ETV Bharat / state

रत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणूक; 'शिवसेनेने निवडणूक लादली'

नगराध्यक्षांच्या राजीनाम्यामुळे या पदासाठी पोटनिवडणूक लागली. यासाठी 29 डिसेंबरला मतदान होणार आहे. लगेच दुसर्‍या दिवशी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीत शिवसेनेकडून प्रदीप उर्फ बंडया साळवी तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगराध्यक्ष मिलिंद किर, भाजपकडून जिल्हाध्यक्ष अॅड दीपक पटवर्धन, मनसेकडून रुपेश सावंत तर मुकुंद जोशी अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.

author img

By

Published : Dec 16, 2019, 5:32 PM IST

Updated : Dec 16, 2019, 6:17 PM IST

Ratnagiri MNC
रत्नागिरी नगर परिषद

रत्नागिरी - नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची सध्या पोटनिवडणूक लागली आहे. मात्र, शिवसेनेने ही निवडणूक लादली असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांनी केला. जनता या निवडणुकीत शिवसेनेला जागा दाखवेल आणि भाजपचे उमेदवार अॅड. दीपक पटवर्धन यांचा 100 टक्के विजय होईल, असा विश्वास भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी केला आहे.

रत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणूक

तर सुसंस्कृत आणि एक उच्चशिक्षित उमेदवार म्हणून जनतेने राहुल पंडित यांना नगराध्यक्ष म्हणून भरघोस मतांनी निवडून दिले. मात्र जनतेच्या आशा आकांक्षांवर पाणी फिरवत शिवसेनेने त्यांना राजीनामा द्यायला लावला. त्यामुळे जनतेचा मनात असलेला आक्रोश यावेळी मतदानातून दिसेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मिलिंद किर यांनी दिली आहे.

हेही वाचा - 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये चंद्रकांत पाटलांनीच केला भ्रष्टाचार'

दरम्यान, नगराध्यक्षांच्या राजीनाम्यामुळे या पदासाठी पोटनिवडणूक लागली. यासाठी 29 डिसेंबरला मतदान होणार आहे. लगेच दुसर्‍या दिवशी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीत शिवसेनेकडून प्रदीप उर्फ बंडया साळवी तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगराध्यक्ष मिलिंद किर, भाजपकडून जिल्हाध्यक्ष अॅड दीपक पटवर्धन, मनसेकडून रुपेश सावंत तर मुकुंद जोशी अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.

हेही वाचा - पॅन-आधार जोडणी ३१ डिसेंबरपर्यंत बंधनकारक - प्राप्तिकर विभाग

नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी राजीनामा का दिला ?

रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी राहुल पंडित 2016 मध्ये थेट जनतेतून निवडून आले. मात्र, अडीच वर्षांचा कार्यकाल संपताच त्यांनी राजीनामा द्यावा, अशी पक्षांतर्गत तडजोड झाली होती. त्यानंतर राहुल पंडित यांनी आपल्या कार्यकाळाला 2 वर्ष होताच आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यावरून अनेक चर्चा रंगल्या. मात्र, शिवसेना नेत्यांकडून हा राजीनामा स्वीकारण्यात आला नव्हता.

लोकसभा निवडणूकीची धामधूम सुरू झाल्यावर पंडित यांच्याकडे खास जबाबदारी पक्षाकडून सोपवण्यात आली होती. या काळात कायद्यातील तरतुदीनुसार त्यांना संघटनेने तीन महिने रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 12 जानेवारी 2019 रोजी प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी प्रभारी नगराध्यक्ष पदाचा पदभार हाती घेतला. दरम्यान, तीन महिन्यांच्या सुट्टीच्या कालावधीनंतर नगराध्यक्ष राहुल पंडित हे कागदोपत्री पुन्हा हजर झाले. आणि 27 मे रोजी राहुल पंडित यांनी अखेर आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला. तेव्हापासून गटनेते प्रदीप उर्फ बंडया साळवी प्रभारी नगराध्यक्ष आहेत.

