ETV Bharat / state

आघाडीतील जागावाटप राजू शेट्टी यांना अमान्य; मित्रपक्षांसाठी 60 जागांची मागणी

author img

By

Published : Sep 20, 2019, 7:01 PM IST

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने जागा वाटपात मित्रपक्षांना केवळ 38 जागा दिल्या आहेत. मात्र, मित्रपक्षांसाठी 55 ते 60 जागा द्याव्यात, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.

पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना राजू शेट्टी

पुणे - काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीमध्ये 125-125 असे जागा वाटप झाले आहे. मित्रपक्षांना केवळ 38 जागा दिल्या आहेत. मात्र, मित्रपक्षांना ही जागा वाटप अमान्य आहे. मित्रपक्षांसाठी 55 ते 60 जागा द्याव्यात, आम्ही त्या आपापसात वाटून घेऊ, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.


पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात स्वाभिमानी शेतकरी संघटना व प्रजा लोकशाही परिषदेचा मेळावा पार पडला. मेळावा संपल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शेट्टी बोलत होते. या मेळाव्यात राज्यातील 10 ते 15 संघटनांनी राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा दिला. या मेळाव्यात आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याच्या दृष्टिकोनातून रणनीती आखण्यात आली.

हेही वाचा - 'सेना-भाजप जागावाटपाचा फॉर्म्युला लोकसभेलाच ठरलाय'


मी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांशी बोललो आहे. त्यामुळे भाजप-सेनेविरोधात लढायचे असेल, तर आम्हाला कुणीही गृहीत धरू नये. मित्रपक्षांची ताकद लक्षात घेता 55 ते 60 जागा सोडल्याच पाहिजेत, असे राजू शेट्टी म्हणाले. राजू शेट्टींनी केलेली वाढीव जागांची मागणी पाहता आघाडीचे नेते काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

पुणे - काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीमध्ये 125-125 असे जागा वाटप झाले आहे. मित्रपक्षांना केवळ 38 जागा दिल्या आहेत. मात्र, मित्रपक्षांना ही जागा वाटप अमान्य आहे. मित्रपक्षांसाठी 55 ते 60 जागा द्याव्यात, आम्ही त्या आपापसात वाटून घेऊ, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.


पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात स्वाभिमानी शेतकरी संघटना व प्रजा लोकशाही परिषदेचा मेळावा पार पडला. मेळावा संपल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शेट्टी बोलत होते. या मेळाव्यात राज्यातील 10 ते 15 संघटनांनी राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा दिला. या मेळाव्यात आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याच्या दृष्टिकोनातून रणनीती आखण्यात आली.

हेही वाचा - 'सेना-भाजप जागावाटपाचा फॉर्म्युला लोकसभेलाच ठरलाय'


मी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांशी बोललो आहे. त्यामुळे भाजप-सेनेविरोधात लढायचे असेल, तर आम्हाला कुणीही गृहीत धरू नये. मित्रपक्षांची ताकद लक्षात घेता 55 ते 60 जागा सोडल्याच पाहिजेत, असे राजू शेट्टी म्हणाले. राजू शेट्टींनी केलेली वाढीव जागांची मागणी पाहता आघाडीचे नेते काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Intro:आघाडीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात 125-125 जागा वाटप झाल्या आहेत.मित्रपक्षांना केवळ 38 जागा देण्यात आल्यात. मात्र या 38 जागा ज्या मित्रपक्षांना दिल्या गेल्या आहेत त्या अमान्य असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले..मित्रपक्षांसाठी 55 ते 60 जागा सोडा..आम्ही त्या आपापसात वाटून घेऊ असेही शेट्टी यांनी सांगितले..
Body:पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात स्वाभिमानी शेतकरी संघटना व प्रजा लोकशाही परीषेदेचा मेळावा पार पडला..या मेळाव्यात राज्यातील 10 ते 15 संघटनांनी राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा दिला. या मेळाव्यात आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याच्या दृष्टिकोनातून रणनीती आखण्यात आले. हा मेळावा संपल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते..
Conclusion:राजू शेट्टी म्हणाले, याविषयी मी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांशीही बोललो आहे. त्यामुळे भाजप सेनेविरोधात लढायचे असेल तर आम्हाला कुणीही गृहीत धरू नये..मित्रपक्षांची ताकद लक्षात घेता 55 ते 60 जागा सोडल्याच पाहिजे..कुठलीही कुरबुर न करता आम्ही त्या आपापसात वाटून घेऊ..

त्यामुळे राजू शेट्टींनी केलेली वाढीव जागांची मागणी पाहता आघाडीचे नेते काय निर्णय घेतात याकडे पाहणे महत्वाचे ठरेल...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.