ETV Bharat / state

वंचित बहुजन आघाडीतर्फे 'वंचित वारकरी सन्मान यात्रेचा' शुभारंभ

पाच दिवसांच्या या यात्रेत हडपसर, भिगवण, पंढरपूर, मोहोळ आणि माढा येथील मंदिर, मदरसे आणि बुद्ध विहारात विसावा घेतला जाईल. या यात्रेमार्फत वंचित आघाडीकडून वारकरी विद्यापीठ आणि त्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात येईल. त्याचबरोबर याप्रकरणी वंचित आघाडी त्यांची भूमिका देखील मांडणार आहे.

author img

By

Published : Sep 11, 2019, 5:43 PM IST

यात्रेतील दृश्य

पुणे - एकीकडे एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीत बिघाडी झाली आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने 'वंचित वारकरी सन्मान यात्रा' सुरू केली आहे. संत तुकोबांच्या देहूतून निघालेली ही यात्रा सोलापूरच्या अरण येथील संत शिरोमणी सावता माळी मंदिरापर्यंत निघणार असून ही यात्रा पाच दिवस चालणार आहे.

यात्रेबाबत माहिती देताना राहुल ओव्हळ

पाच दिवसांच्या या यात्रेत हडपसर, भिगवण, पंढरपूर, मोहोळ आणि माढा येथील मंदिर, मदरसे आणि बुद्ध विहारात विसावा घेतला जाईल. या यात्रेमार्फत वंचित आघाडीकडून वारकरी विद्यापीठ आणि त्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात येईल. त्याचबरोबर याप्रकरणी वंचित आघाडी त्यांची भूमिका देखील मांडणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत या यात्रेचा समारोप होईल.

हेही वाचा- संकटात सोडून मित्रांनी घेतला काढता पाय; शिवदुर्ग रेस्क्यू टीमने वाचवले तरुणाचे प्राण

लोकसभा निवडणुकीत आंबेडकरांनी दलित आणि मुस्लिमांची मूठ बांधली. पण त्यात म्हणावे तितके यश आले नाही. त्यातच एमआयएमने स्वतंत्र निवडणूक लढण्याची घोषणा केली. म्हणूनच आता वारकरी सांप्रदायाकडे वंचितने त्यांचा मोर्चा वळवला आहे, असे बोलले जात आहे.

पुणे - एकीकडे एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीत बिघाडी झाली आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने 'वंचित वारकरी सन्मान यात्रा' सुरू केली आहे. संत तुकोबांच्या देहूतून निघालेली ही यात्रा सोलापूरच्या अरण येथील संत शिरोमणी सावता माळी मंदिरापर्यंत निघणार असून ही यात्रा पाच दिवस चालणार आहे.

यात्रेबाबत माहिती देताना राहुल ओव्हळ

पाच दिवसांच्या या यात्रेत हडपसर, भिगवण, पंढरपूर, मोहोळ आणि माढा येथील मंदिर, मदरसे आणि बुद्ध विहारात विसावा घेतला जाईल. या यात्रेमार्फत वंचित आघाडीकडून वारकरी विद्यापीठ आणि त्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात येईल. त्याचबरोबर याप्रकरणी वंचित आघाडी त्यांची भूमिका देखील मांडणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत या यात्रेचा समारोप होईल.

हेही वाचा- संकटात सोडून मित्रांनी घेतला काढता पाय; शिवदुर्ग रेस्क्यू टीमने वाचवले तरुणाचे प्राण

लोकसभा निवडणुकीत आंबेडकरांनी दलित आणि मुस्लिमांची मूठ बांधली. पण त्यात म्हणावे तितके यश आले नाही. त्यातच एमआयएमने स्वतंत्र निवडणूक लढण्याची घोषणा केली. म्हणूनच आता वारकरी सांप्रदायाकडे वंचितने त्यांचा मोर्चा वळवला आहे, असे बोलले जात आहे.

Intro:mh_pun_01_vanchit_vari_avb_mhc10002Body:mh_pun_01_vanchit_vari_avb_mhc10002

Anchor:- एकीकडे MIM आणि वंचित बघून आघाडीत बिघाडी झाली आहे तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने वंचित वारकरी सन्मान यात्रा सुरू केली आहे. संत तुकोबांच्या देहूतून निघालेली ही यात्रा सोलापूरच्या अरण येथील संत शिरोमणी सावता माळी मंदिरापर्यंत निघणार आहे. पाच दिवसांच्या या यात्रेत हडपसर, भिगवण, पंढरपूर, मोहोळ आणि माढा येथील मंदिरं, मदरसे आणि बुद्ध विहारात विसावा घेतला जाईल. वारकरी विद्यापीठ आणि त्यांचे प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधताना वंचित आघाडी त्यांची भूमिका या यात्रेत मांडणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत या यात्रेचा समारोप होईल. लोकसभा निवडणुकीला आंबेडकरांनी दलित आणि मुस्लिमांची मूठ बांधली पण त्यात म्हणावं तितकं यश आलं नाही. त्यातच MIM ने स्वतंत्र निवडणूक लढण्याची घोषणा केली. म्हणूनच आता वारकरी संप्रदायाकडे वंचितने त्यांचा मोर्चा वळवलाय. त्यामुळे या विधानसभेत वंचित बहुजन आघाडीकडून धर्माचं राजकारण करण्याचा प्रयत्न होतोय, असं म्हणायला वाव आहे.

बाईट- राहुल ओव्हळ Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.