ETV Bharat / state

रत्नागिरीत मतदान जागृतीसाठी २०० बोटींची समुद्रफेरी, मतदानापर्यंत एकही होडी समुद्रात जाणार नाही

मतदानाचे प्रमाण केवळ ३० ते ४० टक्के इतके कमी आहे. ते वाढून १०० टक्के व्हावे यासाठी मतदार जागृतीसाठी २०० बोटींची किनाराफेरी रत्नागिरीत काढण्यात आली.

author img

By

Published : Apr 13, 2019, 12:01 PM IST

२०० बोटींची समुद्रफेरी१

रत्नागिरी - जिल्ह्याला १६७ किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आहे. या किनाऱ्यावर राहणारे मच्छिमार आणि त्यांचे परिवारांच्या मतदानाचे प्रमाण केवळ ३० ते ४० टक्के इतके कमी आहे. ते वाढून १०० टक्के व्हावे यासाठी मतदार जागृतीसाठी २०० बोटींची किनाराफेरी रत्नागिरीत काढण्यात आली.

रत्नागिरी २०० बोटींची किनाराफेरी

लोकसभा निवडणुकीत सर्व मच्छिमार बांधवानी १०० टक्के मतदान करावे, असे आवाहन रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा रत्नागिरी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी केले. याला प्रतिसाद देत १८ एप्रिलनंतर मतदान होईपर्यंत एकही होडी समुद्रात जाणार नाही, असा निर्णय मच्छिमारांनी घेतला. उपक्रमाच्या संकल्पनेबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांचे मी अभिनंदन करतो, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.


स्व्हीप अंतर्गत २०० बोटींचा समावेश असणारी आगळी किनारा फेरी काढण्यात आली. स्व्हीप कार्यक्रमाच्या प्रमुख असलेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम झाला. या कार्यक्रमास पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय आनंद पालव, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, लिड बँक व्यवस्थापक अडसूळ, पर्ससीन मच्छिमार मालक असोसिएशनचे अध्यक्ष विलास सावंत, उपाध्यक्ष नासीर वाघू, सचिव जावेद होडेकर, जिल्हा मच्छिमार संघाचे अध्यक्ष सुलेमान मुल्ला, आदर्श मच्छिमार सोसायटीचे इम्रान मुकादम आदींची मुख्य उपस्थिती होती.

रत्नागिरी - जिल्ह्याला १६७ किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आहे. या किनाऱ्यावर राहणारे मच्छिमार आणि त्यांचे परिवारांच्या मतदानाचे प्रमाण केवळ ३० ते ४० टक्के इतके कमी आहे. ते वाढून १०० टक्के व्हावे यासाठी मतदार जागृतीसाठी २०० बोटींची किनाराफेरी रत्नागिरीत काढण्यात आली.

रत्नागिरी २०० बोटींची किनाराफेरी

लोकसभा निवडणुकीत सर्व मच्छिमार बांधवानी १०० टक्के मतदान करावे, असे आवाहन रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा रत्नागिरी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी केले. याला प्रतिसाद देत १८ एप्रिलनंतर मतदान होईपर्यंत एकही होडी समुद्रात जाणार नाही, असा निर्णय मच्छिमारांनी घेतला. उपक्रमाच्या संकल्पनेबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांचे मी अभिनंदन करतो, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.


स्व्हीप अंतर्गत २०० बोटींचा समावेश असणारी आगळी किनारा फेरी काढण्यात आली. स्व्हीप कार्यक्रमाच्या प्रमुख असलेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम झाला. या कार्यक्रमास पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय आनंद पालव, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, लिड बँक व्यवस्थापक अडसूळ, पर्ससीन मच्छिमार मालक असोसिएशनचे अध्यक्ष विलास सावंत, उपाध्यक्ष नासीर वाघू, सचिव जावेद होडेकर, जिल्हा मच्छिमार संघाचे अध्यक्ष सुलेमान मुल्ला, आदर्श मच्छिमार सोसायटीचे इम्रान मुकादम आदींची मुख्य उपस्थिती होती.

Intro:मतदार जागृतीसाठी 200 बोटींची किनाराफेरी

आठ दिवस मासेमारी बंद ठेवणार

मच्छिमारांचा सकारात्मक प्रतिसाद

रत्नागिरी, प्रतिनिधी

मतदार जागृतीसाठी आज 200 बोटींची किनाराफेरी रत्नागिरीत काढण्यात आली.. या जिल्ह्यास 167 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आहे. या किनाऱ्यावर राहणारे हे मच्छिमार व त्यांचे परिवार यांच्या मतदानाचे प्रमाण केवळ 30 ते 40 टक्के इतके कमी आहे ते वाढून 100 टक्के व्हावे यासाठी हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
स्व्हीप अंतर्गत आज 200 बोटींचा समावेश असणारी आगळी किनारा फेरी आज काढण्यात आली. स्व्हीप कार्यक्रमाच्या प्रमुख असलेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम झाला.
         या कार्यक्रमास पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय आनंद पालव, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, लिड बँक व्यवस्थापक अडसूळ तसेच पर्ससीन मच्छिमार मालक असोसिएशनचे अध्यक्ष विलास सावंत, उपाध्यक्ष नासीर वाघू, सचिव जावेद होडेकर, जिल्हा मच्छिमार संघाचे अध्यक्ष सुलेमान मुल्ला, आदर्श मच्छिमार सोसायटीचे इम्रान मुकादम आदींची मुख्य उपस्थिती होती.
लोकसभा निवडणुकीत सर्व मच्छिमार बांधवानी 100 टक्के मतदान करावे असे आवाहन 46 रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा रत्नागिरी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी केले. याला प्रतिसाद देत 18 एप्रिलनंतर मतदान होईपर्यंत एकही होडी समुद्रात जाणार नाही असा निर्णय घेत त्याच स्वरुपाचा प्रतिसाद मच्छिमारांनी दिला. या उपक्रमाच्या संकल्पनेबद्दल सीइओ गोयल यांचे मी अभिनंदन करतो असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.
         यावेळी छोटेखानी कार्यक्रमात सर्वांचे स्वागत करण्यात आले. स्वत: आंचल गोयल यांनी मच्छिमार कुटूंबातील महिलांना गुलाबपुष्प देवून त्यांच्याशी संवाद साधला व मतदानाचे आवाहन केले. त्याला सर्व महिलांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
         200 बोटींचा हा काफिला त्यानंतर भगवती बंदरपर्यंत सागरफेरी करुन पुन्हा मिरकरवाडा येथे दाखला झाला. मच्छिमार बोटींवर महिला कधी जात नाहीत परंतु या बोटींच्या फेरीत एक बोट महिलांची होती हे या किनारा फेरीचे वैशिष्ट्य ठरले.

Byte - सुनील चव्हाण, जिल्हाधिकारीBody:मतदार जागृतीसाठी 200 बोटींची किनाराफेरी

आठ दिवस मासेमारी बंद ठेवणार

मच्छिमारांचा सकारात्मक प्रतिसादConclusion:मतदार जागृतीसाठी 200 बोटींची किनाराफेरी

आठ दिवस मासेमारी बंद ठेवणार

मच्छिमारांचा सकारात्मक प्रतिसाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.