ETV Bharat / state

रेड अलर्ट घोषित; मात्र जिल्ह्यात उन्हाळी वातावरण

author img

By

Published : Jun 13, 2021, 12:25 PM IST

रायगड जिल्ह्यात हवामान विभागाने 9 ते 11 जून असे दोन दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली होती. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेची पावले उचलली जात होती. दरडग्रस्त भागातील नागरिकांना सुस्थळी हलविण्यात आले होते. तर अतिवृष्टीच्या अनुषंगाने 10 आणि 11 जून रोजी अत्यावश्यक सेवेतील दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले होते.

रेड अलर्ट घोषित
रेड अलर्ट घोषित

रायगड- जिल्ह्यात 9 ते 16 जून या काळात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. रायगड जिल्हा रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. मात्र जिल्ह्यातील दिलेला हवामान विभागाचा अंदाज फोल ठरला आहे. जिल्ह्यात सध्या पावसाळी वातावरण नसून, उन्हाळी वातावरण तयार झालेले आहे. त्यामुळे नक्की पाऊस पडणार की नाही, या संभ्रमात रायगडकर आहेत. अतिवृष्टीचा इशारा दिला असला, कारणाने एन डी आर एफ पथक ही दाखल झाले होते. मात्र सुदैवाने अतिवृष्टी अद्याप झालेली नाही.

रेड अलर्ट घोषित; मात्र जिल्ह्यात उन्हाळी वातावरण
रेड अलर्ट घोषित; मात्र जिल्ह्यात उन्हाळी वातावरण
9 ते 11 जूनचा इशाराही फोल ठरला आहे हवामान विभागाने जिल्ह्यात 9 ते 11 जून असे दोन दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली होती. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेची पावले उचलली जात होती. दरडग्रस्त भागातील नागरिकांना सुस्थळी हलविण्यात आले होते. तर अतिवृष्टीच्या अनुषंगाने 10 आणि 11 जून रोजी अत्यावश्यक सेवेतील दुकान व्यतिरिक्त इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले होते. अतिवृष्टी तर झालीच नाही मात्र दुकानदारांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात रेड अलर्ट मात्र पावसाचा पत्ता नाही
रायगड जिल्ह्यात 13 ते 16 जून दरम्यान अतिवृष्टी होण्याची शक्यता पुन्हा हवामान विभागाने वर्तवली आहे. रायगड जिल्हा हा रेड अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे. मात्र सद्यस्थितीत जिल्ह्यात ऊन पडले असून, पावसाची मध्येच हलकीशी सर येऊन जात आहे. जिल्ह्यात रेड अलर्ट घोषित असल्याने प्रशासनाने ही सतर्क राहण्याचा इशारा यंत्रणांना दिला आहे. मात्र अतिवृष्टी सारखी पतिस्थिती जिल्ह्यात सध्या तरी दिसत नाही.

हेही वाचा- अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात एनडीआरएफच्या 4 टीम दाखल

रायगड- जिल्ह्यात 9 ते 16 जून या काळात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. रायगड जिल्हा रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. मात्र जिल्ह्यातील दिलेला हवामान विभागाचा अंदाज फोल ठरला आहे. जिल्ह्यात सध्या पावसाळी वातावरण नसून, उन्हाळी वातावरण तयार झालेले आहे. त्यामुळे नक्की पाऊस पडणार की नाही, या संभ्रमात रायगडकर आहेत. अतिवृष्टीचा इशारा दिला असला, कारणाने एन डी आर एफ पथक ही दाखल झाले होते. मात्र सुदैवाने अतिवृष्टी अद्याप झालेली नाही.

रेड अलर्ट घोषित; मात्र जिल्ह्यात उन्हाळी वातावरण
रेड अलर्ट घोषित; मात्र जिल्ह्यात उन्हाळी वातावरण
9 ते 11 जूनचा इशाराही फोल ठरला आहे हवामान विभागाने जिल्ह्यात 9 ते 11 जून असे दोन दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली होती. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेची पावले उचलली जात होती. दरडग्रस्त भागातील नागरिकांना सुस्थळी हलविण्यात आले होते. तर अतिवृष्टीच्या अनुषंगाने 10 आणि 11 जून रोजी अत्यावश्यक सेवेतील दुकान व्यतिरिक्त इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले होते. अतिवृष्टी तर झालीच नाही मात्र दुकानदारांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात रेड अलर्ट मात्र पावसाचा पत्ता नाही
रायगड जिल्ह्यात 13 ते 16 जून दरम्यान अतिवृष्टी होण्याची शक्यता पुन्हा हवामान विभागाने वर्तवली आहे. रायगड जिल्हा हा रेड अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे. मात्र सद्यस्थितीत जिल्ह्यात ऊन पडले असून, पावसाची मध्येच हलकीशी सर येऊन जात आहे. जिल्ह्यात रेड अलर्ट घोषित असल्याने प्रशासनाने ही सतर्क राहण्याचा इशारा यंत्रणांना दिला आहे. मात्र अतिवृष्टी सारखी पतिस्थिती जिल्ह्यात सध्या तरी दिसत नाही.

हेही वाचा- अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात एनडीआरएफच्या 4 टीम दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.