ETV Bharat / state

Eknath Shinde praised Sharad Pawar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले शरद पवारांचे कौतुक

author img

By

Published : Jan 21, 2023, 5:30 PM IST

पुण्यातील मांजरी बुद्रुक येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांचे कौतुक केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. या राज्याच्या हितासाठी तसेच राज्यातील सर्वसामान्य जनतेला मदत होण्यासाठी ते नेहेमी मार्गदर्शन करत असतात. मला देखील जेव्हा जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा तेव्हा फोन करतात. याबद्दल मी त्यांचे मनापासून स्वागत करतो असे मत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

Eknat Shinde On Sharad Pawar
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले शरद पवारांचे कौतुक

पुणे - महाविकास आघाडी सरकारमधून बंड करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप बरोबर राज्यात सत्ता स्थापन केली. यानंतर त्यांच्यावर विरोधकांकडून सातत्याने टिका देखील करण्यात आली. पण असे, असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांच्याबद्दल कौतुक केले आहे. पवार मला देखील सूचना, मार्गदर्शन करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या मांजरी बुद्रुक येथील कार्यालयात पार पडली. माजी केंद्रीय कृषीमंत्री तसेच संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती.

31 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी - भाषणाची सुरवात करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ज्यांच्या तोंडी नेहमी साखर असते ते शरद पवार साहेब, तसेच जयंत पाटील यांच्याही तोंडात साखर असते असे म्हणताच कार्यक्रमाच्या ठिकाणी एकच हशा पिकला. त्यापुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अजितदादा अधिवेशन काळात जयंत पाटलांची आठवण काढली ना असे म्हणताच पुन्हा एकदा हशा पिकला. तसेच पुढे म्हणाले की, करोना काळात साखर कारखान्यांनी सामाजिक बांधिलकी जपत मदत केल्याच आपण सर्वांनी पाहिले आहे. ऊस उत्पादक शेतकरी वर्गासमोर अनेक आव्हान आहेत. त्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. हे लक्षात घेऊन आमच सरकार आल्यावर 31 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी केली आहे.

कृषी क्षेत्रात शरद पवारांचे योगदान मोठे - सिंचन विभागाचे 18 प्रकल्प मार्गी लावले असून जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू केली आहे. या योजनेचा फायदा अधिकाधिक शेतकरी वर्गाला होणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडे आजवर अनेक वेळा भेट झाली. त्यावेळी राज्यातील शेतकर्‍याचे प्रश्न मांडले आहे. आपल्या राज्यातील शेतकरी वर्गा सोबत केंद्र सरकार कायम सोबत आहे. तसेच कृषी क्षेत्रात शरद पवार यांचे फार मोठे योगदान आहे. त्यांना कृषी क्षेत्राबद्दल आत्मीयता असून गाढा अभ्यास देखील आहे. शरद पवारांनी नेहमी मार्गदर्शन करावे. ज्याचा सहकार, कृषी, सरकारला फायदा होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.

हार्वेस्टरसाठी शेतकऱ्यांना मदत - तसेच शेतकरी अन्नदाता असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यास शासनाचे प्राधान्य राहील. राज्यातील हार्वेस्टरची कमतरता दूर करण्याकरिता ९०० हार्वेस्टरसाठी शासन शेतकऱ्यांना सहकार्य करेल. साखर कारखान्यांना शासनाने नेहमीच सहकार्य केले आहे. भविष्यातदेखील येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे काम शासन करेल. साखर उद्योगावर लाखो शेतकरी अवलंबून असल्याने हा उद्योग वाढणे, टिकणे गरजेचे आहे. शासनाने साखर उद्योगासोबत इतरही शेतकऱ्यांचे मुलभूत प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविताना शेतकऱ्यांसाठी १८ सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यात येत आहेत, त्यामुळे अडीच लाख हेक्टरपेक्षा अधिक जमीन ओलिताखाली येईल अशी माहिती त्यांनी दिली.

शेतकऱ्यांना १ हजार ७०० कोटींचेही वाटप - नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनात्मक अनुदान म्हणून ७ लाख १९ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अडीच हजार कोटी रुपये जमा करण्यात आले. ७ लाख २० हजार शेतकऱ्यांना १ हजार ७०० कोटींचेही वाटप करण्यात येत आहे. अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांनाही वाढीव मदत करण्यात येत आहे. जलयुक्त शिवार योजना प्रभाविपणे सुरू करण्यात आली आहे. कृषि क्षेत्रातील संशोधनाला चालना देणे, गरजेचे कृषि उत्पादनावर प्रक्रीया करणाऱ्या उद्योगात वस्त्रोद्योगानंतर साखर उद्योगाचा क्रमांक लागतो. ग्रामीण भागाच्या विकासात या उद्योगाचे मोठे योगदान आहे. नवीन अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने कमी खर्चात अधिकचे उत्पादन करण्यासाठी व्हीएसआयचे सहकार्य मिळते आहे.

