ETV Bharat / state

'' तान्हाजी यांच्या सारख्या मावळ्यांचा इतिहास जपणे सुद्धा महत्वाचे''

author img

By

Published : Feb 17, 2020, 4:22 PM IST

नरवीर तानाजी मालुसरे यांचा 350 वा शौर्य दिन आणि पुण्यतिथी सोहळा आज (सोमवारी) त्यांच्या उमरठ या गावी साजरा झाला. यावेळी नरवीरांच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या समाधी स्थळाचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

नरवीर तानाजी मालुसरे यांचा 350 वा शौर्य दिन आणि पुण्यतिथी सोहळा
नरवीर तानाजी मालुसरे यांचा 350 वा शौर्य दिन आणि पुण्यतिथी सोहळा

रायगड - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे आपल्या जीवाची राख रांगोळी करणारे मावळे होते, म्हणून स्वराज्य निर्माण झाले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह मावळ्यांचा इतिहासही जिवंत ठेवणे महत्वाचे आहे. आजचा दिवस हा माझा तीर्थक्षेत्राचा पवित्र दिवस आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या समाधी स्थळासाठी आणि स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहे.

नरवीर तानाजी मालुसरे यांचा 350 वा शौर्य दिन आणि पुण्यतिथी सोहळा

सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे यांची ३५० वी पुण्यतिथी उमरठ येथे साजरी झाली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणात आपले मत व्यक्त केले. उमरठ येथे सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळाचे सुशोभीकरण करण्यात आले. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते समाधीस्थळाच्या कामाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी समितीतर्फे मुख्यमंत्री ठाकरे यांचा सत्कार करून तलवार आणि नरवीर पगडी देण्यात आली.

हेही वाचा - नरवीर तानाजी मालुसरेंचा 350 वी पुण्यतिथी सोहळा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची राहणार उपस्थिती

गड-किल्ल्यांचे जसे संवर्धन होणे गरजेचे आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांचा पराक्रमही पुढच्या पिढीला कळावा. यासाठी तो इतिहास जपणेही महत्वाचे असल्याचे मत मुख्यमंत्री यांनी आपल्या भाषणात मांडले. त्याचबरोबर आजच्या काळात तान्हाजी मालुसरे असते तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे आमदारकी मागितली असती अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

यावेळी पालकमंत्री अदिती तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार मनोहर भोईर, मीनाक्षी पाटील, राजीप अध्यक्षा योगिता पारधी, राजीप सदस्य चंद्रकांत कळंबे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, शिवभक्त, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा - नरवीर तान्हाजी मालुसरेंची 350 वी पुण्यतिथी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहणार उमरठ येथे उपस्थित

रायगड - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे आपल्या जीवाची राख रांगोळी करणारे मावळे होते, म्हणून स्वराज्य निर्माण झाले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह मावळ्यांचा इतिहासही जिवंत ठेवणे महत्वाचे आहे. आजचा दिवस हा माझा तीर्थक्षेत्राचा पवित्र दिवस आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या समाधी स्थळासाठी आणि स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहे.

नरवीर तानाजी मालुसरे यांचा 350 वा शौर्य दिन आणि पुण्यतिथी सोहळा

सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे यांची ३५० वी पुण्यतिथी उमरठ येथे साजरी झाली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणात आपले मत व्यक्त केले. उमरठ येथे सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळाचे सुशोभीकरण करण्यात आले. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते समाधीस्थळाच्या कामाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी समितीतर्फे मुख्यमंत्री ठाकरे यांचा सत्कार करून तलवार आणि नरवीर पगडी देण्यात आली.

हेही वाचा - नरवीर तानाजी मालुसरेंचा 350 वी पुण्यतिथी सोहळा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची राहणार उपस्थिती

गड-किल्ल्यांचे जसे संवर्धन होणे गरजेचे आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांचा पराक्रमही पुढच्या पिढीला कळावा. यासाठी तो इतिहास जपणेही महत्वाचे असल्याचे मत मुख्यमंत्री यांनी आपल्या भाषणात मांडले. त्याचबरोबर आजच्या काळात तान्हाजी मालुसरे असते तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे आमदारकी मागितली असती अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

यावेळी पालकमंत्री अदिती तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार मनोहर भोईर, मीनाक्षी पाटील, राजीप अध्यक्षा योगिता पारधी, राजीप सदस्य चंद्रकांत कळंबे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, शिवभक्त, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा - नरवीर तान्हाजी मालुसरेंची 350 वी पुण्यतिथी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहणार उमरठ येथे उपस्थित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.