रत्नागिरी - नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची सध्या पोटनिवडणूक लागली आहे. मात्र, शिवसेनेने ही निवडणूक लादली असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांनी केला. जनता या निवडणुकीत शिवसेनेला जागा दाखवेल आणि भाजपचे उमेदवार अॅड. दीपक पटवर्धन यांचा 100 टक्के विजय होईल, असा विश्वास भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी केला आहे.

रत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणूक

तर सुसंस्कृत आणि एक उच्चशिक्षित उमेदवार म्हणून जनतेने राहुल पंडित यांना नगराध्यक्ष म्हणून भरघोस मतांनी निवडून दिले. मात्र जनतेच्या आशा आकांक्षांवर पाणी फिरवत शिवसेनेने त्यांना राजीनामा द्यायला लावला. त्यामुळे जनतेचा मनात असलेला आक्रोश यावेळी मतदानातून दिसेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मिलिंद किर यांनी दिली आहे.

हेही वाचा - 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये चंद्रकांत पाटलांनीच केला भ्रष्टाचार'

दरम्यान, नगराध्यक्षांच्या राजीनाम्यामुळे या पदासाठी पोटनिवडणूक लागली. यासाठी 29 डिसेंबरला मतदान होणार आहे. लगेच दुसर्‍या दिवशी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीत शिवसेनेकडून प्रदीप उर्फ बंडया साळवी तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगराध्यक्ष मिलिंद किर, भाजपकडून जिल्हाध्यक्ष अॅड दीपक पटवर्धन, मनसेकडून रुपेश सावंत तर मुकुंद जोशी अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.

हेही वाचा - पॅन-आधार जोडणी ३१ डिसेंबरपर्यंत बंधनकारक - प्राप्तिकर विभाग

नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी राजीनामा का दिला ?

रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी राहुल पंडित 2016 मध्ये थेट जनतेतून निवडून आले. मात्र, अडीच वर्षांचा कार्यकाल संपताच त्यांनी राजीनामा द्यावा, अशी पक्षांतर्गत तडजोड झाली होती. त्यानंतर राहुल पंडित यांनी आपल्या कार्यकाळाला 2 वर्ष होताच आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यावरून अनेक चर्चा रंगल्या. मात्र, शिवसेना नेत्यांकडून हा राजीनामा स्वीकारण्यात आला नव्हता.

लोकसभा निवडणूकीची धामधूम सुरू झाल्यावर पंडित यांच्याकडे खास जबाबदारी पक्षाकडून सोपवण्यात आली होती. या काळात कायद्यातील तरतुदीनुसार त्यांना संघटनेने तीन महिने रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 12 जानेवारी 2019 रोजी प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी प्रभारी नगराध्यक्ष पदाचा पदभार हाती घेतला. दरम्यान, तीन महिन्यांच्या सुट्टीच्या कालावधीनंतर नगराध्यक्ष राहुल पंडित हे कागदोपत्री पुन्हा हजर झाले. आणि 27 मे रोजी राहुल पंडित यांनी अखेर आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला. तेव्हापासून गटनेते प्रदीप उर्फ बंडया साळवी प्रभारी नगराध्यक्ष आहेत.

Intro:रत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणूक

शिवसेनेने लादलेल्या निवडणुकीमुळे जनतेचा असंतोष मतदानातून दिसेल - विरोधकांचं टीकास्त्र

रत्नागिरी, प्रतिनिधी


रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची सध्या पोटनिवडणूक लागली आहे. मात्र शिवसेनेने ही निवडणूक लादली असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांनी प्रचारात राळ उडवून दिली आहे. ही निवडणूक लादण्यात आल्यामुळे जनतेमध्ये असंतोष आहे, त्यामुळे जनता या निवडणुकीत शिवसेनेला जागा दाखवेल असं विरोधी पक्ष म्हणत आहेत. मात्र ही निवडणूक नेमकी का लागली, जनतेमधून निवडून आलेल्या नगराध्यक्ष राहुल पंडीत यांनी राजीनामा का दिला. पाहूया या संदर्भातील एक रिपोर्ट..

रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी राहुल पंडित 2016 मध्ये थेट जनतेतून निवडून आले. मात्र अडीच वर्षांचा कार्यकाल संपताच त्यांनी राजीनामा द्यावा अशी पक्षातर्गत तडजोड झाली होती. त्यानंतर राहुल पंडित यांनी आपल्या कार्यकाळाला 2 वर्ष होताच आपल्या पदाचा राजीनामा रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरीचरणी ठेवला होता. त्यावरून अनेक चर्चा रंगल्या. मात्र शिवसेना नेत्यांकडून हा राजीनामा स्वीकारण्यात आला नव्हता.
लोकसभा निवडणूकीची धामधुम सुरू झाल्यावर पंडित यांच्याकडे खास जबाबदारी पक्षाकडून सोपवण्यात आली होती. या काळात कायद्यातील तरतुदीनुसार त्यांना संघटनेने तीन महिने रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 12 जानेवारी 2019 रोजी प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी प्रभारी नगराध्यक्ष पदाचा पदभार हाती घेतला. दरम्यान तीन महिन्यांच्या सुट्टीच्या कालावधीनंतर नगराध्यक्ष राहुल पंडित हे कागदोपत्री पुन्हा हजर झाले. आणि 27 मे रोजी राहुल पंडित यांनी अखेर आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला.. तेव्हापासून गटनेते प्रदीप उर्फ बंडया साळवी प्रभारी नगराध्यक्ष आहेत. दरम्यान नागराध्यक्षांच्या राजीनाम्यामुळे या पदासाठी पोटनिवडणूक लागली असून 29 डिसेंबरला मतदान होणार असून लगेच दुसर्‍या दिवशी मतमोजणी होणार आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून अपेक्षेप्रमाणे प्रदीप उर्फ बंडया साळवी रिंगणात आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगराध्यक्ष मिलिंद किर, भाजपकडून जिल्हाध्यक्ष ऍड दीपक पटवर्धन, मनसेकडून रुपेश सावंत तर मुकुंद जोशी अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.
दरम्यान सुसंस्कृत आणि एक उच्चशिक्षित उमेदवार म्हणून जनतेने राहुल पंडित यांना नागराध्यक्ष म्हणून भरघोस मतांनी निवडून दिलं. मात्र जनतेच्या आशा आकांक्षांवर पाणी फिरवत शिवसेनेने त्यांना राजीनामा द्यायला लावला. त्यामुळे जनतेचा याबाबत राग आहे, आणि राग, आक्रोश यावेळी स्पष्टपणे मतदानातून दिसेल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मिलिंद किर यांनी दिली आहे.
तर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनीही या निवडणुकीवरून शिवसेनेवर जोरदार टीका करत भाजपचे उमेदवार ऍड दीपक पटवर्धन यांचा 100 टक्के विजय होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. नगर परिषदांमध्ये स्थिर सरकार किंवा राजवट मिळावी यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांचा निर्णय घेतला, मात्र त्याला काळं फासण्याचं रत्नागिरीत शिवसेनीच्या मंडळींनी केलेलं आहे. त्यामुळे हा रत्नागिरीच्या मतदारांचा अपमान आहे. राहुल पंडित हे बहुमताने नगराध्यक्ष म्हणून जनतेतून निवडून आले होते, मात्र शिवसेनेने मनमानी करून राहुल पंडित यांचा राजीनामा घेतला आणि ही निवडणूक लादली गेली आहे. पण मतदार सुजाण आहे, हा मतदार नक्कीच भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ऍड दीपक पटवर्धन यांच्या पाठीशी उभा राहिल आणि त्यांना भरघोस मतांनी विजयी करेल असा विश्वास बाळ माने यांनी व्यक्त केला आहे.

Byte - मिलिंद किर, उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस
बाळ माने, माजी जिल्हाध्यक्ष , भाजप
Body:रत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणूक

शिवसेनेने लादलेल्या निवडणुकीमुळे जनतेचा असंतोष मतदानातून दिसेल - विरोधकांचं टीकास्त्र
Conclusion:रत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणूक

शिवसेनेने लादलेल्या निवडणुकीमुळे जनतेचा असंतोष मतदानातून दिसेल - विरोधकांचं टीकास्त्र
Last Updated : Dec 16, 2019, 6:17 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.