कृषि संशोधनाला चालना- संशोधन, विकास, प्रशिक्षण, विस्तार हे संस्थेचे उद्दीष्ट आहे. ऊस उत्पादनापासून साखर निर्मितीच्या तंत्रापर्यंत विविध टप्यांवर आधुनिकीकरण कसे करता येईल याबाबतचे संशोधन व्हीएसआय करत असल्याने सहकारी क्षेत्राला फायदा होत आहे. जागतिक स्पर्धेत पुढे जाण्यासाठी नवीन अद्ययावत तंत्रज्ञान वापरावे लागेल. कृषि संशोधनाला चालना मिळाली तर, राज्याच्या प्रगतीला चालना मिळेल. साखर उद्योग क्षेत्रातील संशोधनात व्हीएसआयचे मोठे योगदान आहे.

मराठवाडा, खानदेशच्या शेतकऱ्यांना फायदा - ऊसशेती, साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असलेली तसेच शेतकऱ्यांनी स्थापन केलेली वसंतदाद शुगर इन्स्टिट्यूट ही अशा स्वरुपाची जगातली एकमात्र संस्था आहे. व्हीएसआयने जालना येथे विविध ऊसाची बियाणाची निर्मिती केली आहे. त्याचा मराठवाडा, खानदेशच्या शेतकऱ्यांना फायदा होत आहे. विदर्भातदेखील संस्थेचे केंद्र सुरू करण्यात येत आहे. कृषि विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरणाचा शास्त्रीय विचार, अल्कोहल निर्मितीचे आधुनिक तंत्र अशा, अनेक अंगांनी संस्था संशोधन करते आहे. ऊस लागवड, जमिनीची सुपीकता ऊसाच्या बेण्यातील बदल, जैविक तंत्रज्ञान अशा महत्वाच्या विषयावर संस्था शेतकऱ्यांना माहिती देते असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

साखर उत्पादनात महाराष्ट्र तिसरा - आंबोली येथे विकसीत केलेल्या व्हीएसआय ८००५ आणि १२१२१ या जातीच्या ऊसाचे क्षेत्र वाढते आहे. अवर्षण परिस्थितीत ही जात शेतकऱ्यांना हे उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इथेनॉल निर्मितीला शासनाचे प्रोत्साहन चालू गळीत हंगामात ५०८ लाख मे.टन ऊसाचे गाळप होऊन ४७ लाख मे.टन साखरेचे गाळप झाले आहे. जगात महाराष्ट्राचा साखर उत्पादनात तिसरा क्रमांक आहे, ही अभिमानाची बाब आहे. राज्यात गतवर्षी १३७.२० लाख मे.टन साखरेचे उत्पादन झाले. १२.६ लाख मे.टन साखरेचा वापर इथेनॉलच्या निर्मितीसाठी झाला आहे. इथेनॉलला प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण आहे. यामुळे साखर कारखान्यांना नवसंजीवनी मिळते आहे. १०६ कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती सुरू केली आहे. चालू हंगामातही मोठ्या प्रमाणत इथेनॉल निर्मिती होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

फळबागांचेही क्षेत्र वाढवावे - ऊसासोबत फळबागांचेही क्षेत्र वाढवावे ऊसाचे वाढते उत्पादन, गाळपाशिवाय रहाणारा ऊस अशी आव्हाने साखर कारखान्यांसमोर आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रात ऊस हा उत्तम पर्याय असला तरी, उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न व्हायला हवेत. राज्यात साखरेचे अतिरिक्त उत्पादन असल्याने साखर निर्यात, साखरेचे कमी उत्पादन होणाऱ्या अन्य राज्यात साखर विक्रीचे व्यवस्थापन करण्यावर कारखान्यांनी भर द्यावा. ऊस उत्पादनासोबत खरीपातील कापूस-सोयाबीनचाही पेरा शेतकऱ्यांनी वाढवावा. फळबाग क्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. ऊस पीकासाठी ठिबक सिंचनाचा वापर वाढवा यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना आवश्यक असणारा ऊस कमी क्षेत्रात, कमी पाण्यात उपलब्ध करणे शक्य होईल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. केवळ नफा-तोटा यावर लक्ष केंद्रीत न करता साखर काराखान्यांनी आपत्तीच्यावेळी सामाजिक बांधिलकी जपली आहे. साखर कारखान्यांनी असे उपक्रम वाढविण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. हायड्रोजन इंधन निर्मितीकडे साखर उद्योगाने लक्ष द्यावे.

