ETV Bharat / state

कोकण बोर्ड सलग आठव्यांदा राज्यात अव्वल; यावर्षी मुलींची निकालात बाजी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी दुपारी १ वाजता जाहीर झाला. या निकालामध्ये राज्यातील एकूण ९ विभागीय मंडळांमध्ये कोकण बोर्डाचा सर्वाधिक ९३.२३ टक्के एवढा निकाल लागला आहे.

author img

By

Published : May 28, 2019, 4:23 PM IST

Updated : May 28, 2019, 4:56 PM IST

कोकण बोर्ड

रत्नागिरी- बारावीच्या निकालामध्ये पुन्हा एकदा कोकण बोर्डाने बाजी मारली आहे. कोकण बोर्ड सलग आठव्यांदा अव्वल क्रमांकावर राहिला आहे. कोकण बोर्डाचा निकाल यावर्षी ९३.२४ टक्के लागला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी दुपारी १ वाजता जाहीर झाला. या निकालामध्ये राज्यातील एकूण ९ विभागीय मंडळांमध्ये कोकण बोर्डाचा सर्वाधिक ९३.२३ टक्के एवढा निकाल लागला आहे. याखेरीज कोकण बोर्डाअंतर्गत येणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९४.२९ टक्के तर रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल ९२.६५ टक्के एवढा लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक असल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे.

भावना रोजनोर (विभागीय सचिव, कोकण विभागीय मंडळ)

कोकण विभागीय मंडळाच्या विभागीय सचिव भावना राजनोर, जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास कुलाल यांच्या उपस्थितीत कोकण बोर्डाचा १२ वी चा ऑनलाईन निकाल पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला. या निकालानुसार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातून १२ वी साठी ३१ हजार ७६४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी २९ हजार ६१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील २० हजार ६३४ विद्यार्थ्यांपैकी १९ हजार ११७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९२.६५ टक्के निकाल लागला. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ११ हजार १३० विद्यार्थ्यांपैकी १० हजार ४९५ म्हणजेच ९४.२९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५५ टक्के असून मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.०९ टक्के आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.५९ तर मुलींच्या उत्तीर्णतेचे टक्केवारी ९७.११ टक्के एवढी आहे. दोन्ही जिल्ह्यात मिळून कोकण बोर्डात मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.४५ तर मुलांची ९०.२५ टक्के एवढी आहे. मुलींच्या उर्त्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा ६.२ टक्के अधिक असल्याचे स्पष्ट होते.

निकालामध्ये वाणिज्य शाखेचा निकाल सर्वाधिक ९७.२३ टक्के लागला असून त्या खालोखाल विज्ञान शाखा ९५.३१ टक्के, व्यावसायिक विषयक शाखा ८९.४४ टक्के, तर कला शाखेचा निकाल ८५.७८ टक्के लागला आहे. चारही शाखांच्या निकालात रत्नागिरीपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.

रत्नागिरी- बारावीच्या निकालामध्ये पुन्हा एकदा कोकण बोर्डाने बाजी मारली आहे. कोकण बोर्ड सलग आठव्यांदा अव्वल क्रमांकावर राहिला आहे. कोकण बोर्डाचा निकाल यावर्षी ९३.२४ टक्के लागला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी दुपारी १ वाजता जाहीर झाला. या निकालामध्ये राज्यातील एकूण ९ विभागीय मंडळांमध्ये कोकण बोर्डाचा सर्वाधिक ९३.२३ टक्के एवढा निकाल लागला आहे. याखेरीज कोकण बोर्डाअंतर्गत येणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९४.२९ टक्के तर रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल ९२.६५ टक्के एवढा लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक असल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे.

भावना रोजनोर (विभागीय सचिव, कोकण विभागीय मंडळ)

कोकण विभागीय मंडळाच्या विभागीय सचिव भावना राजनोर, जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास कुलाल यांच्या उपस्थितीत कोकण बोर्डाचा १२ वी चा ऑनलाईन निकाल पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला. या निकालानुसार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातून १२ वी साठी ३१ हजार ७६४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी २९ हजार ६१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील २० हजार ६३४ विद्यार्थ्यांपैकी १९ हजार ११७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९२.६५ टक्के निकाल लागला. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ११ हजार १३० विद्यार्थ्यांपैकी १० हजार ४९५ म्हणजेच ९४.२९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५५ टक्के असून मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.०९ टक्के आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.५९ तर मुलींच्या उत्तीर्णतेचे टक्केवारी ९७.११ टक्के एवढी आहे. दोन्ही जिल्ह्यात मिळून कोकण बोर्डात मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.४५ तर मुलांची ९०.२५ टक्के एवढी आहे. मुलींच्या उर्त्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा ६.२ टक्के अधिक असल्याचे स्पष्ट होते.

