ETV Bharat / state

बीएसएनएलच्या २५६ कर्मचाऱ्यांची स्वेच्छानिवृत्ती, दुरध्वनी यंत्रणेवर पडणार ताण

स्वेच्छानिवृत्ती स्वीकारलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना कंपनीतर्फे समारंभाचे आयोजन करून सामूहिकरीत्या निरोप देण्यात आला. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असल्याने केंद्र सरकारच्या या कंपनीने कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

author img

By

Published : Feb 4, 2020, 4:14 PM IST

Updated : Feb 4, 2020, 5:09 PM IST

bsnl
बीएसएनएलच्या २५६ कर्मचाऱ्यांची स्वेच्छानिवृत्ती

रायगड - भारत संचार निगम कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सरकारने स्वेच्छानिवृत्ती योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गंत जिल्ह्यातील ४०२ पैकी २५६ कर्मचाऱ्यांनी निवृत्ती स्वीकारली आहे. मात्र, अचानक एवढे कर्मचारी कमी झाल्याने कामाचा ताण आता उर्वरित १४६ कर्मचाऱ्यांवर पडणार आहे. कर्मचारी नसल्याने यामुळे ग्राहकांचीही गैरसोय होणार आहे.

बीएसएनएलच्या २५६ कर्मचाऱ्यांची स्वेच्छानिवृत्ती

या कर्मचाऱ्यांवर आता जिल्ह्यातील १३ दुरध्वनी केंद्रांचा भार पडणार आहे. अलिबाग विभागात एकाच वेळेला १९ कर्मचार्‍यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. २७ कर्मचार्‍यांपैकी अवघे सात कर्मचारीच सेवेत उरल्याने आता ही भली मोठी इमारत सुनीसुनी पहावयास मिळणार आहे. निवृत्त होणार्‍या कर्मचार्‍यांमध्ये सर्वाधिक ११ लाईनमनचा समावेश आहे. त्यांच्यानंतर सुमारे २ हजार कनेक्शनचा भार पेलण्यासाठी अवघे ५ लाईनमनच उरले आहेत.

हेही वाचा - BSNL च्या तब्बल 75 हजार कर्मचाऱ्यांनी घेतली स्वेच्छानिवृत्ती

स्वेच्छानिवृत्ती स्वीकारलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना कंपनीतर्फे समारंभाचे आयोजन करून सामूहिकरीत्या निरोप देण्यात आला. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असल्याने केंद्र शासनाच्या या कंपनीने कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा - '...त्यालाही पेट्रोल टाकून जाळा, पीडितेच्या आईची उद्विग्न प्रतिक्रिया'

कमी झालेल्या या कर्मचाऱ्यांमुळे दुरध्वनी, इंटरनेट सेवा आणखी डबघाईला जाण्याची शक्यता आहे. लँडलाईन सेवेच्या दुरुस्तीसाठी आऊटसोर्सिंग करण्यात आलेली नसल्याने याचा परिणाम ग्राहकांना मोठ्या प्रमाणात सोसावा लागणार आहे. मागील ५ वर्षात बीएसएनएलची सेवा अनेकदा खंडित झाली. खासगी कंपन्यांच्या स्पर्धेत या सरकारी कंपनीच्या कर्मचार्‍यांची चांगलीच दमछाक होत होती. अशाही परिस्थितीत हे कर्मचारी काम करीत होते. सतत वाढत जाणार्‍या आर्थिक तोट्यामुळे पगार देणे परवडत नसल्याचे कारण देत भारत दूरसंचार निगमने निवृत्ती योजना जाहीर केली होती.

हेही वाचा - भाजप नेते 'रावण की औलाद', तर काँग्रेस नेते 'गांधीजींचे नकली भक्त...'

जिल्ह्यात सध्या ऑप्टीकल फायबर लाईन, लीज लाईनची दुरुस्ती प्राधान्यक्रमाने केली जात असून मोबाईल कनेक्टीव्हीटीचे आऊटसोर्सिंग पूर्ण झालेले आहे. याशिवाय येत्या मार्चपर्यंत ४ जी सेवा रायगडमध्ये सुरू होईल, असा अंदाज आहे.

