अडकलेल्या चिमुकलीसाठी सदाभाऊ खोत बनले 'देवदूत'

या कुटुंबाच्या नांदेड येथील नातेवाईकांनी सदाभाऊ यांच्याशी संपर्क साधत परिस्थिती अत्यंत बिकट असल्याची माहिती दिली होती.

author img

By

Published : Aug 11, 2019, 3:19 PM IST

चिमुकलीसाठी सदाभाऊ खोत बनले 'देवदूत'

सांगली - महापुराची स्थिती अद्यापही गंभीर आहे. तर या महापुरामध्ये राज्यातील मंत्री, लोकप्रतिनिधींची अनेक ठिकाणी असंवेदनशीलता पाहायला मिळाली. काही जणांनी केवळ पूर परिस्थितीची पाहणी करत पूरग्रस्तांची फक्त भेट घेतली. मात्र, सांगलीतील महापुरात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी एका इमारतीच्या गॅलरीत पोहोचून दीड महिन्याच्या बाळासह तिच्या कुटुंबाची सुटका केली.

चिमुकलीसाठी सदाभाऊ खोत बनले 'देवदूत'

सांगलीच्या कृष्णाकाठी आणि शहरांमध्ये महापुर आल्यामुळे आजही हजारो जीव मुठीत घेऊन पुराच्या पाण्याने वेढलेल्या घरांमध्ये जगत आहेत. सुटका व्हावी यासाठी सर्व पातळींवर मदतीसाठी याचना करत आहेत. अनेकांचा संपर्क सुद्धा होत नाही. अशा या परिस्थितीत सैनिक, नौदल, एनडीआरएफ पथक, पोलीस प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्ते नागरिकांना घरातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, तरीही यंत्रणा अपुरी पडत आहे. बचावकार्यात अनेक अडथळे येत आहेत. अशात पूरात अडकून भेदरलेल्या एका कुटुंबाला बाहेर काढण्यासाठी सदाभाऊ खोत यांनी रेस्क्यु करत एका कुटुंबांची सुटका केली आहे.

सदाभाऊ खोत यांनी सांगलीच्या एका अपार्टमेंटमध्ये एका दीड महिन्याच्या बाळासह अडकलेल्या कुटुंबाला सुखरूपपणे बाहेर काढले आहे. त्या कुटुंबाच्या नांदेड येथील नातेवाईकांनी सदाभाऊ यांच्याशी संपर्क साधत परिस्थिती अत्यंत बिकट असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर खोत यांनी तातडीने प्रशासनाची एक बोट घेऊन कुटुंबाची सुटका केली.

सांगली - महापुराची स्थिती अद्यापही गंभीर आहे. तर या महापुरामध्ये राज्यातील मंत्री, लोकप्रतिनिधींची अनेक ठिकाणी असंवेदनशीलता पाहायला मिळाली. काही जणांनी केवळ पूर परिस्थितीची पाहणी करत पूरग्रस्तांची फक्त भेट घेतली. मात्र, सांगलीतील महापुरात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी एका इमारतीच्या गॅलरीत पोहोचून दीड महिन्याच्या बाळासह तिच्या कुटुंबाची सुटका केली.

चिमुकलीसाठी सदाभाऊ खोत बनले 'देवदूत'

सांगलीच्या कृष्णाकाठी आणि शहरांमध्ये महापुर आल्यामुळे आजही हजारो जीव मुठीत घेऊन पुराच्या पाण्याने वेढलेल्या घरांमध्ये जगत आहेत. सुटका व्हावी यासाठी सर्व पातळींवर मदतीसाठी याचना करत आहेत. अनेकांचा संपर्क सुद्धा होत नाही. अशा या परिस्थितीत सैनिक, नौदल, एनडीआरएफ पथक, पोलीस प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्ते नागरिकांना घरातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, तरीही यंत्रणा अपुरी पडत आहे. बचावकार्यात अनेक अडथळे येत आहेत. अशात पूरात अडकून भेदरलेल्या एका कुटुंबाला बाहेर काढण्यासाठी सदाभाऊ खोत यांनी रेस्क्यु करत एका कुटुंबांची सुटका केली आहे.

