ETV Bharat / state

हे तर विद्रोही सरकार; प्रकाश आंबेडकरांची आघाडी सरकारवर गंभीर टीका - प्रकाश आंबेडकर काँग्रेस टीका

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सांगलीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीतमध्ये कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेतून प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि काँग्रेसवर निशाणा साधला.

प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर
author img

By

Published : Nov 24, 2020, 5:26 PM IST

Updated : Nov 24, 2020, 6:13 PM IST

सांगली - केंद्राचे आदेश धुडकावून लावत राज्य सरकार एकप्रकारे विद्रोह करत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर केला आहे. तसेच माझ्या दृष्टीने काँग्रेस संपलेली आहे, अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवरही टीकाही केली. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

बोलताना प्रकाश आंबेडकर

महाविकास आघाडीवर टीकास्त्र..
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सांगलीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीतमध्ये कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेतून प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि काँग्रेसवर निशाणा साधला.
सव्वा लाख विद्यार्थी आरक्षण प्रवेशापासून वंचित..!
यावेळी आंबेडकर म्हणाले, राज्यात व्यावसायिक शिक्षण संस्थेमध्ये असणाऱ्या आरक्षणात सर्वच सरकारने बदल केलेत, त्यामुळे राज्यातील जवळपास आरक्षण समूहात असलेल्या सव्वा लाख विद्यार्थ्यांना हक्काच्या प्रवेशापासून वंचित राहावे लागत आहे, असा आरोप आंबडेकर यांनी केला आहे.
हा कसला धर्मनिरपेक्ष..!

तसेच महाविकास आघाडी सरकारवर बोलताना, राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याबरोबर मुस्लीम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्यात आले होते. मात्र, उच्च न्यायालयामध्ये फक्त मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाली. मुस्लीम समाजाला मात्र मिळाली नाही, पण धर्मनिरपेक्षतेचा डांगोरा पिटणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुस्लीम समाजाला आरक्षण लागू केले नाही, असा आरोप आंबडेकर यांनी केला आहे.

हात पुढे आल्यास विचार, पण काँग्रेस संपली आहे..

काँग्रेससोबत जाण्याबाबत आपण अनुकूल होतो, मात्र काँग्रेसने जागा वाटपाच्या बाबतीत योग्य निर्णय घेतला नाही. मात्र, कॉंग्रेसकडून पुन्हा हात पुढे आल्यास विचारू करू, पण माझ्या दृष्टीने काँग्रेस आता संपली आहे. आजही ते 'हॉलिडेच्या मूड'मध्ये आहेत, अशी टीका यावेळी आंबेडकर यांनी काँग्रेसवर केली.

राज्य सरकार करतंय विद्रोह..

राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून केंद्राचे आदेश पाळण्यात येत नसल्याच्या प्रश्नावरून बोलताना केंद्राचे जे कायदे किंवा आदेश असतील ते राज्य सरकारला पाळणे संविधानानुसार गरजेचे आहे. पण, राज्य सरकार आदेश धुडकावून लावत असतील तर हा विद्रोह आहे. राज्य सरकार बगावत करत असेल तर केंद्र सरकार घटनेतील तरतुदीनुसार 356 आर्टिकल लावू शकते, असे मतही आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.

सांगली - केंद्राचे आदेश धुडकावून लावत राज्य सरकार एकप्रकारे विद्रोह करत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर केला आहे. तसेच माझ्या दृष्टीने काँग्रेस संपलेली आहे, अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवरही टीकाही केली. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

बोलताना प्रकाश आंबेडकर

महाविकास आघाडीवर टीकास्त्र..
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सांगलीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीतमध्ये कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेतून प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि काँग्रेसवर निशाणा साधला.
सव्वा लाख विद्यार्थी आरक्षण प्रवेशापासून वंचित..!
यावेळी आंबेडकर म्हणाले, राज्यात व्यावसायिक शिक्षण संस्थेमध्ये असणाऱ्या आरक्षणात सर्वच सरकारने बदल केलेत, त्यामुळे राज्यातील जवळपास आरक्षण समूहात असलेल्या सव्वा लाख विद्यार्थ्यांना हक्काच्या प्रवेशापासून वंचित राहावे लागत आहे, असा आरोप आंबडेकर यांनी केला आहे.
हा कसला धर्मनिरपेक्ष..!

तसेच महाविकास आघाडी सरकारवर बोलताना, राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याबरोबर मुस्लीम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्यात आले होते. मात्र, उच्च न्यायालयामध्ये फक्त मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाली. मुस्लीम समाजाला मात्र मिळाली नाही, पण धर्मनिरपेक्षतेचा डांगोरा पिटणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुस्लीम समाजाला आरक्षण लागू केले नाही, असा आरोप आंबडेकर यांनी केला आहे.

हात पुढे आल्यास विचार, पण काँग्रेस संपली आहे..

काँग्रेससोबत जाण्याबाबत आपण अनुकूल होतो, मात्र काँग्रेसने जागा वाटपाच्या बाबतीत योग्य निर्णय घेतला नाही. मात्र, कॉंग्रेसकडून पुन्हा हात पुढे आल्यास विचारू करू, पण माझ्या दृष्टीने काँग्रेस आता संपली आहे. आजही ते 'हॉलिडेच्या मूड'मध्ये आहेत, अशी टीका यावेळी आंबेडकर यांनी काँग्रेसवर केली.

राज्य सरकार करतंय विद्रोह..

राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून केंद्राचे आदेश पाळण्यात येत नसल्याच्या प्रश्नावरून बोलताना केंद्राचे जे कायदे किंवा आदेश असतील ते राज्य सरकारला पाळणे संविधानानुसार गरजेचे आहे. पण, राज्य सरकार आदेश धुडकावून लावत असतील तर हा विद्रोह आहे. राज्य सरकार बगावत करत असेल तर केंद्र सरकार घटनेतील तरतुदीनुसार 356 आर्टिकल लावू शकते, असे मतही आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.

Last Updated : Nov 24, 2020, 6:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.