ETV Bharat / state

रायगड जिल्ह्यात हाय अलर्ट जारी; मात्र सुरक्षा व्यवस्थेत ढिसाळपणा

आयबी, एटीएस या गुप्तचर यंत्रणा टेहळणी करत आहेत. पोलीस दलातर्फे समुद्र किनाऱ्याची तपासणी केली जात आहे.

author img

By

Published : Feb 24, 2019, 11:21 PM IST

रायगडमध्ये तपास यंत्रणा

रायगड - आपटा येथे बसमध्ये बॉम्ब आढळल्याची घटना ३ दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. एटीएस, आयबी या गुप्तचर यंत्रणा टेहळळी करत आहेत. मात्र, जिल्ह्याच्या सुरक्षेच्या बाबतीत ढिसाळपणा सुरू असल्याचे समोर आले आहे.

गुप्तचर यंत्रणांसह स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस दलातर्फे समुद्र किनाऱ्याची टेहळणी केली जात आहे. संशयास्पद हालचालींवर पोलीस नजर रोखून आहेत. मात्र, किती पोलीस तैनात करण्यात आले आहेत याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली नाही. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. पण, एवढी मोठी घटना होऊनही जिल्ह्यात कुठेही तपासणी करण्यात आली नाही.

बॉम्ब ठेवणारा दहशतवादी संघटनेचा हस्तक?


बसमध्ये बॉम्ब ठेवणारा व्यक्ती प्रशिक्षित असल्याचे बोलले जात आहे. या व्यक्तीने बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण आयएसआयएस किंवा दुसऱ्या एखाद्या दहशतवाही संघटनेकडून घेतल्याचे सांगितले जात आहे. रायगडमध्ये मोठा घातपात घडवून आणण्यासाठीच हा बॉम्ब ठेवला असू शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

रायगड - आपटा येथे बसमध्ये बॉम्ब आढळल्याची घटना ३ दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. एटीएस, आयबी या गुप्तचर यंत्रणा टेहळळी करत आहेत. मात्र, जिल्ह्याच्या सुरक्षेच्या बाबतीत ढिसाळपणा सुरू असल्याचे समोर आले आहे.

गुप्तचर यंत्रणांसह स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस दलातर्फे समुद्र किनाऱ्याची टेहळणी केली जात आहे. संशयास्पद हालचालींवर पोलीस नजर रोखून आहेत. मात्र, किती पोलीस तैनात करण्यात आले आहेत याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली नाही. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. पण, एवढी मोठी घटना होऊनही जिल्ह्यात कुठेही तपासणी करण्यात आली नाही.

बॉम्ब ठेवणारा दहशतवादी संघटनेचा हस्तक?


बसमध्ये बॉम्ब ठेवणारा व्यक्ती प्रशिक्षित असल्याचे बोलले जात आहे. या व्यक्तीने बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण आयएसआयएस किंवा दुसऱ्या एखाद्या दहशतवाही संघटनेकडून घेतल्याचे सांगितले जात आहे. रायगडमध्ये मोठा घातपात घडवून आणण्यासाठीच हा बॉम्ब ठेवला असू शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Intro:बॉम्ब बनविणारा तो प्रशिक्षित

एटीएस, आयबी अधिकारी जिल्ह्यात तळ ठोकून

एसटी बस मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासणार

जिल्ह्यात सुरक्षेच्या बाबतीत मात्र सावळा गोंधळ


रायगड : आपटा येथे एसटी बसमध्ये जिवंत बॉम्ब भेटल्याने रायगड जिल्हा हादरला आहे. याच धर्तीवर जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी जिल्ह्यात हाय अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात एटीएस व आयबी या गुप्तचर संस्थेकडून जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणावर टेहळणी सुरू असून स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस दलातर्फेही समुद्र किनारा, तसेच संशयास्पद हालचालीवर आपली नजर रोखून आहेत अशी माहिती पोलिसांकडून मिळाली असली तरी किती पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली आहे याबाबत माहिती मिळालेली नाही. तर कर्जत आपटा ही बस ज्या मार्गावरून आलेली आहे त्या मार्गावर असलेल्या सीसी टीव्ही फुटेजची तपासणी एटीएस पथकाकडून करण्यात येत आहे. मात्र एवढी मोठी घटना झाली असताना जिल्ह्यात कुठेही पोलीसामार्फत तपासणी होत असल्याचे निर्दशनात आलेले नाही.





Body:आपटा येथे एसटी बसमध्ये अज्ञात व्यक्तीकडून ठेवण्यात आलेला बॉम्ब हा एका बॉम्ब बनविणाऱ्या प्रशिक्षित व्यक्तीने बनविला असल्याचे बोलले जात आहे. या व्यक्तीने बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण आयइएस वा दहशतवादी संघटनेकडून घेण्यात आले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर आईडी सारखा घातकी बॉम्ब बनवून या व्यक्तीला मोठा घातपात घडवुन आणण्याचा हेतू यामागचा असू शकतो.


रायगड जिल्ह्यात याआधीही शेखाडीमार्गे आरडीएक्स सारखी स्फोटके मुंबईत दाखल झाली होती. आपटा येथे बसमध्ये बॉम्ब मिळाल्यानंतर पुन्हा एकदा जिल्ह्यातून दहशतवादी कारवाया सुरू झाल्यात का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.Conclusion:एसटी बसमध्ये ठेवण्यात आलेला बॉम्ब हा घातपाताच्या इराद्याने ठेवलेला होता की दहशत निर्माण करण्याच्या दृष्टीने हे त्या व्यक्तीला पकडल्यानंतर पोलीस तपासात सिद्ध होणार आहे. तूर्तास तरी पोलीस हे बॉम्ब कोणी ठेवला याचा तपास करीत आहेत. यासाठी बॉम्ब ठेवलेल्या पिशवीवरील व एसटी मध्ये ती व्यक्ती बसलेल्या ठिकाणचे ठसे पोलिसांनी घेतले आहेत. तर कर्जत आपटा ही बस ज्या ज्या मार्गावरून आली आहे त्या मार्गावरील असलेल्या सीसीटीव्ही फुटेज मिळविण्याचा प्रयत्न एटीएस अधिकारी करीत आहेत.



जिल्ह्यात आपटा येथे भेटलेल्या बॉम्ब घटनेने पोलिसांची सध्या झोप उडालेली असली तरी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या घटनेचा तपास लवकरात लवकर पोलिसांनी लावणे गरजेचा आहे. मात्र जिल्ह्यात हाय अलर्ट जाहीर केलेला असला तरी पोलीस प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने किती यंत्रणा तैनात केली आहे. याची माहिती प्रशासनाकडे नसल्याचे कळते आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यात हाय अलर्ट जाहीर केलेला हा कागदावरच केलेला आहे की काय असे चित्र दिसत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.