ETV Bharat / state

परतीच्या पावसाने शेतकरी उद्विग्न; दीड एकरातील द्राक्षे फेकली ओढ्यात - द्राक्षे पाण्यात

कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव येथील एका शेतकऱ्याने तब्बल दीड एकर क्षेत्रात पिकवलेली द्राक्षे ओढ्यात फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. संजय मधुकर काकडे असे या शेतकऱ्याचे नाव असून, औषध फवारणीचा खर्च परवडत नसल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले.

आगळगाव येथील एका शेतकऱ्याने तब्बल दीड एकर क्षेत्रात पिकवलेली द्राक्षे ओढ्यात फेकून दिल्याचा प्रकार घडला आहे.
author img

By

Published : Nov 11, 2019, 5:39 PM IST

सांगली - लांबलेल्या परतीच्या पावसाने द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, रोगाचा प्रदुर्भाव झाल्याने द्राक्षे पाण्यात फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव येथील एका शेतकऱ्याने तब्बल दीड एकर क्षेत्रात पिकवलेली द्राक्षे ओढ्यात फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. संजय मधुकर काकडे असे या शेतकऱ्याचे नाव असून, औषध फवारणीचा खर्च परवडत नसल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले.

आगळगाव येथील एका शेतकऱ्याने तब्बल दीड एकर क्षेत्रात पिकवलेली द्राक्षे ओढ्यात फेकून दिल्याचा प्रकार घडला आहे.

सततच्या पावसाने द्राक्षबागांना रोगराईचा प्रादुर्भाव झाला. यामुळे मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस, कडेगाव तसेच जत व आटपाडी तालुक्यातील द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्याचे चित्र आहे.

अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात मणी गळून पडले. तर, काही ठिकाणी फुलोरा अवस्थेतील बागांमध्ये दावण्या आणि मेलिड्यु नामक रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. महागड्या औषधांमुळे रोगांवर नियंत्रण मिळवणे जिकिरीचे झाल्याने शेतकऱ्यांच्या हतबलतेमध्ये वाढ झाली आहे. शासनाकडून पंचनामे करण्यात आले असले, तरीही मदत मिळण्याबाबत संदिग्घता कायम असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.

याच प्रकारची परिस्थिती जिल्ह्यातील सर्व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची असून, सरकारकडून वेळीच मदत न मिळाल्यास आत्महत्या करण्याव्यतिरीक्त कोणताही पर्याय समोर नसल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.

सांगली - लांबलेल्या परतीच्या पावसाने द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, रोगाचा प्रदुर्भाव झाल्याने द्राक्षे पाण्यात फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव येथील एका शेतकऱ्याने तब्बल दीड एकर क्षेत्रात पिकवलेली द्राक्षे ओढ्यात फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. संजय मधुकर काकडे असे या शेतकऱ्याचे नाव असून, औषध फवारणीचा खर्च परवडत नसल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले.

आगळगाव येथील एका शेतकऱ्याने तब्बल दीड एकर क्षेत्रात पिकवलेली द्राक्षे ओढ्यात फेकून दिल्याचा प्रकार घडला आहे.

सततच्या पावसाने द्राक्षबागांना रोगराईचा प्रादुर्भाव झाला. यामुळे मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस, कडेगाव तसेच जत व आटपाडी तालुक्यातील द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्याचे चित्र आहे.

अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात मणी गळून पडले. तर, काही ठिकाणी फुलोरा अवस्थेतील बागांमध्ये दावण्या आणि मेलिड्यु नामक रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. महागड्या औषधांमुळे रोगांवर नियंत्रण मिळवणे जिकिरीचे झाल्याने शेतकऱ्यांच्या हतबलतेमध्ये वाढ झाली आहे. शासनाकडून पंचनामे करण्यात आले असले, तरीही मदत मिळण्याबाबत संदिग्घता कायम असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.

याच प्रकारची परिस्थिती जिल्ह्यातील सर्व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची असून, सरकारकडून वेळीच मदत न मिळाल्यास आत्महत्या करण्याव्यतिरीक्त कोणताही पर्याय समोर नसल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.

Intro:
File name - mh_sng_01_draksh_nuksan_vis_01_7203751 - to - mh_sng_01_draksh_nuksan_byt_03_7203751

स्लग - अतिवृष्टीमुळे द्राक्षबागा वाया, रोगांच्या प्रादुर्भावमुळे उद्विग्न शेतकऱ्याने दीड एकारतील द्राक्षघड फेकले पाण्यात...

अँकर - परतीच्या पाऊसाने नुकसान झालेले द्राक्षबागा शेतकरी हतबल बनला असून वाया गेलेले द्राक्ष घड पाण्यात फेकून देण्याची वेळ आली आहे.रोगांच्या
प्रादुर्भाव कवठेमहांकाळच्या आगळगाव येथील एका द्राक्षबागा शेतकऱ्याने तब्बल दीड एकर क्षेत्रातील द्राक्षघड ओढ्याच्या पाण्यात फेकून दिले आहे.Body:अवकाळी पाऊसाने सांगली जिल्ह्यातील द्राक्षबागांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे.मिरज,तासगाव ,कवठेमहांकाळ, पलूस, कडेगाव ,जत आणि आटपाडी तालुक्यातील द्राक्षबागा जवळपास उध्वस्त झाल्या आहेत.आगप छाटणी नंतर द्राक्ष घड निर्मितीसाठी आलेल्या बागा तर संपुष्टात आल्या आहेत.पाऊसामुळे मोठ्या प्रमाणात मणी गळून पडल्या आहेत,तर फुलोरा अवस्थेतील बागांमध्ये काही शिल्लक राहिले नाही.तर ज्या द्राक्ष बागा थोड्या फार प्रमाणात जगल्या आहेत,त्यांच्यावर दावण्या आणि मेलिड्यु अश्या रोगांचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे.तर या रोगांवर नियंत्रण मिळवणे हे,महागड्या औषधांमुळे जिकिरीचे बनले आहे.यामुळे शेतकरी पुरता हबकून गेला आहे.शासनाकडून पंचनामे करण्यात आलेला आहेत. मात्र सत्तेच्या घोळात मदत कधी मिळेल ,या चिंतेने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.तर ज्या शेतकऱ्यांच्या बागा पूर्णता वाया गेल्या आहेत, ते शेतकरी उद्विग्न होऊन बागा काढून टाकत आहेत,तर कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव येथील संजय मधुकर काकडे,या शेतकऱ्याची परतीच्या पावसाने संपुर्ण द्राक्ष बागेचे मोठे नुकसान झाले आहे,द्राक्षचे घड तयार अवस्थेत असताना पाउसामुळे दावण्या रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने उद्विग्न होऊन दीड एकर बागेतील संपुर्ण द्राक्ष बागेतील घड ओढ्याच्या वाहत्या पाण्यत सोडुन दिले आहेत.औषध फवारणी खर्च हा न परवडणार असल्याने काकडे यांनी हे पाऊल उचलले आहे.तर अशीच परिस्थिती जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची असून सरकारकडून वेळीच मदत न मिळाल्यास शेतकऱ्यांना आत्महत्या शिवाय पर्याय राहणार नसल्याची भावना शेतकऱ्यांच्यामधून व्यक्त होत आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.