ETV Bharat / state

रायगडमध्ये पावसाचा जोर कायम; प्रशासनाकडून सतर्कतेचे आदेश

जिल्ह्यात गेल्या 24 तासात 177.69 मिमी पाऊस झाला असून पावसाची बॅटिंग अजूनही सुरूच आहे. जिल्ह्यातील नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरड व झाडे काढल्याने वाहतूक काही प्रमाणात सुरू झाली असली तरी पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. पुढील 48 तास जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिलेला असल्याने सर्व विभाग व नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

author img

By

Published : Sep 4, 2019, 5:01 PM IST

जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

रायगड - जिल्ह्यात गेल्या 24 तासात 177.69 मिमी पाऊस झाला असून पावसाची बॅटिंग अजूनही सुरूच आहे. जिल्ह्यातील नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर, यामुळे अनेक ठिकाणी दरड, झाडे कोसळून रस्ते व रेल्वे मार्ग बंद झाले होते. दरड व झाडे काढल्याने वाहतूक काही प्रमाणात सुरू झाली असली तरी पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. तर कामाशिवाय बाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असल्याने पुणे येथून एनडीआरएफची दोन पथकं जिल्ह्यात पनवेल येथे दाखल झाली आहेत. दुपारी 3 वाजता समुद्राला भरती असल्याने सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे सखल भागातील नागरिकांना सतर्क राहून योग्य वेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा असे प्रशासनाकडून वर्तविण्यात आले आहे.

जिल्ह्यात पावसाचा जोर कायम


जिल्ह्यात गणेशोस्तव साजरा होत असतानाच मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांनी धोका पातळी ओलांडली असून पुन्हा एकदा 2 ऑगस्ट सारखी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर, पावसाच्या जोराने जनजीवन विस्कळीत झाले आहे. ताम्हणी घाटात पडलेली दरड काढली असल्याने वाहतूक सुरू झाली आहे. भिसे खिंड व सुकेळी खिंडीत पडलेली दरड व झाड काढल्याने येथील वाहतूकही सुरू झाली आहे. रोहा अष्टमी दरम्यान रेल्वे रुळावर दरड कोसळली असल्याने अर्धा तास कोकण रेल्वे सेवा कोलमडली होती. दरड काढल्यानंतर पुन्हा रेल्वेसेवा सुरू झाली आहे. मात्र अनेक ठिकाणी पुलावरून पाणी गेले असल्याने येथील वाहतूक ठप्प झाली आहे.


जिल्ह्यात पावसाने पूरस्थिती निर्माण झाली असल्याने जिल्हा प्रशासनाकडून सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल यांना गावांमध्ये जाऊन आढावा घेण्यासाठी सूचना दिल्या आहेत. सर्व विभागाचे अधिकारी यांना तत्काळ मदत कार्य करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.


जिल्ह्यातील खाजगी शासकीय विभागाच्या बोटी आणि पथक तयार ठेवण्यात आले आहे, एनडीआरएफची टीम बोलाविण्यात आली आहे. पुढील 48 तास जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिलेला असल्याने सर्व विभाग व नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

रायगड - जिल्ह्यात गेल्या 24 तासात 177.69 मिमी पाऊस झाला असून पावसाची बॅटिंग अजूनही सुरूच आहे. जिल्ह्यातील नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर, यामुळे अनेक ठिकाणी दरड, झाडे कोसळून रस्ते व रेल्वे मार्ग बंद झाले होते. दरड व झाडे काढल्याने वाहतूक काही प्रमाणात सुरू झाली असली तरी पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. तर कामाशिवाय बाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असल्याने पुणे येथून एनडीआरएफची दोन पथकं जिल्ह्यात पनवेल येथे दाखल झाली आहेत. दुपारी 3 वाजता समुद्राला भरती असल्याने सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे सखल भागातील नागरिकांना सतर्क राहून योग्य वेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा असे प्रशासनाकडून वर्तविण्यात आले आहे.

