ETV Bharat / state

हिवरे तिहेरी हत्याकांडप्रकरणी दोघांना जन्मठेप; सांगली जिल्हा न्यायालयाचा निर्णय

सांगलीच्या खानापूर तालुक्यातील हिवरे येथे 21 जून 2015 साली एकाच कुटुंबातील 3 महिलांची हत्या करण्यात आली होती. या घटनेने राज्यात खळबळ उडाली होती. आज या खून खटल्यात दोघा आरोपींना सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने आजन्म करावासाची शिक्षा सुनावली.

author img

By

Published : Feb 4, 2020, 4:57 PM IST

Updated : Feb 4, 2020, 5:27 PM IST

Hivhare Triple murder case
हिवरे तिहेरी हत्याकांड प्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा; सांगली जिल्हा न्यायालयाचा निर्णय

सांगली - हिवरे महिला तिहेरी हत्याकांडप्रकरणी सांगली जिल्हा न्यायालयाने दोघांना आजन्म कारावास व 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला. आज (मंगळवारी) झालेल्या अंतिम सुनावणीमध्ये न्यायालयाने सुधीर सदाशिव घोरपडे आणि रवींद्र रामचंद्र कदम या दोन आरोपींना शिक्षा सुनावली. या प्रकरणाचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी खटल्याचे काम पाहिले.

हिवरे तिहेरी हत्याकांडप्रकरणी दोघांना जन्मठेप; सांगली जिल्हा न्यायालयाचा निर्णय

हेही वाचा - बदनापूर नगर पंचायत मुख्याधिकाऱ्यांना लाच प्रकरणी अटक

सांगलीच्या खानापूर तालुक्यातील हिवरे येथे 21 जून 2015 साली एकाच कुटुंबातील 3 महिलांची हत्या करण्यात आली होती. या घटनेने राज्यात खळबळ उडाली होती. आज या खून खटल्यात दोघा आरोपींना सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने अजन्म करावासाची शिक्षा सुनावली. आरोपी सुधीर घोरपडे याच्या बहिणीचा हिवरे येथील शिंदे कुटुंबात विवाह झाला होता. मात्र, लग्नानंतर सासरी तिचा छळ करण्यात येत असल्याचा आरोप तिच्या माहेरकडून होत होता. त्यातच तिने आत्महत्या केली होती. तिच्या नातेवाईकांकडून आत्महत्या केली नसून सासरच्या लोकांकडूनच तिचा घातपात झाल्याची तक्रार विटा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. या खटल्यातून शिंदे कुटुंबीय निर्दोष सुटले होते.

सुधीर घोरपडे याने साथीदार रवींद्र कदमच्या मदतीने आपल्या बहिणीच्या घातपात केल्याचा बदला म्हणून शिंदे कुटुंबीयांच्या घरावर 21 जून 2015 ला हल्ला केला. यात घरातील सदस्य प्रभावती शिंदे, निशिगंधा शिंदे आणि सुनीता पाटील यांचा चाकूने गळा कापून हत्या केली होती. खटल्यामध्ये 21 साक्षीदारांचा जबाब घेतला गेला व महत्त्वपूर्ण म्हणजे बारा वर्षाच्या एका मुलाच्या साक्षीवरुन आरोपी सुधीर घोरपडे आणि रवींद्र कदम या दोघांना न्यायालयाने दोषी ठरविले.

हेही वाचा - अश्‍लील हावभाव करत बारबालांचे नृत्य, अंगावर नोटांचा पाऊस अन्‌...

सांगली - हिवरे महिला तिहेरी हत्याकांडप्रकरणी सांगली जिल्हा न्यायालयाने दोघांना आजन्म कारावास व 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला. आज (मंगळवारी) झालेल्या अंतिम सुनावणीमध्ये न्यायालयाने सुधीर सदाशिव घोरपडे आणि रवींद्र रामचंद्र कदम या दोन आरोपींना शिक्षा सुनावली. या प्रकरणाचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी खटल्याचे काम पाहिले.

हिवरे तिहेरी हत्याकांडप्रकरणी दोघांना जन्मठेप; सांगली जिल्हा न्यायालयाचा निर्णय

हेही वाचा - बदनापूर नगर पंचायत मुख्याधिकाऱ्यांना लाच प्रकरणी अटक

सांगलीच्या खानापूर तालुक्यातील हिवरे येथे 21 जून 2015 साली एकाच कुटुंबातील 3 महिलांची हत्या करण्यात आली होती. या घटनेने राज्यात खळबळ उडाली होती. आज या खून खटल्यात दोघा आरोपींना सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने अजन्म करावासाची शिक्षा सुनावली. आरोपी सुधीर घोरपडे याच्या बहिणीचा हिवरे येथील शिंदे कुटुंबात विवाह झाला होता. मात्र, लग्नानंतर सासरी तिचा छळ करण्यात येत असल्याचा आरोप तिच्या माहेरकडून होत होता. त्यातच तिने आत्महत्या केली होती. तिच्या नातेवाईकांकडून आत्महत्या केली नसून सासरच्या लोकांकडूनच तिचा घातपात झाल्याची तक्रार विटा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. या खटल्यातून शिंदे कुटुंबीय निर्दोष सुटले होते.

