ETV Bharat / state

आमचं इथं कोणीचं दिसना....काळरात्रीची घटना प्रत्यक्षदर्शींच्या तोंडून

चिपळूण तालुक्यातील तिवरे गावातील लघुपाटबंधारे विभागाचे तिवरे धरण मंगळवारी रात्री फुटले. मात्र, या दुर्घटनेनंतर इथल्या खुणासुद्धा पुसून गेल्या आहेत.

author img

By

Published : Jul 3, 2019, 1:00 PM IST

Updated : Jul 3, 2019, 1:13 PM IST

आमचं इथं कोणीचं दिसना....काळरात्रीची घटना प्रत्यक्षदर्शींच्या तोंडून

रत्नागिरी - चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण मंगळवारी रात्री फुटले आणि होत्याचे नव्हते झाले. या धरणाशेजारी असलेल्या भेंडेवाडीतील जवळपास 12 ते 15 कुटुंबातील 24 माणसं बेपत्ता झाली. कामानिमित्त शहरात असलेले घटनेची माहिती कळताच रात्रीच घटनास्थळी आले. मात्र, त्यांना दिसला तो चिखल, वाहून गेलेली घरं, मोडलेले वासे. त्यामुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली. कोणाचे आई-वडील गेले होते, तर कोणाचे भाऊ, कोणाचा मुलगा, मुलगी तर कोणाचं अख्य कुटुंबच वाहून गेलं होतं. आपलं कोणीच दिसत नाही, हे पाहून अनेकांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकत होता.

आमचं इथं कोणीचं दिसना....काळरात्रीची घटना प्रत्यक्षदर्शींच्या तोंडून

चिपळूण तालुक्यातील तिवरे गावातील लघुपाटबंधारे विभागाचे तिवरे धरण मंगळवारी रात्री फुटले. मात्र, या दुर्घटनेनंतर इथल्या खुणासुद्धा पुसून गेल्या आहेत. या ठिकाणी एक गणपतीचे मंदिर होते. मात्र, त्याची एकही खून जाग्यावर नाही. इथली घरे वाहून गेली आहेत. तिवरे धरण फुटल्यानंतर काही क्षणात भेंडेवाडी होत्याची नव्हती झाली. धरण फुटल्यानंतर इथली परिस्थिती क्षणार्धात कशी बदलली हे गावातील लोकांकडून जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधींनी...

काय आहे घटना -
मुंबईसह कोकणच्या काही भागात मुसळधार पाऊस पडत होता. सह्याद्री खोऱ्यामध्येही पावसाचे प्रमाण अधिक आहे. त्यात तिवरे गाव चिपळूण तालुक्याच्या एका टोकाला आहे. तसा हा भाग दुर्गम आहे. या तिवरे गावात बांधण्यात आलेले धरण 2000 साली पूर्णत्वास गेले होते. या धरणाच्या पाण्याची पूर्ण संचय पातळी 139 मीटर आहे. या धरणाच्या पाणी साठ्याची एकूण क्षमता 2.45 दशलक्ष घनमीटर एवढी आहे. या धरणातील पाण्याचा दसपटीतील अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासह शेतीला उपयोग होत होता. प्रशासनाच्या 2 जुलैच्या अव्हालानुसार हे धरण 27.59 टक्के भरलं होते. एकूण 131 मीटर पाणीपातळी धरणात होती.दरम्यान या धरणाला दोन वर्षांपूर्वी गळती लागली होती. गेल्यावर्षी या गळतीत वाढ झाली होती. या गळतीमुळे धरणाच्या मुख्य दरवाज्याशेजारी भगदाड पडले होते. याची वेळेत दुरुस्ती करण्याची मागणीही करण्यात आली होती. ग्रामस्थांच्या तक्रारी नंतर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून गेल्यावर्षी या धरणाची संयुक्त पाहणी करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही धरणाच्या दुरुस्तीला काही वेग आला नव्हता. पावसाळ्यापूर्वी धरणाची दुरुस्ती न झाल्यास पावसाळ्यात धरणाला धोका पोहोचण्याचा शक्यताही वर्तविण्यात येत होती.