निकालामध्ये वाणिज्य शाखेचा निकाल सर्वाधिक ९७.२३ टक्के लागला असून त्या खालोखाल विज्ञान शाखा ९५.३१ टक्के, व्यावसायिक विषयक शाखा ८९.४४ टक्के, तर कला शाखेचा निकाल ८५.७८ टक्के लागला आहे. चारही शाखांच्या निकालात रत्नागिरीपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.

Intro:12 वी निकाल

कोकण बोर्ड सलग आठव्यांदा राज्यात अव्वल

यावर्षी मुलींची निकालात बाजी

रत्नागिरी, प्रतिनिधी

बारावीच्या निकालामध्ये पुन्हा एकदा कोकण बोर्डाने बाजी मारली आहे.. कोकण बोर्ड सलग आठव्यांदा अव्वल क्रमांकावर राहिलं आहे. कोकण बोर्डाचा निकाल यावर्षी 93.24 टक्के लागला आहे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी - मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या १२ वी च्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी (ता. २८) दुपारी १ वा. जाहीर झाला. या निकालामध्ये राज्यातील एकूण ९ विभागीय मंडळांमध्ये कोकण बोर्डाचा सर्वाधिक ९३.२३ टक्के एवढा निकाल लागला आहे. कोकण बोर्डाने संपूर्ण राज्यात अव्वल येण्याचा मान सलग आठव्या वर्षी मिळवला आहे. त्यामुळे कोकणची पोरं हुशार, हे पुन्हा एकदा निकालावरून सिद्ध झाले आहे. याखेरीज कोकण बोर्डाअंतर्गत येणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९४.२९ टक्के तर रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल ९२.६५ टक्के एवढा लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक असल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे.
कोकण विभागीय मंडळाच्या विभागीय सचिव भावना राजनोर, जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास कुलाल यांच्या उपस्थितीत कोकण बोर्डाचा १२ वी चा ऑनलाईन निकाल पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला. या निकालानुसार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातून १२ वी साठी ३१ हजार ७६४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी २९ हजार ६१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेचे एकूण प्रमाण ९३.२३ टक्के एवढे आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील २० हजार ६३४ विद्यार्थ्यांपैकी १९ हजार ११७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९२.६५ टक्के निकाला लागला. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ११ हजार १३० विद्यार्थ्यांपैकी १० हजार ४९५ म्हणजेच ९४.२९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५५ टक्के असून मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.०९ टक्के आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.५९ तर मुलींच्या उत्तीर्णतेचे टक्केवारी ९७.११ टक्के एवढी आहे. दोन्ही जिल्ह्यात मिळून कोकण बोर्डात मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.४५ तर मुलांची ९०.२५ टक्के एवढी आहे. मुलींच्या उर्त्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा ६.२ टक्के अधिक असल्याचे स्पष्ट होते.
कोकण बोर्डांतर्गत येणाऱ्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण २४८ कनिष्ठ महाविद्यालयांसाठी ६० परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील १५४ कनिष्ठ महाविद्यालयांसाठी ३७ परीक्षाकेंद्र होती तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९४ कनिष्ठ महाविद्यालयांसाठी २३ परीक्षा केंद्रांचा समावेश होता. निकालामध्ये वाणिज्य शाखेचा निकाल सर्वाधिक ९७.२३ टक्के लागला असून त्या खालोखाल विज्ञान शाखा ९५.३१ टक्के, व्यावसायिक विषयक शाखा ८९.४४ टक्के, तर कला शाखेचा निकाल ८५.७८ टक्के लागला आहे. चारही शाखांच्या निकालात रत्नागिरीपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.

यशाचे सर्व श्रेय विद्यार्थ्यांचे

१२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन. विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांचा मोठा सहभाग असला तरी यशाचे सर्व श्रेय हे विद्यार्थ्यांनाच द्यायला पाहिजेत. शिक्षक व पालक यांनी विद्यार्थ्यांना चांगले प्रकारे मार्गदर्शन केले असले तरी प्रत्यक्ष अभ्यास करण्याची मेहनत विद्यार्थ्यांनी घेतली आहे. सलग ८ व्या वर्षी कोकण बोर्डाने राज्यात अव्वल येण्याचा मान मिळवला आहे. त्यामुळे हे यश भविष्यातही टिकवून ठेवण्याची जबाबदारी कोकण बोर्डाची वाढली आहे. त्यासाठी निश्चितच प्रयत्न राहतील अशी प्रतिक्रिया कोकण बोर्डाच्या विभागीय सचिव भावना रोजनोर यांनी व्यक्त केली आहे.

Byte --भावना रोजनोर(विभागीय सचिव, कोकण विभागीय मंडळ)Body:12 वी निकाल

कोकण बोर्ड सलग आठव्यांदा राज्यात अव्वलConclusion:12 वी निकाल

कोकण बोर्ड सलग आठव्यांदा राज्यात अव्वल
Last Updated : May 28, 2019, 4:56 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.