रायगड - भारत संचार निगम कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सरकारने स्वेच्छानिवृत्ती योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गंत जिल्ह्यातील ४०२ पैकी २५६ कर्मचाऱ्यांनी निवृत्ती स्वीकारली आहे. मात्र, अचानक एवढे कर्मचारी कमी झाल्याने कामाचा ताण आता उर्वरित १४६ कर्मचाऱ्यांवर पडणार आहे. कर्मचारी नसल्याने यामुळे ग्राहकांचीही गैरसोय होणार आहे.

बीएसएनएलच्या २५६ कर्मचाऱ्यांची स्वेच्छानिवृत्ती

या कर्मचाऱ्यांवर आता जिल्ह्यातील १३ दुरध्वनी केंद्रांचा भार पडणार आहे. अलिबाग विभागात एकाच वेळेला १९ कर्मचार्‍यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. २७ कर्मचार्‍यांपैकी अवघे सात कर्मचारीच सेवेत उरल्याने आता ही भली मोठी इमारत सुनीसुनी पहावयास मिळणार आहे. निवृत्त होणार्‍या कर्मचार्‍यांमध्ये सर्वाधिक ११ लाईनमनचा समावेश आहे. त्यांच्यानंतर सुमारे २ हजार कनेक्शनचा भार पेलण्यासाठी अवघे ५ लाईनमनच उरले आहेत.

हेही वाचा - BSNL च्या तब्बल 75 हजार कर्मचाऱ्यांनी घेतली स्वेच्छानिवृत्ती

स्वेच्छानिवृत्ती स्वीकारलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना कंपनीतर्फे समारंभाचे आयोजन करून सामूहिकरीत्या निरोप देण्यात आला. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असल्याने केंद्र शासनाच्या या कंपनीने कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा - '...त्यालाही पेट्रोल टाकून जाळा, पीडितेच्या आईची उद्विग्न प्रतिक्रिया'

कमी झालेल्या या कर्मचाऱ्यांमुळे दुरध्वनी, इंटरनेट सेवा आणखी डबघाईला जाण्याची शक्यता आहे. लँडलाईन सेवेच्या दुरुस्तीसाठी आऊटसोर्सिंग करण्यात आलेली नसल्याने याचा परिणाम ग्राहकांना मोठ्या प्रमाणात सोसावा लागणार आहे. मागील ५ वर्षात बीएसएनएलची सेवा अनेकदा खंडित झाली. खासगी कंपन्यांच्या स्पर्धेत या सरकारी कंपनीच्या कर्मचार्‍यांची चांगलीच दमछाक होत होती. अशाही परिस्थितीत हे कर्मचारी काम करीत होते. सतत वाढत जाणार्‍या आर्थिक तोट्यामुळे पगार देणे परवडत नसल्याचे कारण देत भारत दूरसंचार निगमने निवृत्ती योजना जाहीर केली होती.

हेही वाचा - भाजप नेते 'रावण की औलाद', तर काँग्रेस नेते 'गांधीजींचे नकली भक्त...'

जिल्ह्यात सध्या ऑप्टीकल फायबर लाईन, लीज लाईनची दुरुस्ती प्राधान्यक्रमाने केली जात असून मोबाईल कनेक्टीव्हीटीचे आऊटसोर्सिंग पूर्ण झालेले आहे. याशिवाय येत्या मार्चपर्यंत ४ जी सेवा रायगडमध्ये सुरू होईल, असा अंदाज आहे.