रत्नागिरी - चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण मंगळवारी रात्री फुटले आणि होत्याचे नव्हते झाले. या धरणाशेजारी असलेल्या भेंडेवाडीतील जवळपास 12 ते 15 कुटुंबातील 24 माणसं बेपत्ता झाली. कामानिमित्त शहरात असलेले घटनेची माहिती कळताच रात्रीच घटनास्थळी आले. मात्र, त्यांना दिसला तो चिखल, वाहून गेलेली घरं, मोडलेले वासे. त्यामुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली. कोणाचे आई-वडील गेले होते, तर कोणाचे भाऊ, कोणाचा मुलगा, मुलगी तर कोणाचं अख्य कुटुंबच वाहून गेलं होतं. आपलं कोणीच दिसत नाही, हे पाहून अनेकांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकत होता.

आमचं इथं कोणीचं दिसना....काळरात्रीची घटना प्रत्यक्षदर्शींच्या तोंडून

चिपळूण तालुक्यातील तिवरे गावातील लघुपाटबंधारे विभागाचे तिवरे धरण मंगळवारी रात्री फुटले. मात्र, या दुर्घटनेनंतर इथल्या खुणासुद्धा पुसून गेल्या आहेत. या ठिकाणी एक गणपतीचे मंदिर होते. मात्र, त्याची एकही खून जाग्यावर नाही. इथली घरे वाहून गेली आहेत. तिवरे धरण फुटल्यानंतर काही क्षणात भेंडेवाडी होत्याची नव्हती झाली. धरण फुटल्यानंतर इथली परिस्थिती क्षणार्धात कशी बदलली हे गावातील लोकांकडून जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधींनी...

काय आहे घटना -
मुंबईसह कोकणच्या काही भागात मुसळधार पाऊस पडत होता. सह्याद्री खोऱ्यामध्येही पावसाचे प्रमाण अधिक आहे. त्यात तिवरे गाव चिपळूण तालुक्याच्या एका टोकाला आहे. तसा हा भाग दुर्गम आहे. या तिवरे गावात बांधण्यात आलेले धरण 2000 साली पूर्णत्वास गेले होते. या धरणाच्या पाण्याची पूर्ण संचय पातळी 139 मीटर आहे. या धरणाच्या पाणी साठ्याची एकूण क्षमता 2.45 दशलक्ष घनमीटर एवढी आहे. या धरणातील पाण्याचा दसपटीतील अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासह शेतीला उपयोग होत होता. प्रशासनाच्या 2 जुलैच्या अव्हालानुसार हे धरण 27.59 टक्के भरलं होते. एकूण 131 मीटर पाणीपातळी धरणात होती.दरम्यान या धरणाला दोन वर्षांपूर्वी गळती लागली होती. गेल्यावर्षी या गळतीत वाढ झाली होती. या गळतीमुळे धरणाच्या मुख्य दरवाज्याशेजारी भगदाड पडले होते. याची वेळेत दुरुस्ती करण्याची मागणीही करण्यात आली होती. ग्रामस्थांच्या तक्रारी नंतर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून गेल्यावर्षी या धरणाची संयुक्त पाहणी करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही धरणाच्या दुरुस्तीला काही वेग आला नव्हता. पावसाळ्यापूर्वी धरणाची दुरुस्ती न झाल्यास पावसाळ्यात धरणाला धोका पोहोचण्याचा शक्यताही वर्तविण्यात येत होती.