सदाभाऊ खोत यांनी सांगलीच्या एका अपार्टमेंटमध्ये एका दीड महिन्याच्या बाळासह अडकलेल्या कुटुंबाला सुखरूपपणे बाहेर काढले आहे. त्या कुटुंबाच्या नांदेड येथील नातेवाईकांनी सदाभाऊ यांच्याशी संपर्क साधत परिस्थिती अत्यंत बिकट असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर खोत यांनी तातडीने प्रशासनाची एक बोट घेऊन कुटुंबाची सुटका केली.

Feed send व्हाटसपअप



स्लग - पुरातील मंत्र्यांची संवेदनशीलता चार दिवसापासून चिमुकली सहा अडकलेल्या कुटुंबाची मंत्री खोत यांनी रेस्क्यू करत केली सुटका..


अँकर - सांगलीमध्ये महापुराची स्थिती अद्यापही गंभीर आहे,तर राज्यात मंत्र्यांची लोकप्रतिनिधींचे अनेक ठिकाणी असंवेदनशीलता पाहायला मिळते,केवळ  पूर परिस्थितीची पाहणी,पूरग्रस्तांची भेट असं सोयरसुतक पार पाडले जात आहे. मात्र सांगलीतल्या महापुरात एका मंत्र्याची संवेदनशीलता पाहायला मिळाली.. स्वताचा जीव धोक्यात घालून चार दिवसांपासून पुरात अडकलेल्या  
एका दीड महिन्याच्या चिमुकली सह तिच्या कुटुंबाला रेस्क्यू करत सुरू आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गॅलरीत पोहोचून दीड महिन्याच्या बाळासह तिच्या कुटुंबाची पुरातून सुखरूप सुटका केली.


सांगलीच्या कृष्णाकाठी आणि शहरांमध्ये शाळा तिला महापूर आला आजही हजारो जीव मुठीत घेऊन पुराच्या पाण्याने वेढलेल्या घरांमध्ये जगत आहेत, सुटका व्हावी यासाठी सर्व पातळींवर मदतीसाठी याचना करत आहेत.अनेकांचा संपर्क सुद्धा उठला आहे,अश्या या परिस्थितीत आर्मी,नेव्ही ,एनडीआरएफ,एसडीआरएफ  पोलीस प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्ते सर्वांनाच घरातून बाहेर काढण्यासाठी झटत आहेत ,मात्र तरीही यंत्रणा अपुरी पडते,अनेक अडथळे  या सर्वांना कारणीभूत ठरतात,तर अश्या या पुरात अडकून भेदरलेल्या कुटुंबाला बाहेर काढण्यासाठी थेट एका मंत्र्यांने  रेस्क्यु करत सुखरूप बाहेर काढले.राज्याचे कृषी राज्यमंत्री असणारे सदाभाऊ खोत यांनी सांगलीच्या एका अपार्टमेंटमध्ये एका दीड महिन्याच्या बाळासह अडकलेले कुटुंब सुखरूप पणे बाहेर काढले,त्या कुटुंबाच्या नांदेड येथील नातेवाईकांनी सदाभाऊ यांच्याशी संपर्क साधत परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचं सांगत,पुरातून बाहेर काढण्याची विनंती केली.आणि सदाभाऊ खोत यांनी तातडीने प्रशासनाची एक बोट घेऊन त्या ठिकाणी पोहोचले त्याठिकाणी
खोत यांनी स्वताचा जीव धोक्यात घालत, गॅलरी मधून पोहचत घरातील,त्या दीड महिन्याचा चिमुकलीसह तिच्या कुटुंबाला सुखरूप बाहेर काढले, कुटुंबासाठी खरतर सदाभाऊ खोत देवदूतच ठरले आहेत शिवाय मंत्र्यांच्या मध्ये माणुसकी असते हे यानिमित्ताने पाहायला मिळाले .

 
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.