Intro:

जिल्ह्यातील बीएसएनएल कार्यालयातील खुर्च्या झाल्या रिकाम्या

402 पैकी 256 कर्मचार्‍यांनी घेतली स्वेच्छानिवृत्ती

दुरध्वनी यंत्रणेवर पडणार ताण, ग्राहकांची होणार गैरसोय



रायगड : उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी काहीशी परिस्थिती केंद्र शासनाच्या भारत संचार निगम लिमिटेडची झाल्याने कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी देशातील भारत संचार निगम कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करण्यात आली. रायगड जिल्ह्यातील 402 पैकी 256 कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आहे. या कर्मचाऱ्यांना समारंभाचे आयोजन करून सामूहिकरीत्या निरोपही देण्यात आला. मात्र अचानक एवढ्या कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील कामाचा ताण हा राहिलेल्या 146 कर्मचाऱ्यांवर पडणार आहे. तसेच कर्मचारी नसल्याने ग्राहकांचीही गैरसोय होणार आहे.

दुरध्वनी, इंटरनेट सेवेचा बोजवारा उडालेला असल्याने कमी झालेल्या कर्मचार्‍यांमुळे ही सेवा आणखीनच डबघाईली जाण्याची शक्यता आहे. लँडलाईन सेवेच्या दुरुस्तीसाठी आऊटसोर्सिंग करण्यात आलेली नसल्याने याचा परीणाम लँडलाईन ग्राहकांना मोठ्या प्रमाणास सोसावा लागणार आहे. मागील पाच वर्षात बीएसएनएलची सेवा खंडीत झालेली नाही असा एकही आठवडा गेलेला नाही. खाजगी कंपन्यांच्या स्पर्धेत या सरकारी कंपनीच्या कर्मचार्‍यांची चांगलीच दमछाक होत होती. अशाही परिस्थितीत हे कर्मचारी बीएसएनएलमध्ये काम करीत होते. सतत वाढत जाणार्‍या आर्थिक तोट्यात पगार देणे परवडत नसल्याचे कारण देत भारत दूरसंचार निगमने निवृत्ती योजना जाहीर केली होती.

Body:या योजनेचा रायगडमधील 256 कर्मचार्‍यांनी स्वीकार केला आहे. त्यामुळे आता अवघे 146 कर्मचार्‍यांवरच रायगड जिल्ह्यातील 13 दुरध्वनी केंद्रांचा भार पडणार आहे. अलिबाग विभागातील एकाच वेळेला 19 कर्मचार्‍यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. 27 कर्मचार्‍यांपैकी आता अवघे सात कर्मचारीच बिएसएनएलच्या सेवेत उरल्याने आता ही भली मोठी इमारत सुनीसुनी पहावयास मिळणार आहे. निवृत्त होणार्‍या कर्मचार्‍यांमध्ये सर्वाधिक 11 लाईनमनचा समावेश आहे. त्यामुळे आता सुमारे 2 हजार कनेक्श्‍नचा भार पेलण्यासाठी अवघे 5 लाईनमनच उरले आहेत.
.Conclusion:
भारत दूरसंचार निगमने स्वेच्छानिवृत्ती योजना लागू केल्याने अनेकांनी ही योजना स्वीकारली आहे. त्याचबरोबर नवीन भरती न करता आऊट सोर्सिंग मार्फत काम करून घेतले जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यावरील पगाराचा ताण कंपनीचा कमी होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना योग्य सेवा दिली जाईल का हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहणार आहे.

कर्मचार्‍यांच्या कमतरतेमुळे लँडलाईंन दुरुस्तीची कामे करता येत नव्हती. अद्यापही यासाठी आऊटसोर्सिंग करण्यात आलेले नाही. ऑप्टीकल फायबर लाईन, लीज लाईन यांची दुरुस्ती प्राधान्यक्रमाने केली जात आहे. मोबाईल कनेक्टीव्हीटीचे आऊटसोर्सिंग पूर्ण झालेले आहे. मार्चपर्यत फोरजी सेवा रायगडमध्ये सुरु होईल, त्यामुळे मोबाईल कनेक्टीव्हीटीवर याचा परिणाम होणार नाही
Last Updated : Feb 4, 2020, 5:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.