सुधीर घोरपडे याने साथीदार रवींद्र कदमच्या मदतीने आपल्या बहिणीच्या घातपात केल्याचा बदला म्हणून शिंदे कुटुंबीयांच्या घरावर 21 जून 2015 ला हल्ला केला. यात घरातील सदस्य प्रभावती शिंदे, निशिगंधा शिंदे आणि सुनीता पाटील यांचा चाकूने गळा कापून हत्या केली होती. खटल्यामध्ये 21 साक्षीदारांचा जबाब घेतला गेला व महत्त्वपूर्ण म्हणजे बारा वर्षाच्या एका मुलाच्या साक्षीवरुन आरोपी सुधीर घोरपडे आणि रवींद्र कदम या दोघांना न्यायालयाने दोषी ठरविले.

हेही वाचा - अश्‍लील हावभाव करत बारबालांचे नृत्य, अंगावर नोटांचा पाऊस अन्‌...

Intro:
File name - mh_sng_02_murder_shiksha_ready_to_use_7203751.


स्लग - हिवरे तिहेरी हत्याकांड प्रकरणी दोघांना मरेपर्यंत करावासाची शिक्षा...सांगली न्यायालयाने ठोठावला शिक्षा..


अँकर - हिवरे महिला तिहेरी हत्याकांड प्रकरणी दोघांना आजन्म कारावासाची शिक्षा आज सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली आहे.सुधीर सदाशिव घोरपडे आणि रवींद्र रामचंद्र कदम असे आरोपींचे नावे आहेत.विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी य खटल्याचे काम पाहिले. Body:सांगलीच्या खानापूर तालुक्यातील हिवरे येथे 21 जून 2015 साली एकाच कुटुंबातील 3 महिलांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.या घटनेने पश्चिम महाराष्ट्रात खळबळ उडाली होती.आज या खून खटल्यात दोघा आरोपींना सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने अजन्म करावासाची शिक्षा सुनावली आहे.विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले.आरोपी सुधीर घोरपडे याच्या बहिणीचा हिवरे येथील शिंदे कुटुंबात लग्न झालं होतं.मात्र लग्नानंतर सासरी तिचा छळ करण्यात येत होत,असल्याचा आरोप तिच्या माहेरकडून होत होता.त्यातच विद्याराणी हिने आत्महत्या केली होती.तर विद्याराणी हिने आत्महत्या केली नसून सासरच्या लोकांकडून तिचा घातपात झाल्याची फिर्याद विटा पोलिसांत दाखल करण्यात आली.आणि या खटल्यातून शिंदे कुटुंबीय निर्दोष सुटले होते.त्यामुळे सुधीर घोरपडे हा शिंदे कुटुंबीयावर चिडून होता. आणि बहिणीच्या आत्महत्येचा बदला म्हणून दि. 21 जून 2015 रोजी सुधीर घोरपडे आणि रवींद्र कदम या दोघांनी शिंदे वस्तीवर येवून अंदाज घेत.घरातील प्रभावती शिंदे ,निशिगंधा शिंदे आणि सुनीता पाटील यांच्यावर चाकूने गळा कापून व धारदार शस्त्रांनी वार करत निर्घृण हत्या केली होती.
पश्चिम महाराष्ट्रात गाजलेल्या या महिला तिहेरी हत्याकांड प्रकरणी सरकारकडून वकील म्हणून विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्त करण्यात आली होती.आज या खटल्याची अंतिम सुनावणी सांगली जिल्हा न्यायालयात पार पडली आहे.
आणि या खटल्यात 21 साक्षीदार आणि महत्त्वपूर्ण म्हणजे बारा वर्षाच्या एका मुलाच्या साक्षी वरून आरोपी सुधीर घोरपडे आणि रवींद्र कदम या दोघांना
दोषी ठरवत,मरे पर्यंत कारावासाची शिक्षा आणि एक लाख रुपये दंड ठोठावला आहे.

बाईट - उज्वल निकम - विशेष सरकारी वकील.

बाईट - नीलेश पवार - नातेवाईक ,हिवरे.


Conclusion:
Last Updated : Feb 4, 2020, 5:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.