ETV Bharat / state

सत्तेत बसण्यापेक्षा विरोधी पक्षात बसावे, जयंत पाटलांचा भाजपला टोला

author img

By

Published : Oct 25, 2019, 8:29 AM IST

Updated : Oct 25, 2019, 11:27 AM IST

आयाराम गयारामांना घेऊन शंभरी गाठलेल्या भाजपने आत्मचिंतन करावे. सत्तेत बसण्यापेक्षा विरोधी पक्षात बसावे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी दिला. सांगलीच्या इस्लामपूर मतदार संघातून जयंत पाटील विजय झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील

सांगली - आयाराम गयारामांना घेऊन शंभरी गाठलेल्या भाजपने आत्मचिंतन करावे. सत्तेत बसण्यापेक्षा विरोधी पक्षात बसावे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी दिला आहे. सातारच्या जनतेने सातारी हिसका महाराष्ट्राला दाखवून दिल्याचा टोला जयंत पाटलांनी उदयनराजेंना लगावला आहे.

सत्तेत बसण्यापेक्षा विरोधी पक्षात बसावे


सांगलीच्या इस्लामपूर मतदारसंघातून जयंत पाटील विजय झाले आहेत. शिवसेनेचे उमेदवार गौरव नायकवडी आणि भाजपचे बंडखोर उमेदवार शशिकांत पाटील यांचा पराभव पाटलांनी केला. आपल्या विजयानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी भाजपच्या विजयावर आणि पक्ष सोडून गेलेल्या उमेदवारांवर निशाणा साधला.

हेही वाचा - मनसेचं आता काय होणार?

पक्षाला सोडून गेलेल्यांना आज पश्चाताप होत असेल. ते आमच्या बरोबर असते तर निवडून आले असते. त्यांना दुर्बुद्धी सुचल्याने त्यांनी पक्षाला सोडले. या शब्दांत राष्ट्रवादी सोडून जाणाऱ्या नेत्यांवर जयंत पाटील यांनी टीका केली. शरद पवार यांनी प्रयत्नांची शिकस्त केली त्यामुळे राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले, असेही ते म्हणाले. उदयनराजेंना कधीच जनतेचे पाठबळ नव्हते. पवार साहेबांनी त्यांना उभे केले होते. पवार साहेबांमुळे कार्यकर्ते उदयनराजे यांच्या मागे होते, असे सातारा पोटनिवडणुकीबाबत जयंतराव पाटील बोलताना म्हणाले.

सांगली - आयाराम गयारामांना घेऊन शंभरी गाठलेल्या भाजपने आत्मचिंतन करावे. सत्तेत बसण्यापेक्षा विरोधी पक्षात बसावे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी दिला आहे. सातारच्या जनतेने सातारी हिसका महाराष्ट्राला दाखवून दिल्याचा टोला जयंत पाटलांनी उदयनराजेंना लगावला आहे.

सत्तेत बसण्यापेक्षा विरोधी पक्षात बसावे


सांगलीच्या इस्लामपूर मतदारसंघातून जयंत पाटील विजय झाले आहेत. शिवसेनेचे उमेदवार गौरव नायकवडी आणि भाजपचे बंडखोर उमेदवार शशिकांत पाटील यांचा पराभव पाटलांनी केला. आपल्या विजयानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी भाजपच्या विजयावर आणि पक्ष सोडून गेलेल्या उमेदवारांवर निशाणा साधला.

हेही वाचा - मनसेचं आता काय होणार?

पक्षाला सोडून गेलेल्यांना आज पश्चाताप होत असेल. ते आमच्या बरोबर असते तर निवडून आले असते. त्यांना दुर्बुद्धी सुचल्याने त्यांनी पक्षाला सोडले. या शब्दांत राष्ट्रवादी सोडून जाणाऱ्या नेत्यांवर जयंत पाटील यांनी टीका केली. शरद पवार यांनी प्रयत्नांची शिकस्त केली त्यामुळे राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले, असेही ते म्हणाले. उदयनराजेंना कधीच जनतेचे पाठबळ नव्हते. पवार साहेबांनी त्यांना उभे केले होते. पवार साहेबांमुळे कार्यकर्ते उदयनराजे यांच्या मागे होते, असे सातारा पोटनिवडणुकीबाबत जयंतराव पाटील बोलताना म्हणाले.

