ETV Bharat / state

सीएए आणि एनआरसी विरोधात सांगलीमध्ये सर्वपक्षीय मोर्चा

author img

By

Published : Jan 25, 2020, 4:58 PM IST

एनआरसी, सीएए आणि एनपीआर रद्द करा, या मागणीसाठी सांगली शहरातून हा मोर्चा निघाला. पुष्पराज चौक येथील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मोर्चाला सुरुवात झाली.

Sangli
सीएए आणि एनआरसी विरोधात सांगलीमध्ये सर्वपक्षीय मोर्चा

सांगली - राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि नागरिकत्व सुधारित कायद्या (सीएए) विरोधात सांगलीमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. संविधान सरंक्षणाची हाक देत काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनीही रस्त्यावर उतरत केंद्र सरकारच्या एनआरसी आणि सीएए कायदाला विरोध दर्शवला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांसह विविध सामाजिक संघटना व नागरिकांनाही या मोर्चात सहभाग घेतला होता.

सीएए आणि एनआरसी विरोधात सांगलीमध्ये सर्वपक्षीय मोर्चा

एनआरसी, सीएए आणि एनपीआर रद्द करा, या मागणीसाठी सांगली शहरातून हा मोर्चा निघाला. पुष्पराज चौक येथील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मोर्चाला सुरुवात झाली. सांगली शहरातल्या प्रमुख मार्गावरून स्टेशन चौकापर्यंत हा मोर्चा निघाला.

या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे जलसंपदामंत्री जयंतराव पाटील, कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, माजी खासदार राजू शेट्टी, काँग्रेस आमदार विक्रम सावंत, राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठा क्रांती मोर्चा, शेतकरी कष्ट मजूर संघटना अशा अनेक सामाजिक संघटना व विशेष करून मुस्लीम समाजातील महिला आणि तरुणांचा या मोर्चामध्ये मोठा सहभाग यावेळी दिसून आला. भाजप सरकारच्या विरोधात या मोर्चामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

सांगली - राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि नागरिकत्व सुधारित कायद्या (सीएए) विरोधात सांगलीमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. संविधान सरंक्षणाची हाक देत काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनीही रस्त्यावर उतरत केंद्र सरकारच्या एनआरसी आणि सीएए कायदाला विरोध दर्शवला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांसह विविध सामाजिक संघटना व नागरिकांनाही या मोर्चात सहभाग घेतला होता.

सीएए आणि एनआरसी विरोधात सांगलीमध्ये सर्वपक्षीय मोर्चा

एनआरसी, सीएए आणि एनपीआर रद्द करा, या मागणीसाठी सांगली शहरातून हा मोर्चा निघाला. पुष्पराज चौक येथील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मोर्चाला सुरुवात झाली. सांगली शहरातल्या प्रमुख मार्गावरून स्टेशन चौकापर्यंत हा मोर्चा निघाला.

या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे जलसंपदामंत्री जयंतराव पाटील, कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, माजी खासदार राजू शेट्टी, काँग्रेस आमदार विक्रम सावंत, राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठा क्रांती मोर्चा, शेतकरी कष्ट मजूर संघटना अशा अनेक सामाजिक संघटना व विशेष करून मुस्लीम समाजातील महिला आणि तरुणांचा या मोर्चामध्ये मोठा सहभाग यावेळी दिसून आला. भाजप सरकारच्या विरोधात या मोर्चामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Intro:
File name - mh_sng_01_nrc_aginest_morcha_ready_to_use_7203751

बातमी रेडी to युज आहे.

स्लग - एनआरसी आणि सीएए विरोधात सांगली मध्ये निघाला सर्वपक्षीय मोर्चा,मंत्री जयंत पाटील आणि विश्वजीत कदम ही उतरले रस्त्यावर ..


अँकर - एनआरसी आणि सीएए विरोधात सांगली मध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला आहे.संविधान सरंक्षणाची हाक देेत काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये जलसंपदा मंत्री जयंत पाटील,कृृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनीही रस्त्यावर उतरत केंद्र केंद्र सरकारच्या एनआरसी आणि सीएए कायदाला विरोध दर्शवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांसह विविध सामाजिक संघटना व नागरिकांनाही या मोर्च्यात सहभाग घेतला होता.Body:केंद्र सरकारच्या एनआरसी व सीएए कायद्याविरोधात सांगलीमध्ये आज सर्वपक्षीय संविधान संरक्षण मोर्चा काढण्यात आला.एनआरसी,सीएए आणि एनपीआर रद्द करा या मागणीसाठी सांगली शहरातून हा मोर्चा निघाला पुष्पराज चौक येथील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मशाल मोर्चा घेऊन महिलांनी प्रतिनिधित्व केलेल्या या मोर्चाने सांगली शहरातल्या प्रमुख मार्गावरून स्टेशन चौक पर्यंत हा मोर्चा काढला.या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे जलसंपदामंत्री जयंतराव पाटील,कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम,माजी खासदार राजू शेट्टी ,काँग्रेस आमदार विक्रम सावंत, राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेसचे नेत्यांच्या मोठ्या संख्येने सांगली जिल्ह्यातील नागरिकांनी सहभाग घेतला होता.मराठा क्रांती मोर्चा,शेतकरी कष्ट मजूर संघटना,अश्या अनेक सामाजिक संघटना व विशेष करून मुस्लीम समाजातल्या महिला आणि तरुणांचा या मोर्चामध्ये मोठा सहभाग यावेळी दिसून आला. भाजप सरकारच्या विरोधात या मोर्चामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.तसेच NRC व CAA विरोधातील पोस्टरही या मोर्चात लक्ष वेधून घेत होते .

बाईट - जयंतराव पाटील - जलसंपदा मंत्री.

बाईट - विश्वजीत कदम - कृषी व सहकार राज्यमंत्री.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.