ETV Bharat / state

विद्यार्थ्यांच्या परिक्षेत अधिकारीच नापास, खेड पंचायत समितीतील धक्कादायक वास्तव

'सर्व शिक्षा अभियान' म्हणजे काय? यावर प्रश्नावर अधिकारी निरूत्तर. खेड तालुका पंचायत समितीत आलेल्या शाळकरी मुलांनी अधिकाऱ्यांना विचारलेल्या प्रश्नांनंतर धक्कादायक वास्तव समोर आले.

author img

By

Published : Jul 11, 2019, 7:40 PM IST

विद्यार्थ्यांच्या परिक्षेत अधिकारीच नापास, खेड पंचायत समितीतील धक्कादायक वास्तव

पुणे - जिल्ह्यातील खेड पंचायत समितीमध्ये कामकाजाची माहिती घेण्यासाठी शाळकरी विद्यार्थी आले होते. यावेळी विद्यार्थ्यांकडून अधिकाऱ्यांना काही सोपे सोपे प्रश्न विचारण्यात आले होते. मात्र 'सर्व शिक्षा अभियान' म्हणजे काय? या प्रश्नाचेही उत्तर देऊ न शकलेल्या अधिकाऱ्यांकडून पंचायत समितीचे कामकाज कसे चालवले जाते, हा प्रश्न आहे.

खेड पंचायत समितीतील धक्कादायक वास्तव,'सर्व शिक्षा अभियान' म्हणजे काय? यावर प्रश्नावर अधिकारी निरूत्तर

केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या योजना व कार्यालयीन कामकाज कशा पद्धतीने चालविलेले जाते, याचा अभ्यास करण्यासाठी राजगुरुनगर येथील 'के टी एस इंग्लिश मेडिअम स्कुल'चे विद्यार्थी खेड पंचायत समितीत आले होते. यावेळी विभागानुसार माहिती घेत, कार्यालयीन प्रमुखाशी संवाद साधत असताना मुलांनी काही प्रश्न विचारले. मात्र या प्रश्नांची उत्तरे देता न आल्याने अधिकाऱ्यांवर गप्प रहाण्याची वेळ आली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, बांधकाम, कृषी, महिला व बाल कल्याण, पशुसंवर्धन असे विविध विभाग चालविले जातात. या विभागांवर गट विकास आधिकारी, प्रशासकीय कार्यालय प्रमुख यांचे नियंत्रण असते. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रश्न उत्तराच्या फेरीत "सर्व शिक्षा अभियान" कसे चालविले जाते असा प्रश्न विचारला असता प्रशासकीय कार्यालयीन प्रमुखांनीच मला या प्रश्नाचे उत्तर येत नसुन, मला माफ करा असे सांगितले.

सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून शाळकरी मुलांना घडविण्यासाठी शिक्षण विभागामार्फत योजना राबविली जाते. मात्र या योजनेबाबत चक्क पंचायत समितीतील अधिकारीच अनभिज्ञ असल्याने, खेड पंचायत समितीच्या कामकाजावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. गट विकास आधिकारी बाळासाहेब ढवळे यांनी मात्र आपल्या कार्यालयाची बाजु मारुन नेण्याचा केविलवाना प्रयत्न केला. परंतु त्यामुळे कार्यालयाचे वास्तव मात्र झाकता येणार नाही.

पुणे - जिल्ह्यातील खेड पंचायत समितीमध्ये कामकाजाची माहिती घेण्यासाठी शाळकरी विद्यार्थी आले होते. यावेळी विद्यार्थ्यांकडून अधिकाऱ्यांना काही सोपे सोपे प्रश्न विचारण्यात आले होते. मात्र 'सर्व शिक्षा अभियान' म्हणजे काय? या प्रश्नाचेही उत्तर देऊ न शकलेल्या अधिकाऱ्यांकडून पंचायत समितीचे कामकाज कसे चालवले जाते, हा प्रश्न आहे.

