ETV Bharat / state

महाविकास आघाडीची कर्जमाफी उधारीवर; शरद बुट्टेपाटलांचा आरोप - शरद बुट्टेपाटील

पीककर्ज दोन लाखांपेक्षा जास्त असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नसल्याने, ही कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप भाजपचे गटनेते शरद बुट्टे-पाटील यांनी केला आहे. तसेच संबंधित कर्जमाफी उधारीवर असल्याचे ते म्हणाले.

sharad buttepatil news
महाविकास आघाडीची कर्जमाफी उधारीवर; शरद बुट्टेपाटलांचा आरोप
author img

By

Published : Dec 28, 2019, 5:53 PM IST

पुणे - पीककर्ज दोन लाखांपेक्षा जास्त असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नसल्याने, ही कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप भाजपचे गटनेते शरद बुट्टे-पाटील यांनी केला आहे. तसेच संबंधित कर्जमाफी उधारीवर असल्याचे ते म्हणाले.

महाविकास आघाडीची कर्जमाफी उधारीवर; शरद बुट्टेपाटलांचा आरोप

राजगुरूनगर येथे भाजपचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरून महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

हिवाळी अधिवेशनादरम्यान कर्जमाफीच्या बजेटसाठीची तरतूद पुरवणी यादीत करता आली असती. मात्र, ते न करता सरकारने फक्त घोषणा केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच दोन लाखांहून अधिक कर्ज असणाऱ्या एकाही शेतकऱ्याला याचा फायदा होणार नसून, शेतकऱ्यांना मार्च मधील अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी वाट पाहावी लागणार आहे, असे शरद बुट्टे-पाटील म्हणाले.

हेही वाचा - 'उद्धव साहेब... हे काँग्रेस राष्ट्रवादीवाले तुम्हाला फसवतायत'

सरसकट कर्जमाफी दिली जाणार अशी घोषणा करण्यात आली. परंतु, प्रत्यक्षात या सरकारने दोन लाखांची मर्यादा लावल्याने अनेक शेतकरी यापासून वंचित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच कर्जमाफीला वेळ लागणार असून यामुळे शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळण्यास अडचणींचा सामना करावा लागणार आहे, असे ते म्हणाले.

पुणे - पीककर्ज दोन लाखांपेक्षा जास्त असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नसल्याने, ही कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप भाजपचे गटनेते शरद बुट्टे-पाटील यांनी केला आहे. तसेच संबंधित कर्जमाफी उधारीवर असल्याचे ते म्हणाले.

महाविकास आघाडीची कर्जमाफी उधारीवर; शरद बुट्टेपाटलांचा आरोप

राजगुरूनगर येथे भाजपचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरून महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

हिवाळी अधिवेशनादरम्यान कर्जमाफीच्या बजेटसाठीची तरतूद पुरवणी यादीत करता आली असती. मात्र, ते न करता सरकारने फक्त घोषणा केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच दोन लाखांहून अधिक कर्ज असणाऱ्या एकाही शेतकऱ्याला याचा फायदा होणार नसून, शेतकऱ्यांना मार्च मधील अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी वाट पाहावी लागणार आहे, असे शरद बुट्टे-पाटील म्हणाले.

हेही वाचा - 'उद्धव साहेब... हे काँग्रेस राष्ट्रवादीवाले तुम्हाला फसवतायत'

सरसकट कर्जमाफी दिली जाणार अशी घोषणा करण्यात आली. परंतु, प्रत्यक्षात या सरकारने दोन लाखांची मर्यादा लावल्याने अनेक शेतकरी यापासून वंचित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच कर्जमाफीला वेळ लागणार असून यामुळे शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळण्यास अडचणींचा सामना करावा लागणार आहे, असे ते म्हणाले.

Intro:Anc_ महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना व काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन केलं मात्र महाविकास आघाडीच्या सरकारने केलेली कर्जमाफी ही उधारीवर केलेली कर्जमाफी असून कर्जमाफीची मार्चच्या बजेटला होणे बाकी असून ज्यांचे कर्ज दोन लाखापेक्षा एक रुपयांनी जास्त असेल त्यांना कर्जाची माफी मिळणार नाही त्यामुळे ही कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप जिल्हापरिषदेचे सदस्य व भाजपचे गटनेते शरद बुट्टेपाटील यांनी आज राजगुरुनगर येथे कार्यकर्ता मेळाव्यात केली

हिवाळी अधिवेशन काळामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बजेटसाठीची तरतूद पुरवणी यादीत करता आली असती मात्र ती न करता फक्त घोषणा करण्यात आली आणि दोन लाखाच्या पुढे कर्ज असणाऱ्या एकाही शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार नाही अशी मेक या आदेशात मारली त्यातून कर्जमाफीची तरतूद पुढील मार्चमध्ये केले जाणार असल्याने अजून दोन महिने कर्जमाफीची प्रतीक्षा शेतकऱ्यांना करावी लागणार असून ही कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप बुट्टे पाटील यांनी केला

सरसकट कर्जमाफी दिली जाणार अशी घोषणा केली गेली मात्र प्रत्यक्षात या सरकारने दोन लाखाची मर्यादा लावल्याने अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार नाही त्यामुळे पुढील काळात ही कर्जमाफी किती फसवी आहे हे समोर येणार आहे दरम्यान आर्थिक बजेटमध्ये तरतूद होईपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले नाही तर शेतकऱ्यांना कर्ज उचलता येणार नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे असेही यावेळी बुट्टेपाटील म्हणाले

अतुल देशमुख यांची खेड तालुकाध्यक्षपदी निवड...
भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज राजगुरूनगर येथे कार्यकर्ता मेळाव्यात पार पडली कार्यकर्त्यांच्या एक मतातून अतुल देशमुख यांची निवड करण्यात आली अतुल देशमुख यांनी विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी लढवली होती यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील आळंदी राजगुरुनगर नगरपरिषद नगराध्यक्ष नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते


Body:...


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.