ETV Bharat / state

रायगडमध्ये आठ दिवसात 37 हजार चाकरमानी दाखल, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

author img

By

Published : May 18, 2020, 4:06 PM IST

जिल्ह्यात पायी चालत आणि वाहनाने येणाऱ्या चाकरमान्यांची खारपाडा येथे चेकनाक्यावर तपासणी आणि नोंद करण्यात येत आहे. यानंतर त्यांना प्रशासनाने आणि सामाजिक संस्थानी दिलेल्या वाहनाने त्यांच्या गावी सोडण्यात येत आहे. 11 मेपासून 18 मेपर्यंत जिल्ह्यात 37 हजार नागरिक दाखल झाले आहेत.

रायगडमध्ये आठ दिवसात 37 हजार चाकरमानी दाखल
रायगडमध्ये आठ दिवसात 37 हजार चाकरमानी दाखल

रायगड - जिल्ह्यात पायी चालत आणि वाहनाने येणाऱ्या चाकरमान्यांची खारपाडा येथे चेकनाक्यावर तपासणी आणि नोंद करण्यात येत आहे. यानंतर त्यांना प्रशासनाने आणि सामाजिक संस्थानी दिलेल्या वाहनाने त्यांच्या गावी सोडण्यात येत आहे. 11 मेपासून 18 मेपर्यंत जिल्ह्यात 37 हजार नागरिक दाखल झाले आहेत. यापुढे त्यांना खारपाडा येथून पायी चालत पाठविले जाणार नाही, अशी व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे. अप्पर जिल्हाधिकारी भरत शितोळे यांनी याबद्दल माहिती दिली.

अप्पर जिल्हाधिकारी भरत शितोळे

जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी दिवसरात्र याठिकाणी काम करत आहेत. मुंबईत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे जिल्ह्यातील चाकरमानी हे आता गावाकडे येऊ लागले आहेत. वाहतूकसेवा बंद झाली असल्याने अनेक नागरिक हे पायी चालत अथवा खासगी वाहनाने जिल्ह्यात दाखल होत आहे. जिल्ह्यात चालत येणाऱ्या चाकरमानींपैकी 3 जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर प्रशासनाने पायी चालत येणाऱ्या नागरिकांची खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.

पेण तालुक्यातील खारपाडा येथे जिल्हा प्रशासनाने चेकपोस्ट तयार केला आहे. पायी चालत आणि खासगी वाहनाने येणाऱ्या नागरिकांची चेकपोस्टवर आरोग्य तपासणी केली जात आहे. आलेले नागरिक कुठून कुठे चालले आहेत याची नोंद केली जात आहे. या नागरिकांची माहिती घेऊन त्यांना त्यांच्या गावापर्यंत पोहोचवण्यासाठी सामाजिक संस्था आणि प्रशासनाने वाहनांची व्यवस्था केली आहे. त्यामुळे पायी चालत येणाऱ्या नागरिकांची खारपाडापासूनची पायपीट थांबली आहे.

11 मेपासून आतापर्यत 37 हजार नागरिक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. या सर्वांना त्यांच्या गावात तसेत घरांत होम कवारंटाईन केले जात आहे, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी भरत शितोळे यांनी दिली आहे. जिल्ह्यात आलेल्यांपैकी 9 हजार 78 नागरिक हे संशयित असून 27 हजार 870 जणांना कोणतीही बाधा नाही. आतापर्यंत आलेल्यांपैकी 31 हजार 340 जणांना होम क्वारंटाईन केले असून 4 हजार 839 जणांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे.

रायगड - जिल्ह्यात पायी चालत आणि वाहनाने येणाऱ्या चाकरमान्यांची खारपाडा येथे चेकनाक्यावर तपासणी आणि नोंद करण्यात येत आहे. यानंतर त्यांना प्रशासनाने आणि सामाजिक संस्थानी दिलेल्या वाहनाने त्यांच्या गावी सोडण्यात येत आहे. 11 मेपासून 18 मेपर्यंत जिल्ह्यात 37 हजार नागरिक दाखल झाले आहेत. यापुढे त्यांना खारपाडा येथून पायी चालत पाठविले जाणार नाही, अशी व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे. अप्पर जिल्हाधिकारी भरत शितोळे यांनी याबद्दल माहिती दिली.

अप्पर जिल्हाधिकारी भरत शितोळे

जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी दिवसरात्र याठिकाणी काम करत आहेत. मुंबईत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे जिल्ह्यातील चाकरमानी हे आता गावाकडे येऊ लागले आहेत. वाहतूकसेवा बंद झाली असल्याने अनेक नागरिक हे पायी चालत अथवा खासगी वाहनाने जिल्ह्यात दाखल होत आहे. जिल्ह्यात चालत येणाऱ्या चाकरमानींपैकी 3 जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर प्रशासनाने पायी चालत येणाऱ्या नागरिकांची खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.

पेण तालुक्यातील खारपाडा येथे जिल्हा प्रशासनाने चेकपोस्ट तयार केला आहे. पायी चालत आणि खासगी वाहनाने येणाऱ्या नागरिकांची चेकपोस्टवर आरोग्य तपासणी केली जात आहे. आलेले नागरिक कुठून कुठे चालले आहेत याची नोंद केली जात आहे. या नागरिकांची माहिती घेऊन त्यांना त्यांच्या गावापर्यंत पोहोचवण्यासाठी सामाजिक संस्था आणि प्रशासनाने वाहनांची व्यवस्था केली आहे. त्यामुळे पायी चालत येणाऱ्या नागरिकांची खारपाडापासूनची पायपीट थांबली आहे.

11 मेपासून आतापर्यत 37 हजार नागरिक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. या सर्वांना त्यांच्या गावात तसेत घरांत होम कवारंटाईन केले जात आहे, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी भरत शितोळे यांनी दिली आहे. जिल्ह्यात आलेल्यांपैकी 9 हजार 78 नागरिक हे संशयित असून 27 हजार 870 जणांना कोणतीही बाधा नाही. आतापर्यंत आलेल्यांपैकी 31 हजार 340 जणांना होम क्वारंटाईन केले असून 4 हजार 839 जणांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.