ETV Bharat / state

रायगडमध्ये परतीच्या पावसाचा धुमाकूळ... - रायगड पनवेल येथे जोरदार पाऊस

पनवेलमध्ये परतीच्या पावसाचा धुमाकूळ,ओढे, नाले तुडुंब भरल्याने परिसर पुन्हा जलमय.. 'महा' चक्रीवादळामुळे मुंबई शहर आणि उपनगरात शुक्रवारी सकाळ पासून पाऊस सुरू...

रायगडमध्ये परतीच्या पावसाचा धुमाकूळ
author img

By

Published : Nov 8, 2019, 1:01 PM IST

रायगड - जिल्ह्यातील पनवेल भागात आणि किनार पट्टीतील भागात शुक्रवारी सकाळपासुन परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. 'महा' चक्रीवादळाचा परिणाम म्हणून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार पाऊस सुरू झाला. यामुळे पावसाचा कंटाळा आला आहे, असे म्हणूनही पाऊस मात्र राज्याची पाठ सोडणार नसल्याचे चित्र दिसत आहे.

पनवेलमध्ये परतीच्या पावसाचा धुमाकूळ,ओढे, नाले तुडुंब भरल्याने परिसर पुन्हा जलमय

हेही वाचा... नुकसानीचे पंचनामे करण्यात मराठवाड्यात बीड जिल्हा अव्वल, ८९७ गावांचे पंचनामे पूर्ण

परतीच्या पावसाने नागरिकांची दैना..

मध्य महाराष्ट्रावर घोंगावणारे वादळ किनारपट्टीवर येई पर्यंत शमताना दिसत आहे. मात्र असे असले तरी कमी दाबाच्या पट्ट्यामुळे शुक्रवारी सकाळपासूनच मुंबईसह पनवेलमध्येही मुसळधार पाऊस सुरू झाला. या परतीच्या पावसामुळे मात्र नागरिकांची दैना उडवली आहे. पाऊस अखेर थांबला आहे, असे गृहीत धरत कामावर आलेल्या पनवेलकरांची अचानक आलेल्या पावसामुळे प्रचंड धावपळ उडाली.

हेही वाचा... 'महा'चक्रीवादळामुळे मुंबईत मुसळधार; मध्य रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड, चाकरमान्यांचे हाल

रायगड - जिल्ह्यातील पनवेल भागात आणि किनार पट्टीतील भागात शुक्रवारी सकाळपासुन परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. 'महा' चक्रीवादळाचा परिणाम म्हणून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार पाऊस सुरू झाला. यामुळे पावसाचा कंटाळा आला आहे, असे म्हणूनही पाऊस मात्र राज्याची पाठ सोडणार नसल्याचे चित्र दिसत आहे.

पनवेलमध्ये परतीच्या पावसाचा धुमाकूळ,ओढे, नाले तुडुंब भरल्याने परिसर पुन्हा जलमय

हेही वाचा... नुकसानीचे पंचनामे करण्यात मराठवाड्यात बीड जिल्हा अव्वल, ८९७ गावांचे पंचनामे पूर्ण

परतीच्या पावसाने नागरिकांची दैना..

मध्य महाराष्ट्रावर घोंगावणारे वादळ किनारपट्टीवर येई पर्यंत शमताना दिसत आहे. मात्र असे असले तरी कमी दाबाच्या पट्ट्यामुळे शुक्रवारी सकाळपासूनच मुंबईसह पनवेलमध्येही मुसळधार पाऊस सुरू झाला. या परतीच्या पावसामुळे मात्र नागरिकांची दैना उडवली आहे. पाऊस अखेर थांबला आहे, असे गृहीत धरत कामावर आलेल्या पनवेलकरांची अचानक आलेल्या पावसामुळे प्रचंड धावपळ उडाली.

हेही वाचा... 'महा'चक्रीवादळामुळे मुंबईत मुसळधार; मध्य रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड, चाकरमान्यांचे हाल

Intro:पनवेल


कंटाळा आलाय पावसाचा,' असं जरी वाटत असलं तरी पाऊस मात्र तुमची पाठ सोडणार नसल्याचे चित्र आहे. आज सकाळपासुनच पनवेलमध्ये परतीच्या मुसळधार पावसाने धुमाकूळ घातलाय. महा चक्रीवादळाचा परिणाम म्हणून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने अचानक मुंबई शहर आणि उपनगरात पाऊस सुरू झाला.Body:मध्य महाराष्ट्रावर घोंगावणारं वादळ किनारपट्टीवर येईपर्यंत शमत आहे. समुद्र किनारपट्टीवर येईपर्यंत वादळाची तीव्रता बरीच कमी होणार आहे. मात्र असे असले तरी कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आज सकाळपासूनच मुंबईसह पनवेलमध्येही मुसळधार पाऊस सुरू झालाय. परतीच्या पावसाने नागरिकांची दैना उडवली आहे. पाऊस अखेर गेला, असे गृहीत धरत छत्री घरी ठेवून कामावर आलेल्या पनवेलकरांची प्रचंड धावपळ उडाली. Conclusion:पावसाचा जोर पाहून आडोशाला न थांबल्यास सकाळी ऑफिससाठी निघालेल्या कर्मचाऱ्यांनी लेटमार्कच्या भीतीने पावसात भिजतच ऑफिस गाठलं. त्यामुळे परतीचा पाऊसही झोडपून काढत असल्यानं हा परतीचा पाऊस परतण्याचं नावच घेताना दिसून येत नाही.


प्रमिला पवार, ईटीव्ही भारत, पनवेल
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.