जिल्ह्यात पावसाचा जोर कायम


जिल्ह्यात गणेशोस्तव साजरा होत असतानाच मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांनी धोका पातळी ओलांडली असून पुन्हा एकदा 2 ऑगस्ट सारखी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर, पावसाच्या जोराने जनजीवन विस्कळीत झाले आहे. ताम्हणी घाटात पडलेली दरड काढली असल्याने वाहतूक सुरू झाली आहे. भिसे खिंड व सुकेळी खिंडीत पडलेली दरड व झाड काढल्याने येथील वाहतूकही सुरू झाली आहे. रोहा अष्टमी दरम्यान रेल्वे रुळावर दरड कोसळली असल्याने अर्धा तास कोकण रेल्वे सेवा कोलमडली होती. दरड काढल्यानंतर पुन्हा रेल्वेसेवा सुरू झाली आहे. मात्र अनेक ठिकाणी पुलावरून पाणी गेले असल्याने येथील वाहतूक ठप्प झाली आहे.


जिल्ह्यात पावसाने पूरस्थिती निर्माण झाली असल्याने जिल्हा प्रशासनाकडून सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल यांना गावांमध्ये जाऊन आढावा घेण्यासाठी सूचना दिल्या आहेत. सर्व विभागाचे अधिकारी यांना तत्काळ मदत कार्य करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.


जिल्ह्यातील खाजगी शासकीय विभागाच्या बोटी आणि पथक तयार ठेवण्यात आले आहे, एनडीआरएफची टीम बोलाविण्यात आली आहे. पुढील 48 तास जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिलेला असल्याने सर्व विभाग व नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Intro:जिल्हा प्रशासनाकडून अधिकारी व नागरिकांना सतर्क राहण्याचे निर्देश

एनडीआरएफची दोन पथके जिल्ह्यात दाखल

नागोठणे भिसे खिंड, सुकेळी खिंड, ताम्हणी घाट रस्ता सुरू

रोहा अष्टमी रेल्वे रुळावरील दरड काढल्याने रेल्वे सेवा सुरळीत

जिल्ह्यात अनेक भागात पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक ठप्प

दुपारी भरतीची वेळ असल्याने सखल भागात पाणी शिरण्याची शक्यता


रायगड : जिल्ह्यात मागील 24 तासात 177.69 मिमी पाऊस झाला असून पावसाची बॅटिंग अजून सुरूच आहे. जिल्ह्यातील नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर अनेक ठिकाणी दरड, झाडे कोसळून रस्ते व रेल्वे मार्ग बंद झाले होते. दरड व झाडे काढल्याने वाहतूक काही प्रमाणात सुरू झाली असली तरी पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. तर कामाशिवाय बाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पूरस्थिती निर्माण झाली असल्याने पुणे येथून एनडीआरएफचे दोन पथक जिल्ह्यात पनवेल येथे दाखल झाले आहे. दुपारी तीन वाजता समुद्राला भरती असल्याने सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे सखल भागातील नागरिकांना सतर्क राहून योग्य वेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा असे प्रशासनाकडून वर्तविण्यात आले आहे.Body:गणेशोस्तव सण जिल्ह्यात साजरा होत असताना वरुणराजानेही आपली कृपादृष्टी टाकली असल्याने मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाने जिल्ह्यातील नद्यांनी धोका पातळी ओलांडली असल्याने पुन्हा एकदा 2 ऑगस्ट सारखी पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने जिल्ह्यात हाहाकार उडविला असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

ताम्हणी घाटात पडलेली दरड काढली असल्याने वाहतूक सुरू झाली आहे. तर भिसे खिंड व सुकेळी खिंडीत पडलेली दरड व झाड काढल्याने वाहतूक सुरू झाली आहे. रोहा अष्टमी दरम्यान रेल्वे रुळावर दरड कोसळली असल्याने अर्धा तास कोकण रेल्वे सेवा कोलमडली होती. दरड काढल्यानंतर पुन्हा रेल्वेसेवा सुरू झाली आहे. मात्र अनेक ठिकाणी पुलावरून पाणी गेले असल्याने येथील वाहतूक ठप्प झाली आहे.
Conclusion:जिल्ह्यात पावसाने पूरस्थिती निर्माण झाली असल्याने जिल्हा प्रशासनाकडून सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल यांना गावांमध्ये जाऊन आढावा घेण्यासाठी सूचना दिल्या आहेत. सर्व विभागाचे अधिकारी यांना तात्काळ मदत कार्य करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
जिल्ह्यातील खाजगी शासकीय विभागाच्या बोटी आणि पथक तयार ठेवण्यात आले आहे. एनडीआरएफची टीम बोलाविण्यात आली आहे.

पुढील 48 तास जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिलेला असल्याने सर्व विभाग व नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.