Intro:ती नजर शोधतेय रक्ताच्या नात्याला
रत्नागिरी, प्रतिनिधी
चिपळूण तालुक्यातील तीवरे धरण मंगळवारी रात्री फुटलं आणि होत्याच नव्हतं झालं.. मंगळवारी रात्री या धरणाशेजारी असलेल्या भेंदवाडीतल्या घरांमधील माणसं काही जेवण करत होती, तर काही दिवसभर थकून भागून आल्यामुळे झोपण्याच्या तयारीत होते.. मात्र अशातच त्यांच्यावर काळाने घाला घातला.. गळती लागलेलं धरण साडेनऊच्या सुमारास फुटलं आणि होत्याचं नव्हतं झालं.. जवळपास 12 ते 15 कुटुंबातील 24 माणसं बेपत्ता झाली. काही दूर वर फेकली गेली, तर काही प्रवाहाबरोबर वाहून गेली.. पाणी ओसरून गेल्यावर अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली पण होत्याचं नव्हतं झालं होतं.. कामानिमित्त शहरात असलेले घटनेची माहिती कळताच रात्रीच आपली माणसं, घरं पाहण्यासाठी वाडीत आले.. मात्र त्यांना दिसलं ते चिखल, वाहून गेलेली घरं, मोडलेले वासे.. त्यामुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली होती. कोणाचे आईवडील गेले होते, तर कोणाचे भाऊ, कोणाचा मुलगा, मुलगी तर कोणाचं अख्य कुटुंब वाहून गेलं होतं.. आपलं कोणीच दिसत नाही, हे पाहून फोडला जाणारा हंबरडा हृदय पिळवटून टाकत होता..

स्मिता चव्हाण - नातेवाईक-

आजी --
3- byte

---//////////////

चिपळूण तालुक्यातील तिवरे गावातील लघुपाटबंधारे विभागाचे धरण फुटलं. मात्र या दुर्घटनेनंतर इथल्या खुणा सुद्धा पुसून गेल्या आहेत. या ठिकाणी एक गणपतीचं मंदिर होतं, मात्र त्याची एकही खून जाग्यावर नाही..इथली घरं वाहून गेली.. तिवरे धरण फुटल्यानंतर काही क्षणात भेंडे वाडीची होत्याची नव्हती झाली. धरण फुटल्यानंतर इथली काय अवस्था आधी होती आणि आता काय झालंय हे गावातील बुजुर्ग लोकांकडून जाणून घेतलंय आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी..

बाईट-१- १२१--- बुर्जुग व्यक्तीसोबत( त्यांनी हातात छत्री घेतली आहे)

-----------

अँकर- रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास तिवरे धरण फुटले आणि इथलं एक एक घर या पाण्याच्या लोढ्यांनी गिळंकृत केलं. काय भयानक अवस्था पाण्याच्या लोढ्यामुळे इथल्या घरांची झालीय त्याचा आढावा घेतलाय आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी..

बाईट-२- wkt--- घराची वाईट अवस्था सांगणारा

-----------



----------

अँकर- तिवरे धरण २००० सालात पुर्ण झाले. मात्र त्यानंतर काही वर्षांतच या धरणाला गळती लागली. किरकोळ दुरुस्ती वगळता या धरणाची गळती कधी काढली गेली नाही. तिवरे धरण हे धरणाला गळती लागल्याने फुटल्याचा आरोप इथल्या ग्रामस्थांनी केलाय. या धरणात केवळ २८ टक्के पाणीसाठा होता. पण २८ टक्के पाणीसाठा असलेलं धरण रात्री क्षणात फुटलं. पाटबंधारे खात्याने या धरणाच्या गळतीकडे वेळीच लक्ष्य दिलं असतं तर हा धोका टाळता आला असता. धरण फुटल्यानंतर आता हे धरण पुर्ण रिकाम झालंय. हजारो क्युसेक्स पाण्यानी भेंडेवाडीतले संसाराची राखरांगोळी केली. धरण फुटल्यानंतर इथल्या भयाण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी..

Wkt dam




Body:DamConclusion:Dam
Last Updated : Jul 3, 2019, 1:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.