ETV Bharat / state

Uday Samant on Jaitapur Project : स्थानिकांची भूमिका तीच आमची भूमिका - मंत्री उदय सामंत

author img

By

Published : Dec 17, 2021, 3:35 PM IST

Updated : Dec 17, 2021, 5:15 PM IST

शिवसेनेने जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला पहिल्यापासून विरोध केलेला होता. केंद्र सरकारने कालच याबाबत निर्णय घेतलेला आहे. प्रकल्प कशा पद्धतीने होणार आहे हे अजून निश्चित झालेले नाही. पण इतक्या वर्षाच्या कालावधीनंतर केंद्र शासनाने पुन्हा एकदा निर्णय प्रकल्पाच्या संदर्भात घेतलेला आहे. त्यामुळे बऱ्याच कालावधीनंतर या प्रकल्पाला चालना मिळाली आहे, असे केंद्र सरकारने सांगितले आहे. त्यामुळे तिथल्या जनतेशी चर्चा करूनच आम्हाला सर्वांना निर्णय घ्यावा लागेल. तिथल्या जनतेशी बोलून आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू असे उदय सामंत यांनी ( Uday Samant statement on Jaitapur project ) यावेळी सांगितले.

Uday Samant
उदय सामंत

रत्नागिरी - जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत आम्ही स्थानिकांसोबत असून स्थानिकांची भूमिका ती आमची भूमिका असेल अशी प्रतिक्रिया उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी ( Uday Samant statement on Jaitapur project ) दिली आहे. रत्नागिरी येथे ते बोलत होते.

उदय सामंत यांची प्रतिक्रिया

'जनतेशी बोलून आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू'

यावेळी मंत्री उदय सामंत म्हणाले की, शिवसेनेने या प्रकल्पाला पहिल्यापासून विरोध केलेला होता. केंद्र सरकारने कालच याबाबत निर्णय घेतलेला आहे. प्रकल्प कशा पद्धतीने होणार आहे हे अजून निश्चित झालेले नाही. पण इतक्या वर्षाच्या कालावधीनंतर केंद्र शासनाने पुन्हा एकदा निर्णय प्रकल्पाच्या संदर्भात घेतलेला आहे. त्यामुळे बऱ्याच कालावधीनंतर या प्रकल्पाला चालना मिळाली आहे, असे केंद्र सरकारने सांगितले आहे. त्यामुळे तिथल्या जनतेशी चर्चा करूनच आम्हाला सर्वांना निर्णय घ्यावा लागेल. तिथल्या जनतेशी बोलून आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू असे उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.

'टीईटी परिक्षेत घोटाळा करणाऱ्यावर कारवाई होणारच'

टीईटी परिक्षा घोटाळ्यावर प्रतिक्रिया देताना उदय सांमत ( Education minister on TET scam ) म्हणाले की, कुणीही कितीही मोठा अधिकारी असला आणि त्यांने वाईट काम केले असेल तर कारवाई होणारच, त्यांना तुरुंगात टाकू. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचे नुकसान करण्याचे धाडस पुन्हा कुठल्याही अधिकाऱ्याचे होणार नाही अशी कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत दिली आहे.

टीईटी परिक्षा घोटाळा प्रकरण :

पुण्यातील जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या कंपनीचा संचालक डॉ. प्रितेश देशमुख याच्या घराची पुण्याच्या सायबर गुन्हे शाखांकडून झडती घेण्यात आली. त्यानंतर त्याच्या लॉकरची देखील झडती घेण्यात आली आहे. या झडतीत पुणे पोलिसांना टीईटीचे पन्नास ओळखपत्र सापडले आहेत. त्याच पद्धतीने टीईटीच्या चाळीस अपात्र विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे मिळाली आहेत. पुणे सायबर पोलिसांना टीईटी परिक्षेबाबत मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.

21 नोव्हेंबरला दोन सत्रात घेण्यात आली होती परीक्षा

महाटीईटी परीक्षा ( Maha TET Exam ) 21 नोव्हेंबरला दोन सत्रात घेण्यात आली होती. टीईटी परीक्षेसाठी काही विद्यार्थी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 या दोन्हीसाठी अर्ज केलं होतं. तर, काही विद्यार्थी एकाच पेपरला अर्ज करतात. परीक्षेनंतर प्रश्नसूची आणि उत्तरसूचीमध्ये तफावत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप होता.

