ETV Bharat / state

रिफायनरी वाद अशोक वालम यांच्याकडून उदय सामंत यांचं कौतुक तर राजन साळवींवर टीका

author img

By

Published : Mar 19, 2019, 6:18 PM IST

Updated : Mar 19, 2019, 10:59 PM IST

सुकथनकर समिती रत्नागिरीत आली होती. त्याच्या आदल्या दिवशी आमदार राजन साळवी जिल्हाधिकाऱ्यांकडे का गेले होते? त्यांनी विनाकारण माझ्यावर भाष्य करू नये. माझ्याकडे भरपूर मटेरियल आहे. त्यांच्याविषयी मी बोलणे टाळणार आहे. मात्र, माझ्याविषयी बोलणार असतील, तर त्यांचा इतिहास बाहेर काढणार असल्याचा इशाराही वालम यांनी यावेळी दिला.

कोकण शक्ती महासंघाचे अध्यक्ष अशोक वालम

रत्नागिरी - रिफायनरी प्रकल्पावरून कोकण शक्ती महासंघाचे अध्यक्ष अशोक वालम यांनी म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांचे कौतुक केले, तर आमदार राजन साळवी यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाचा अध्यादेश रद्द करण्यासाठी शेवटच्या टप्प्यात सामंत यांनीच महत्त्वाची भूमिका मांडली, तर आमदार राजन साळवी यांचे योगदान नसल्याचे वालम म्हणाले.

रिफायनरी वादाबद्दल बोलताना अशोक वालम

राजापूर तालुक्यातील नाणार परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प अखेर रद्द झाला आहे. यामध्ये कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितीने महत्वाची भूमिका पार पाडली. प्रकल्प रद्द होण्यासाठी समितीने सर्वच पक्षांना साकडे घातले होते. अखेर जनतेच्या हट्टामुळे प्रकल्प रद्द करावा लागला. शिवसेनेने शेवटच्या क्षणी महत्त्वाची भूमिका बजावली.

सुकथनकर समिती रत्नागिरीत आली होती. त्याच्या आदल्या दिवशी आमदार राजन साळवी जिल्हाधिकाऱ्यांकडे का गेले होते? त्यांनी विनाकारण माझ्यावर भाष्य करू नये. माझ्याकडे भरपूर मटेरियल आहे. त्यांच्याविषयी मी बोलणे टाळणार आहे. मात्र, माझ्याविषयी बोलणार असतील, तर त्यांचा इतिहास बाहेर काढणार असल्याचा इशाराही वालम यांनी यावेळी दिला.

रिफायनरी अध्यादेश रद्द करण्यासाठी शेवटच्या टप्प्यात सामंत यांनी महत्वाची भूमिका बजावल्याबद्दल त्यांचे आभारही वालम यांनी मानले. याउलट आमदार राजन साळवी यांनी प्रकल्प रद्द करण्यासाठी आंदोलनात उतरून कधीही मदत केली नसल्याचेही वालम यांनी यावेळी म्हटले आहे.

रत्नागिरी - रिफायनरी प्रकल्पावरून कोकण शक्ती महासंघाचे अध्यक्ष अशोक वालम यांनी म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांचे कौतुक केले, तर आमदार राजन साळवी यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाचा अध्यादेश रद्द करण्यासाठी शेवटच्या टप्प्यात सामंत यांनीच महत्त्वाची भूमिका मांडली, तर आमदार राजन साळवी यांचे योगदान नसल्याचे वालम म्हणाले.

रिफायनरी वादाबद्दल बोलताना अशोक वालम

राजापूर तालुक्यातील नाणार परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प अखेर रद्द झाला आहे. यामध्ये कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितीने महत्वाची भूमिका पार पाडली. प्रकल्प रद्द होण्यासाठी समितीने सर्वच पक्षांना साकडे घातले होते. अखेर जनतेच्या हट्टामुळे प्रकल्प रद्द करावा लागला. शिवसेनेने शेवटच्या क्षणी महत्त्वाची भूमिका बजावली.