हायड्रोजन धोरण - योवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, भारत सरकारने राष्ट्रीय हायड्रोजन धोरण जाहीर केले आहे. हायड्रोजन हे पेट्रोल, डिझेलपेक्षा प्रभावी इंधन असल्याचे सिद्ध झाले आहे. भविष्यातील पर्यायी म्हणुण हायड्रोजन इंधन ठरणार आहे. हायड्रोजन स्वच्छ इंधन आहे. हायड्रोजनवर आधारित वाहने डिझेल इंजिनापेक्षा तिप्पट परिणाम देतात. साखर उद्योगाकडे भरपूर संसाधने असून त्यांचा वापर हायड्रोजनच्या उत्पादनासाठी केला जाऊ शकतो. साखर कारखान्यात आसवनींतील बायोगॅस, वीज निर्मिती प्रकल्पा पासून हायड्रोजन तयार केला जाऊ शकतो असे विचार शरद पावार यांनी व्यक्त केल.

उप-उत्पादनांचे उत्पादन घेण्याची गरज - भविष्यात साखर कारखान्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी सध्याच्या जागतिक स्पर्धेत टिकुन राहावयाचे असेल तर, साखरेव्यतिरिक्त इतर उप-पदार्थावर आधारित उत्पादने तयार करण्याची नितांत गरज आहे. साखर कारखान्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी भविष्यात साखर, इथेनॉल, सी.बी. जी., हायड्रोजन आदी उप-उत्पादनांचे उत्पादन घेतले पाहिजे. भारत सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आखला आहे. सरकारने फ्लेक्स इंधन वाहनांच्या उत्पादनासाठी प्रोत्साहन दिलेले आहे. त्यामुळे इथेनॉलच्या मागणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असून त्याची पूर्तता करणे ही आजची गरज आहे. इथेनॉल व्यतिरिक्त, सी.बी. जी. कॉप्रेस्ड बायोगॅस, हायड्रोजन सारखे अक्षय ऊर्जा स्त्रोत देशाच्या ऊर्जेच्या गरजेमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावतील अशी अपेक्षा शरद पावारांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांचे उसाचे उत्पादन वाढवायचे असेल तर, शुद्ध बेण्याचा वापर झाला पाहिजे. याकडे साखर कारखान्यांनी लक्ष देणे आवश्यक तसेच गरजेचे असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण - मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विभागवार ऊस भूषण पुरस्कार, उत्कृष्ट शेती अधिकारी, उत्कृष्ट पर्यावरण अधिकारी, उत्कृष्ट चीफ इंजिनिअर, उत्कृष्ट चिफ केमिस्ट, उत्कृष्ट फायनान्स मॅनेजर, उत्कृष्ट आसवनी व्यवस्थापक, उत्कृष्ट कार्यकारी संचालक, संस्थेत काम करणरे उत्कृष्ट कर्मचारी, विभागवार तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार, उत्कृष्ट ऊस विकास, संवर्धन पुरस्कार, उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कै.वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखानाह पुरस्कार डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना वांगी ता.कडेगाव जि.सांगली या कारखान्याला प्रदान करण्यात आला. कै.रावसाहेबदादा पवार सर्वोत्कृष्ट आसवनी पुरस्कार जयवंत शुगर्स लि. धावरवाडी ता. कराड जि. सातारा, कै.किसन महादेव ऊर्फ आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार क्रांती अग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखाना कडूस ता. पलूस जि. सांगली, कै. कर्मयोगी शंकररावजी पाटील सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना, कै. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा.रे.पाटील सर्वोत्कृष्ट ऊस विकास, संवर्धन पुरस्कार दौंड शुगर प्रा.लि.पो.आलेगाव ता. दौंड, जि. पुणे, कै.विलासरावजी देशमुख उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना ता. कागल जि. कोल्हापूर या कारखान्याला प्रदान करण्यात आला.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या कार्यक्षमता पुरस्कारांचेही यावेळी वितरण करण्यात आले. संघाकडून देण्यात येणारा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लि. कागल या कारखान्यास प्रदान करण्यात आला.