Intro:File name - mh_sng_04_jayant_patil_on_bjp_vis_01_7203751 -


स्लग - आयारामांना घेऊन शंभरी गाठलेल्या भाजपाने आत्मचिंतन करावे,तर साताराकरांनी 'सातारी'हिसका महाराष्ट्राला दाखवून दिला - जयंतराव पाटील.

अँकर - आयाराम,गयारामांना घेऊन शंभरी गाठलेल्या भाजपाने आत्मचिंतन करावे, आणि सत्तेत बसण्यापेक्षा विरोधात बसावे असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटलांनी दिला आहे,तसेच उदयनराजेंच्या पराभवावर बोलताना सातारच्या जनतेने सातार हिसका महाराष्ट्राला दाखवून दिल्याचा टोला जयंतराव पाटलांनी लगावला आहे.ते आपल्या विजयानंतर ते इस्लामपूर मध्ये बोलत होते .
Body:सांगलीच्या इस्लामपूर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील विजय झाले आहेत. शिवसेनेचे उमेदवार गौरव नायकवडी आणि भाजपचे बंडखोर उमेदवार शशिकांत पाटील यांचा जयंतराव पाटलांनी दारुण पराभव केला ह्या विजयानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी भाजपाच्या विजयावर आणि पक्ष सोडून गेलेल्यांच्यावर निशाणा साधला.आम्हाला सोडून गेलेल्यांना आज पश्चाताप होत असेल ते जर आमच्या बरोबर असते तर निवडून आले असते आणि आमची संख्या अधिक वाढली असती,पण त्यांना दुर्बुद्धी सुचली असे शब्दात राष्ट्रवादी सोडून जाणाऱ्या नेत्यांवर जयंत पाटील यांनी टीका केली आहे. तसेच शरद पवार यांनी प्रयत्नांची शिकस्त केली,आणि राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले,जर ऐनवेळी आमच्यातून नेते पक्ष सोडून गेले नसते तर ,आज राष्ट्रवादीची संख्या अधिक असती,असा विश्वास व्यक्त केला .

तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत बउदयनराजे भोसले यांच्या पराभवावर बोलताना,उदयनराजेंनी कधीच जनतेचे पाठबळ नव्हते,जे होते ते पवार साहेबांच्या प्रेमाचे होते.आणि पवार साहेबांनी त्यांना उभे केले होते,व पवार साहेबांच्या यांच्या इच्छेखातर कार्यकर्ते उदयनराजे यांच्या मागे होते,आणि पवार साहेबांच्या मनातून उतरले ,त्या दिवशी आपण सांगितले होतं ,की साताऱ्यातुन राष्ट्रवादी शिवाय कोणी निवडून येऊ शकत नाही,आणि एखाद्याने आपल्या नेत्याला विरोध करणाऱ्याला हिसका दाखवायचा ठरवलं तर, सातारी हिसका कसा असतो ,तो संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिले आहे, अश्या शब्दात उदयनराजे यांना टोला लागवला आहे.

तसेच भाजपावर निशाणा साधताना 220 युतीच्या आणि भाजपच्या 150 जागा येण्याची वल्गना करणाऱयांनी 100 मध्येचे घुटमळत राहावे लागले आहे.आणि आयाराम-गयाराम यांना प्रवेश घेऊन शंभरी गाठली ,जर त्यांना घेतले नसते ,तर 70,80 मध्ये थांबले असते ,आणि गेल्या 5 वर्षातील कारभारामुळे जनतेने भाजपाला नाकारले आहे.त्यामुळे येनकेन सता मिळवण्यापेक्षा भाजपाने आत्मचिंतन करावे आणि विरोधात बसावे असा सल्ला यावेळी जयंतराव पाटील यांनी यावेळी दिला आहे .




Conclusion:
Last Updated : Oct 25, 2019, 11:27 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.