ETV Bharat / state

डाळींबावर बुरशीचा प्रादुर्भाव; शेतकऱ्यांवर बहर सोडून देण्याची वेळ

author img

By

Published : Nov 17, 2019, 11:38 AM IST

दौंड तालुक्यातील अनेक शेतकरी डाळींबाची लागवड करतात. बहर चांगला यावा यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर खर्च करतात. यंदा पाऊस जास्त  झाल्याने शेतातील झाडांवर  अधिक काळ पाणी राहिले. त्यामुळे डाळींब बागांवर बुरशीचा प्रादुर्भाव झाला आहे. बुरशी नाशकांचा वापर केला तरी सतत पाऊस पडत असल्याने ते धुवून गेले.

डाळींबावर बुरशीचा प्रादुर्भाव

पुणे - दौंड तालुक्यात परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे डाळींबाच्या बागांवर बुरशीचा प्रादुर्भाव झाल्याने फळांवर डाग दिसत आहेत. अशा फळांना बाजारात कवडीमोल भाव मिळणार असल्याने शेतकरी बहर सोडण्याचा विचार करत आहेत. निसर्गाच्य लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

डाळींबावर बुरशीचा प्रादुर्भाव

दौंड तालुक्यातील अनेक शेतकरी डाळींबाची लागवड करतात. बहर चांगला यावा यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर खर्च करतात. यंदा पाऊस जास्त झाल्याने शेतातील झाडांवर अधिक काळ पाणी राहिले. त्यामुळे डाळींब बागांवर बुरशीचा प्रादुर्भाव वाढला आहे. बुरशी नाशकांचा वापर केला तरी सतत पाऊस पडत असल्याने ते धुवून गेले.

हेही वाचा - परतीच्या पावसाचा फटका; भाज्यांना महागाईची फोडणी, गृहिणींचे बजेट कोलमडले

डाळींबाच्या फळांवर पांढऱ्या बुरशीचे डाग पडले आहेत. बाजारात अशा फळाला भाव मिळत नाही. बुरशीमुळे डाळींबाचा बहर सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. हातातोंडाशी आलेले पिक सोडावे लागत असल्याने बळीराजा हतबल झाला आहे.

पुणे - दौंड तालुक्यात परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे डाळींबाच्या बागांवर बुरशीचा प्रादुर्भाव झाल्याने फळांवर डाग दिसत आहेत. अशा फळांना बाजारात कवडीमोल भाव मिळणार असल्याने शेतकरी बहर सोडण्याचा विचार करत आहेत. निसर्गाच्य लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

डाळींबावर बुरशीचा प्रादुर्भाव

दौंड तालुक्यातील अनेक शेतकरी डाळींबाची लागवड करतात. बहर चांगला यावा यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर खर्च करतात. यंदा पाऊस जास्त झाल्याने शेतातील झाडांवर अधिक काळ पाणी राहिले. त्यामुळे डाळींब बागांवर बुरशीचा प्रादुर्भाव वाढला आहे. बुरशी नाशकांचा वापर केला तरी सतत पाऊस पडत असल्याने ते धुवून गेले.

हेही वाचा - परतीच्या पावसाचा फटका; भाज्यांना महागाईची फोडणी, गृहिणींचे बजेट कोलमडले

डाळींबाच्या फळांवर पांढऱ्या बुरशीचे डाग पडले आहेत. बाजारात अशा फळाला भाव मिळत नाही. बुरशीमुळे डाळींबाचा बहर सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. हातातोंडाशी आलेले पिक सोडावे लागत असल्याने बळीराजा हतबल झाला आहे.

Intro:Body:डाळींबावर बुरशीचा प्रादुर्भाव , बहर सोडून देण्याची वेळ

दौंड

दौंड तालुक्यात गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस झाला . या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे आणि फळबागांचे नुकसान झाले . दौंड तालुक्यात डाळींबाच्या बागांमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून येत आहे . डाळींबावर बुरशी झाली असून त्याचे मोठे डाग फळांवर दिसत आहेत . अशी फळे वाया जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपये तोटा होणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत .


दौंड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी चांगला आर्थिक फायदा मिळवून देणारे फळ म्हणून डाळींब लागवड केली आहे . डाळींबाचा बहर आला चांगले पैसे मिळतील या आशेने शेतकरी डाळींबाच्या बागेसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करतात . परंतु यावर्षी पावसाळा संपल्यानंतर मोठ्या प्रमाणावर पावसाचे आगमन झाले . सतत्याने पडणाऱ्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते . शेतजमिनी फळबाग यांत पाणी साचले होते .
जास्त काळ पाणी साचून राहिल्याने डाळींब बागांवर बुरशीचा प्रादुर्भाव झाला आहे . पाऊस पडत असल्याने बुरशी नाशकांचा वापर केला तरी काही फायदा नाही .अशी माहिती डाळींब उत्पादक शेतकऱ्यांनी दिली आहे .आता बुरशी जास्त प्रमाणात वाढली डाळींबावर बुरशीचे डाग दिसत आहेत .

बुरशीमुळे डाळींबाचा बहर सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे .मोठ्या मेहनतीने जपलेली शेतातील पिके आणि फळबागा डोळ्यासमोर वाया जाताना शेतकऱ्यांना पहावी लागत आहेत .पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे .


दौंड येथील डाळींब उत्पादक शेतकरी सचिन शितोळे यांच्या डाळींब बागेत सगळ्या झाडांच्या फळांवर बुरशी मूळे डाग पडलेले आहेत . त्यांनी बोलताना सांगितले की , जास्त पाण्यामुळे बागेतील डाळींबाच्या फळांवर पांढऱ्या बुरशीचे डाग पडलेले आहेत . सलग पाऊस पडत असल्याने बुरशीनाशकांची फवारणी करताना स्टिकर वापरले तरी , पडणाऱ्या पावसाने ते धुवून जात नव्हते .यामुळे वेळोवेळी बुरशीनाशकांची फवारणी करून देखील बुरशीवर नियंत्रण करता आले नाही . बागेतील सगळ्या फळांवर बुरशीचे डाग पडले आहेत .
फळ जसजसे मोठे होते तसे त्या फळांवर पडलेले डाग देखील मोठे होत जातात . बाजारात अशा फळाला बाजारभाव मिळत नाही .

डाळींबाचा बहर घेण्यासाठी सुमारे 1 लाख रुपये खर्च केला होता . परंतु आता डाळींबाचा बहर सोडून देण्याची वेळ आली आहे . अवकाळी झालेल्या पावसामुळे खर्च केलेल्या 1 लाख रुपयांच नुकसान झालं आहे अशी माहिती सचिन शितोळे यांनी दिली .Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.