सुकथनकर समिती रत्नागिरीत आली होती. त्याच्या आदल्या दिवशी आमदार राजन साळवी जिल्हाधिकाऱ्यांकडे का गेले होते? त्यांनी विनाकारण माझ्यावर भाष्य करू नये. माझ्याकडे भरपूर मटेरियल आहे. त्यांच्याविषयी मी बोलणे टाळणार आहे. मात्र, माझ्याविषयी बोलणार असतील, तर त्यांचा इतिहास बाहेर काढणार असल्याचा इशाराही वालम यांनी यावेळी दिला.

रिफायनरी अध्यादेश रद्द करण्यासाठी शेवटच्या टप्प्यात सामंत यांनी महत्वाची भूमिका बजावल्याबद्दल त्यांचे आभारही वालम यांनी मानले. याउलट आमदार राजन साळवी यांनी प्रकल्प रद्द करण्यासाठी आंदोलनात उतरून कधीही मदत केली नसल्याचेही वालम यांनी यावेळी म्हटले आहे.

Intro:रिफायनरी वाद
अशोक वालम यांच्याकडून उदय सामंत यांचं कौतुक तर राजन साळवींवर टीका


रत्नागिरी, प्रतिनिधी

प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाचा अध्यादेश रद्द करण्यासाठी शेवटच्या टप्प्यात जर महत्त्वाची कोणी भूमिका मांडली असेल तर ती म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनीच मांडली असून आमदार राजन साळवी यांचं यामध्ये काहीही योगदान नसल्याची टीका कोकण शक्ती महासंघाचे अध्यक्ष अशोक वालम यांनी केली आहे.. ते आज रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते.. तसेच आपला पक्ष विधानसभा निवडणुकीत 3 जागा लढविणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं..
राजापूर तालुक्यातील नाणार परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प अखेर रद्द झाला आहे. यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली ती कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितीने.. हा प्रकल्प रद्द व्हावा यासाठी समितीने सर्वच पक्षांना साकडं घातलं होतं.. अखेर जनरेट्यापुढे हा प्रकल्प रद्द करावा लागला.. शिवसेनेने शेवटच्या क्षणी भूमिका महत्त्वाची भूमिका बजावली.. पण आमदार राजन साळवी यांना आपल्यावर टीका करण्याचा अधिकार नसल्याचं सांगत वालम यांनी साळवींवर पत्रकार परिषदेत जोरदार टीका केली... सुकथनकर समिती ज्यावेळी रत्नागिरीत आली होती, त्याच्या आदल्या दिवशी आमदार राजन साळवी का गेले होते जिल्हाधिकाऱ्यांकडे.. त्यांनी विनाकारण माझ्यावर भाष्य करू नये, माझ्याकडे भरपूर मटेरियल आहे, त्यांच्याविषयी मी बोलणे टाळणार, पण माझ्याविषयी बोलणार असतील तर इतिहास बाहेर काढेन असा इशारा वालम यांनी यावेळी दिला.. दरम्यान रिफायनरी अध्यादेश रद्द करण्यासाठी शेवटच्या टप्प्यात म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी महत्वाची भूमिका बजावली.. त्यांचे मी जाहीररित्या आभार मानतो.. पण आमदार राजन साळवी यांनी प्रकल्प रद्द करण्यासाठी आंदोलनात उतरून कधीही मदत केली नाही, असा टोलाही यावेळी वालम यांनी लगावला..

Byte --- अशोक वालम, अध्यक्ष- कोकण शक्ती महासंघBody:अशोक वालम यांच्याकडून उदय सामंत यांचं कौतुक तर राजन साळवींवर टीका
Conclusion:अशोक वालम यांच्याकडून उदय सामंत यांचं कौतुक तर राजन साळवींवर टीका
Last Updated : Mar 19, 2019, 10:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.