खेड पंचायत समितीतील धक्कादायक वास्तव,'सर्व शिक्षा अभियान' म्हणजे काय? यावर प्रश्नावर अधिकारी निरूत्तर

केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या योजना व कार्यालयीन कामकाज कशा पद्धतीने चालविलेले जाते, याचा अभ्यास करण्यासाठी राजगुरुनगर येथील 'के टी एस इंग्लिश मेडिअम स्कुल'चे विद्यार्थी खेड पंचायत समितीत आले होते. यावेळी विभागानुसार माहिती घेत, कार्यालयीन प्रमुखाशी संवाद साधत असताना मुलांनी काही प्रश्न विचारले. मात्र या प्रश्नांची उत्तरे देता न आल्याने अधिकाऱ्यांवर गप्प रहाण्याची वेळ आली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, बांधकाम, कृषी, महिला व बाल कल्याण, पशुसंवर्धन असे विविध विभाग चालविले जातात. या विभागांवर गट विकास आधिकारी, प्रशासकीय कार्यालय प्रमुख यांचे नियंत्रण असते. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रश्न उत्तराच्या फेरीत "सर्व शिक्षा अभियान" कसे चालविले जाते असा प्रश्न विचारला असता प्रशासकीय कार्यालयीन प्रमुखांनीच मला या प्रश्नाचे उत्तर येत नसुन, मला माफ करा असे सांगितले.

सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून शाळकरी मुलांना घडविण्यासाठी शिक्षण विभागामार्फत योजना राबविली जाते. मात्र या योजनेबाबत चक्क पंचायत समितीतील अधिकारीच अनभिज्ञ असल्याने, खेड पंचायत समितीच्या कामकाजावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. गट विकास आधिकारी बाळासाहेब ढवळे यांनी मात्र आपल्या कार्यालयाची बाजु मारुन नेण्याचा केविलवाना प्रयत्न केला. परंतु त्यामुळे कार्यालयाचे वास्तव मात्र झाकता येणार नाही.

Intro:Anc__केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या योजना व कार्यालयीन कामकाज कशा पद्धतीने चालविलेले जाते त्यासाठी पंचायत समितीत विभागनुसार अभ्यास करण्यासाठी राजगुरुनगर येथील के टी एस इंग्लिश मेडिअम स्कुल चे विद्यार्थी खेड पंचायत समितीत विभागानुसार माहिती घेत असताना प्रशासकिय कार्यालयीन प्रमुखाशी संवाद साधत असताना शाळकरी मुलांच्या सर्व शिक्षा अभियान कसे चालते" या प्रश्नाना उत्तरे देताना आधिका-यांना गप्प रहाण्याची वेळ आली

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य,बांधकाम,कृषी,महिला व बाल कल्याण, पशुसंवर्धन असे विविध विभाग चालविले जातात त्यावर गट विकास आधिका-यांनंतर प्रशासकीय कार्यालय प्रमुखांचे नियंत्रण असते त्यानुसार कामकाज चालते याच कामकाजाची माहिती घेण्यासाठी शाळकरी विद्यार्थी आले आणि प्रश्न उत्तराच्या फेरीत "सर्व शिक्षा अभियान" कसे चालविले जाते असा प्रश्न विचारला असताना प्रशासकीय कार्यालयीन प्रमुख असणारे श्री इष्टे यांनी या प्रश्नाचे उत्तर येत नसुन मला माफ करा असे सांगत हस्स्यास्पद उत्तर दिले.

सर्व शिक्षा अभियान याच्या माध्यमातून शाळकरी मुलांना घडविण्यासाठी शिक्षण विभागातून योजना राबविली जाते मात्र या योजनेबाबत चक्क पंचायत समिती कार्यालयीन प्रमुखाला सर्व शिक्षा अभियानाची माहिती नसल्याने खेड पंचायत समितीच्या कामकाजावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत असताना गट विकास आधिकारी बाळासाहेब ढवळे यांनी आपल्या कार्यालयाची बाजु मारुन नेऊन मुलांच्या प्रश्नांची उत्तरे शिक्षण विभागातून देण्याचा प्रयत्न करु असे सांगितलेBody:....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.