हेही वाचा - Tukaram Supe arrested : टीईटी पेपर फुटी प्रकरणी राज्यपरीक्षा परिषदेचे आयुक्त सुपे यांच्यासह दोघांना अटक

हेही वाचा - New TET Scam : टीईटीचा नवीन घोटाळा? म्हाडा पेपरफुटीचा सूत्रधार रितेश देशमुखच्या घरात सापडली टीईटीची पन्नास ओळखपत्रे

रत्नागिरी - जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत आम्ही स्थानिकांसोबत असून स्थानिकांची भूमिका ती आमची भूमिका असेल अशी प्रतिक्रिया उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी ( Uday Samant statement on Jaitapur project ) दिली आहे. रत्नागिरी येथे ते बोलत होते.

उदय सामंत यांची प्रतिक्रिया

'जनतेशी बोलून आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू'

यावेळी मंत्री उदय सामंत म्हणाले की, शिवसेनेने या प्रकल्पाला पहिल्यापासून विरोध केलेला होता. केंद्र सरकारने कालच याबाबत निर्णय घेतलेला आहे. प्रकल्प कशा पद्धतीने होणार आहे हे अजून निश्चित झालेले नाही. पण इतक्या वर्षाच्या कालावधीनंतर केंद्र शासनाने पुन्हा एकदा निर्णय प्रकल्पाच्या संदर्भात घेतलेला आहे. त्यामुळे बऱ्याच कालावधीनंतर या प्रकल्पाला चालना मिळाली आहे, असे केंद्र सरकारने सांगितले आहे. त्यामुळे तिथल्या जनतेशी चर्चा करूनच आम्हाला सर्वांना निर्णय घ्यावा लागेल. तिथल्या जनतेशी बोलून आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू असे उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.

'टीईटी परिक्षेत घोटाळा करणाऱ्यावर कारवाई होणारच'

टीईटी परिक्षा घोटाळ्यावर प्रतिक्रिया देताना उदय सांमत ( Education minister on TET scam ) म्हणाले की, कुणीही कितीही मोठा अधिकारी असला आणि त्यांने वाईट काम केले असेल तर कारवाई होणारच, त्यांना तुरुंगात टाकू. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचे नुकसान करण्याचे धाडस पुन्हा कुठल्याही अधिकाऱ्याचे होणार नाही अशी कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत दिली आहे.

टीईटी परिक्षा घोटाळा प्रकरण :

पुण्यातील जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या कंपनीचा संचालक डॉ. प्रितेश देशमुख याच्या घराची पुण्याच्या सायबर गुन्हे शाखांकडून झडती घेण्यात आली. त्यानंतर त्याच्या लॉकरची देखील झडती घेण्यात आली आहे. या झडतीत पुणे पोलिसांना टीईटीचे पन्नास ओळखपत्र सापडले आहेत. त्याच पद्धतीने टीईटीच्या चाळीस अपात्र विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे मिळाली आहेत. पुणे सायबर पोलिसांना टीईटी परिक्षेबाबत मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.

21 नोव्हेंबरला दोन सत्रात घेण्यात आली होती परीक्षा

महाटीईटी परीक्षा ( Maha TET Exam ) 21 नोव्हेंबरला दोन सत्रात घेण्यात आली होती. टीईटी परीक्षेसाठी काही विद्यार्थी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 या दोन्हीसाठी अर्ज केलं होतं. तर, काही विद्यार्थी एकाच पेपरला अर्ज करतात. परीक्षेनंतर प्रश्नसूची आणि उत्तरसूचीमध्ये तफावत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप होता.

हेही वाचा - Tukaram Supe arrested : टीईटी पेपर फुटी प्रकरणी राज्यपरीक्षा परिषदेचे आयुक्त सुपे यांच्यासह दोघांना अटक

हेही वाचा - New TET Scam : टीईटीचा नवीन घोटाळा? म्हाडा पेपरफुटीचा सूत्रधार रितेश देशमुखच्या घरात सापडली टीईटीची पन्नास ओळखपत्रे

Last Updated : Dec 17, 2021, 5:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.