ETV Bharat / state

'शेतकरी ते ग्राहक'; पनवेलच्या उलवे नोडमध्ये आंबा महोत्सवाला सुरुवात

गेल्या २ वर्षांपासून हा महोत्सव होत आहे. कोकणातील जगप्रसिद्ध हापूस आंबा रत्नागिरी आणि देवगड येथील शेतकऱ्यांच्या बागेतून थेट मुंबईकरांपर्यंत दलाल आणि हुंडेकरी यांना डावलून पोहचवला जातो.

author img

By

Published : May 17, 2019, 10:29 PM IST

पनवेल आंबा महोत्सव

रायगड - शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत या संकल्पनेतून पनवेल कृषि उत्पन बाजार समिती आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमधील उलवे नोडमध्ये आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. आमदार बाळाराम पाटील यांनी या आंबा महोत्सवाच उद्घाटन केले. यावेळी बाळाराम पाटील यांनी स्वतः या आंब्याची चव चाखत शेतकरी बंधूंची संवाद साधला.

आंबा महोत्सवाविषयी माहिती देताना शेतकरी आणि राजेंद्र पाटील

गेल्या २ वर्षांपासून हा महोत्सव होत आहे. कोकणातील जगप्रसिद्ध हापूस आंबा रत्नागिरी आणि देवगड येथील शेतकऱ्यांच्या बागेतून थेट मुंबईकरांपर्यंत दलाल आणि हुंडेकरी यांना डावलून पोहचवला जातो. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालासाठी जास्तीत जास्त दर मिळतो. पनवेलकरांना कार्बाईड विरहित अस्सल हापूस आंबा चाखायला मिळतोय. नैसर्गिक पद्धतीने पिकविलेला केशर आणि कोकणातील हापूस आंब्याची चव चाखायला मिळत आहे. कर्नाटक व तामिळनाडू येथील हापूससदृश आंबे विकून ग्राहकांची होणारी फसवणूक या महोत्सवामुळे कमी झाल्याचा शेतकऱ्यांचा दावा शेतकऱ्यांनी यानिमित्ताने केला आहे.

मार्चपर्यंत लांबलेली थंडी आणि थ्रिप्स रोगाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या २५ वर्षांतील सर्वात कमी म्हणजे ३० टक्केच आंब्याचे पीक हाती लागणार आहे. त्यामुळे कोकणातील शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पनवेलकरांनी या महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन सभापती राजेंद्र पाटील यांनी केले आहे.

रायगड - शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत या संकल्पनेतून पनवेल कृषि उत्पन बाजार समिती आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमधील उलवे नोडमध्ये आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. आमदार बाळाराम पाटील यांनी या आंबा महोत्सवाच उद्घाटन केले. यावेळी बाळाराम पाटील यांनी स्वतः या आंब्याची चव चाखत शेतकरी बंधूंची संवाद साधला.

आंबा महोत्सवाविषयी माहिती देताना शेतकरी आणि राजेंद्र पाटील

गेल्या २ वर्षांपासून हा महोत्सव होत आहे. कोकणातील जगप्रसिद्ध हापूस आंबा रत्नागिरी आणि देवगड येथील शेतकऱ्यांच्या बागेतून थेट मुंबईकरांपर्यंत दलाल आणि हुंडेकरी यांना डावलून पोहचवला जातो. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालासाठी जास्तीत जास्त दर मिळतो. पनवेलकरांना कार्बाईड विरहित अस्सल हापूस आंबा चाखायला मिळतोय. नैसर्गिक पद्धतीने पिकविलेला केशर आणि कोकणातील हापूस आंब्याची चव चाखायला मिळत आहे. कर्नाटक व तामिळनाडू येथील हापूससदृश आंबे विकून ग्राहकांची होणारी फसवणूक या महोत्सवामुळे कमी झाल्याचा शेतकऱ्यांचा दावा शेतकऱ्यांनी यानिमित्ताने केला आहे.

मार्चपर्यंत लांबलेली थंडी आणि थ्रिप्स रोगाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या २५ वर्षांतील सर्वात कमी म्हणजे ३० टक्केच आंब्याचे पीक हाती लागणार आहे. त्यामुळे कोकणातील शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पनवेलकरांनी या महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन सभापती राजेंद्र पाटील यांनी केले आहे.

Intro:बातमीला व्हिडीओ आणि बाईट एफटीपी करीत आहे. याच slug ने.


MH_Panvel_MangoFestivle_AVB_17May2019_PramilaPawar_Byte_SamirDesai

MH_Panvel_MangoFestivle_AVB_17May2019_PramilaPawar_Byte_RajendraPatil

MH_Panvel_MangoFestivle_AVB_17May2019_PramilaPawar_Vis1
......
.....
.....
MH_Panvel_MangoFestivle_AVB_17May2019_PramilaPawar_Vis 14



Location- पनवेल


Anchor
शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत या संकल्पनेतून पनवेल कृषि उत्पन बाजार समिती आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमधील उलवेमध्ये आंबा महोत्सव आयोजित करण्यात आलाय. नैसर्गिक पद्धतीने पिकविलेला केशरसह कोकणातील हापूस आंब्याची चव यानिमित्ताने पनवेलकरांना चाखायला मिळणार आहे.
Body:Vo1

गेल्या २ वर्षांंपासून होत असलेल्या या महोत्सवात कोकणातील जगप्रसिद्ध हापूस आंबा रत्नागिरी व देवगड येथील शेतकऱ्यांच्या बागेतून थेट मुंबईकरांपर्यंत मधले दलाल व हुंडेकरी यांना डावलून पोहचवला जातो. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालासाठी जास्तीत जास्त दर मिळतो आणि पनवेलकरांना कार्बाईडरहित अस्सल हापूस आंबा चाखायला मिळतोय. पनवेल कृषि उत्पन बाजार समिती व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने उलवे नोड या ठिकाणी आंबा महोत्सव भरवण्यात आला आहे. आमदार बाळाराम पाटील यांनी या आंबा महोत्सवाच उद्घाटन केलं
आणि स्वतः या आंबा ची चव चाखत या शेतकरी बंधूंची संवाद साधला. कर्नाटक व तामिळनाडू येथील हापूससदृश आंबे विकून ग्राहकांची होणारी फसवणूक या महोत्सवामुळे कमी झाल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे.

Vo2
या महोत्सवाच्या माध्यमातून आंबा प्रेमींना हापूस, केसरी,तोतापुरी,रायवलरी,कलमी अश्या वेगवेगळ्या आंब्याच्या चवीं चाखता येणार आहेत.या आंबा महोत्सवासाठी रायगड,देवगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग मधून शेतकरी आले आहेत.

बाईट- समीर देसाई, शेतकरी, रत्नागिरी. Conclusion:Vo3
आजच्या या आंबा महोत्सवाला आमदार बाळाराम पाटील यांनी भेट दिली. तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील यांच्या वडिलांची आंब्यासोबत तुला देखील करण्यात आली. मार्चपर्यंत लांबलेली थंडी व थ्रिप्स रोगाचा प्रादुर्भाव यामुळे गेल्या २५ वर्षांतील सर्वात कमी, म्हणजे ३० टक्केच आंब्याचे पीक हाती लागणार असल्याने कोकणातील शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पनवेलकरांनी या महोत्सवाला भेट द्यावी, अस आवाहन सभापती राजेंद्र पाटील यांनी केलय.

बाईट - राजेंद्र पाटील,सभापती,पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती

प्रमिला पवार, ईटीव्ही भारत, पनवेल.
----------;
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.