ETV Bharat / state

पुणे दुर्घटना : काळ आलाच होता..! त्यांना बिहारला जायचे होते, पण...

मृत मजुरांमधील अवधूत सिंग यांचे मामा नारायण सिंग पुण्यातल्या चाकण येथे कामाला आहेत. घटनेची माहिती मिळताच ते ससून रुग्णालयातील शवागारात आले होते.

author img

By

Published : Jun 29, 2019, 3:01 PM IST

Updated : Jun 29, 2019, 3:27 PM IST

कोंढवा भिंत दुर्घटना

पुणे - कोंढवा भिंत दुर्घटनेतील मजूर काम नसल्याने बिहारला परत जाणार होते. मात्र, बिल्डर पैसे देत नसल्याने ते थांबले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेतील मृत अवधूत सिंग यांचा मामा नारायण सिंग यांनी ही माहिती ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

मृताच्या नातेवाईकाशी संवाद साधताना ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी

कोंढव्यात कांचन कम्फर्ट इमारतीच्या विकासकाने मजुरांसाठी पत्र्याच्या खोल्या बांधल्या आहेत. शुक्रवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास या खोल्यांवर शेजारच्या इमारतीची संरक्षक भिंत कोसळली. भिंत मोठी असून कामगारांच्या खोल्या खड्ड्यात असल्याने मोठ्या प्रमाणात भिंतीचा मलबा पडला. यावेळी मजूर झोपेत असल्याने भिंतीच्या मलब्याखाली दबले. यामध्ये १५ कामगारांचा मृत्यू झाला. तर ३ कामगारांना जीवंत बाहेर काढण्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या जवानांना यश आले आहे.

मृत मजुरांमधील अवधूत सिंग यांचे मामा नारायण सिंग पुण्यातल्या चाकण येथे कामाला आहेत. घटनेची माहिती मिळताच ते ससून रुग्णालयातील शवागारात आले होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. गेल्या दीड महिन्यांपूर्वी अवधूत सिंग कामासाठी एकटाच पुण्यामध्ये आलेला होता. सध्या काम नसल्याने त्याला बिहारला परत जायचे होते. मात्र, बिल्डरने मजुरीचे पैसे दिले नव्हते. त्यासाठी ते थांबले असल्याचे त्याचे मामा नारायण म्हणाले. तसेच त्याचे वयोवृद्ध आईवडील, पत्नी आणि मुले गावाकडे आहेत. तसेच त्याच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे आता त्याच्या कुटुंबाला या सरकारकडून मदत देण्यात यावी, असे नारायण म्हणाले.

पुणे - कोंढवा भिंत दुर्घटनेतील मजूर काम नसल्याने बिहारला परत जाणार होते. मात्र, बिल्डर पैसे देत नसल्याने ते थांबले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेतील मृत अवधूत सिंग यांचा मामा नारायण सिंग यांनी ही माहिती ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

मृताच्या नातेवाईकाशी संवाद साधताना ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी

कोंढव्यात कांचन कम्फर्ट इमारतीच्या विकासकाने मजुरांसाठी पत्र्याच्या खोल्या बांधल्या आहेत. शुक्रवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास या खोल्यांवर शेजारच्या इमारतीची संरक्षक भिंत कोसळली. भिंत मोठी असून कामगारांच्या खोल्या खड्ड्यात असल्याने मोठ्या प्रमाणात भिंतीचा मलबा पडला. यावेळी मजूर झोपेत असल्याने भिंतीच्या मलब्याखाली दबले. यामध्ये १५ कामगारांचा मृत्यू झाला. तर ३ कामगारांना जीवंत बाहेर काढण्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या जवानांना यश आले आहे.

मृत मजुरांमधील अवधूत सिंग यांचे मामा नारायण सिंग पुण्यातल्या चाकण येथे कामाला आहेत. घटनेची माहिती मिळताच ते ससून रुग्णालयातील शवागारात आले होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. गेल्या दीड महिन्यांपूर्वी अवधूत सिंग कामासाठी एकटाच पुण्यामध्ये आलेला होता. सध्या काम नसल्याने त्याला बिहारला परत जायचे होते. मात्र, बिल्डरने मजुरीचे पैसे दिले नव्हते. त्यासाठी ते थांबले असल्याचे त्याचे मामा नारायण म्हणाले. तसेच त्याचे वयोवृद्ध आईवडील, पत्नी आणि मुले गावाकडे आहेत. तसेच त्याच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे आता त्याच्या कुटुंबाला या सरकारकडून मदत देण्यात यावी, असे नारायण म्हणाले.

Intro:mh pun kondhva case relative tictak 2019 tictak 7201348Body:mh pun kondhva case relative tictak 2019 tictak 7201348

anchor
पुण्यातल्या कोंढवा परिसरात इमारतीची सीमा भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत बिहार राज्यातून आलेले मजूर आणि त्यांची कुटुंब असे पंधरा जण ठार झाले या ठिकाणी थांबलेले हे मजूर सध्या काम नसल्याने घरीच होते त्यांना पुन्हा त्यांच्या गावी बिहार मध्ये जायचं होतं मात्र बिल्डर कडून त्यांचे पैसे येणे होते बिल्डर त्यांना त्यांच्या मजुरीचे पैसे देत नव्हता अशी धक्कादायक बाब आता समोर आली आहे आपले अडकलेले पैसे घेऊन गावी जायचं असा या मजुरांचा विचार असल्याचं या दुर्घटनेत ठार झालेल्या एका मजुराच्या नातेवाईकाने ही माहिती दिली आहे या दुर्घटनेत ठार झालेले अवधूत सिंग यांचा मामा नारायण सिंग पुण्यातल्या चाकण येथे कामाला आहे या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ससून इथल्या शवागारात नारायण आले होते त्यावेळी त्यांनी ही धक्कादायक माहिती दिली आहे अवधूत सिंग हे एकटेच पुण्यात आले होते गेल्या दीड महिन्यांपासून हे सर्व कामगार दुर्घटना घडली त्या ठिकाणी राहायला होते अवधूत सिंग यांचे वयोवृद्ध आई-वडील गावाकडे आहेत तसेच त्यांची पत्नी आणि मुलं गावाकडे आहेत अत्यंत गरिबीत असलेल्या या कुटुंबाला आता सरकारकडून योग्य मदत मिळावी एवढीच अपेक्षा असल्याचे नारायण यावेळी म्हणाले त्यांच्याशी बातचीत केली आमचे पुण्याचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनीConclusion:
Last Updated : Jun 29, 2019, 3:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.