ETV Bharat / state

ना गर्दी ना लाट.. तरीही माऊलींच्या पालखीचा आळंदीत थाट

author img

By

Published : Jun 13, 2020, 2:15 PM IST

संत ज्ञानेश्वर माऊलींचा आषाढी वारी सोहळा संपन्न होत असताना, या सोहळ्यात कोरोनाच्या महामारीचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे हा सोहळा मर्यादित लोकांच्या उपस्थितीत पार पडत आहे.

sant-dnyaneshwar-maharaj-palkhi-departure-ceremony-in-alandi
माऊलींच्या पालखीचा आळंदीत थाट

आळंदी (पुणे) - संत ज्ञानेश्वर माऊलींचा आषाढीवारी सोहळा आज अलंकापुरीमध्ये होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे 50 मुख्य वारकऱ्यांच्या उपस्थित हा सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर परिसर, संजीवन समाधी मंदिर फुलमाळांनी सजवण्यात आले आहे. मंदिर परिसरात निर्जंतुकीकरण करून फिजिकल डिस्टन्सचे तंतोतंत पालन केले जात आहे. हा सोहळा विनाविघ्न पार पडणार असल्याचा विश्वास, मुख्य विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी व्यक्त केला.

माऊलींच्या पालखीचा आळंदीत थाट
संत ज्ञानेश्वर माऊलींचा आषाढी वारी सोहळा होत असताना, या सोहळ्यात कोरोनाच्या महामारीचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे हा सोहळा मर्यादित लोकांच्या उपस्थितीत पार पडत आहे. याची खंत वारकऱ्यांसह देवस्थानाला आहे. मात्र, कोरोनाच्या महामारीवर मात करण्यासाठी वारकरी व भक्तांनी सहकार्याची भूमिका घेत सोहळ्याला संमती दिली. आषाढी वारी सोहळ्यामध्ये शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने सहभागी होत असतो. या शेतकऱ्यांना वर्षभराची ऊर्जा माऊलींच्या वारीतून मिळते. वर्षभर शेतात काबाडकष्ट करून वारकरी माऊलींच्या वारीत सहभागी होत असतो. मात्र, यावर्षी शेतकऱ्यांना वारीत सहभागी होता आले नाही. कोरोनासारख्या महामारीवर मात करण्यासाठी वारकरी व भाविकांनी या वारी सोहळ्यात सहभागी होऊ नये, असे आव्हान देवस्थानचे मुख्य विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी केले आहे.

आळंदी (पुणे) - संत ज्ञानेश्वर माऊलींचा आषाढीवारी सोहळा आज अलंकापुरीमध्ये होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे 50 मुख्य वारकऱ्यांच्या उपस्थित हा सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर परिसर, संजीवन समाधी मंदिर फुलमाळांनी सजवण्यात आले आहे. मंदिर परिसरात निर्जंतुकीकरण करून फिजिकल डिस्टन्सचे तंतोतंत पालन केले जात आहे. हा सोहळा विनाविघ्न पार पडणार असल्याचा विश्वास, मुख्य विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी व्यक्त केला.

माऊलींच्या पालखीचा आळंदीत थाट
संत ज्ञानेश्वर माऊलींचा आषाढी वारी सोहळा होत असताना, या सोहळ्यात कोरोनाच्या महामारीचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे हा सोहळा मर्यादित लोकांच्या उपस्थितीत पार पडत आहे. याची खंत वारकऱ्यांसह देवस्थानाला आहे. मात्र, कोरोनाच्या महामारीवर मात करण्यासाठी वारकरी व भक्तांनी सहकार्याची भूमिका घेत सोहळ्याला संमती दिली. आषाढी वारी सोहळ्यामध्ये शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने सहभागी होत असतो. या शेतकऱ्यांना वर्षभराची ऊर्जा माऊलींच्या वारीतून मिळते. वर्षभर शेतात काबाडकष्ट करून वारकरी माऊलींच्या वारीत सहभागी होत असतो. मात्र, यावर्षी शेतकऱ्यांना वारीत सहभागी होता आले नाही. कोरोनासारख्या महामारीवर मात करण्यासाठी वारकरी व भाविकांनी या वारी सोहळ्यात सहभागी होऊ नये, असे आव्हान देवस्थानचे मुख्य विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी केले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.