विविध मान्यवर उपस्थित - या सभेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख म्हणून उपस्थित होते. तसेच यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, संस्थेचे उपाध्यक्ष माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, तसेच संस्थेचे विश्वस्त सदस्य संबंधित खात्याचे वरिष्ठ अधिकारी, साखर उद्योगातील विविध मान्यवर व्यक्ती उपस्थित होते. या सभेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे साखर उद्योगातील सर्वोत्कृष्ट कार्यक्षमतेसाठी दिल्या जाणाऱ्या सन २०२१-२२ मधील विविध पुस्कारांचे वितरण करण्यात आले आहे.

हेही वाचा - Ajit Pawar On Swarajyarakshak : अजित दादा काय मागे हटत नाहीत! म्हणाले, माफी मागायला आपण मोकळे नाही, छत्रपती संभाजी स्वराज्य रक्षकच

पुणे - महाविकास आघाडी सरकारमधून बंड करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप बरोबर राज्यात सत्ता स्थापन केली. यानंतर त्यांच्यावर विरोधकांकडून सातत्याने टिका देखील करण्यात आली. पण असे, असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांच्याबद्दल कौतुक केले आहे. पवार मला देखील सूचना, मार्गदर्शन करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या मांजरी बुद्रुक येथील कार्यालयात पार पडली. माजी केंद्रीय कृषीमंत्री तसेच संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती.

31 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी - भाषणाची सुरवात करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ज्यांच्या तोंडी नेहमी साखर असते ते शरद पवार साहेब, तसेच जयंत पाटील यांच्याही तोंडात साखर असते असे म्हणताच कार्यक्रमाच्या ठिकाणी एकच हशा पिकला. त्यापुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अजितदादा अधिवेशन काळात जयंत पाटलांची आठवण काढली ना असे म्हणताच पुन्हा एकदा हशा पिकला. तसेच पुढे म्हणाले की, करोना काळात साखर कारखान्यांनी सामाजिक बांधिलकी जपत मदत केल्याच आपण सर्वांनी पाहिले आहे. ऊस उत्पादक शेतकरी वर्गासमोर अनेक आव्हान आहेत. त्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. हे लक्षात घेऊन आमच सरकार आल्यावर 31 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी केली आहे.

कृषी क्षेत्रात शरद पवारांचे योगदान मोठे - सिंचन विभागाचे 18 प्रकल्प मार्गी लावले असून जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू केली आहे. या योजनेचा फायदा अधिकाधिक शेतकरी वर्गाला होणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडे आजवर अनेक वेळा भेट झाली. त्यावेळी राज्यातील शेतकर्‍याचे प्रश्न मांडले आहे. आपल्या राज्यातील शेतकरी वर्गा सोबत केंद्र सरकार कायम सोबत आहे. तसेच कृषी क्षेत्रात शरद पवार यांचे फार मोठे योगदान आहे. त्यांना कृषी क्षेत्राबद्दल आत्मीयता असून गाढा अभ्यास देखील आहे. शरद पवारांनी नेहमी मार्गदर्शन करावे. ज्याचा सहकार, कृषी, सरकारला फायदा होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.

हार्वेस्टरसाठी शेतकऱ्यांना मदत - तसेच शेतकरी अन्नदाता असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यास शासनाचे प्राधान्य राहील. राज्यातील हार्वेस्टरची कमतरता दूर करण्याकरिता ९०० हार्वेस्टरसाठी शासन शेतकऱ्यांना सहकार्य करेल. साखर कारखान्यांना शासनाने नेहमीच सहकार्य केले आहे. भविष्यातदेखील येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे काम शासन करेल. साखर उद्योगावर लाखो शेतकरी अवलंबून असल्याने हा उद्योग वाढणे, टिकणे गरजेचे आहे. शासनाने साखर उद्योगासोबत इतरही शेतकऱ्यांचे मुलभूत प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविताना शेतकऱ्यांसाठी १८ सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यात येत आहेत, त्यामुळे अडीच लाख हेक्टरपेक्षा अधिक जमीन ओलिताखाली येईल अशी माहिती त्यांनी दिली.

शेतकऱ्यांना १ हजार ७०० कोटींचेही वाटप - नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनात्मक अनुदान म्हणून ७ लाख १९ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अडीच हजार कोटी रुपये जमा करण्यात आले. ७ लाख २० हजार शेतकऱ्यांना १ हजार ७०० कोटींचेही वाटप करण्यात येत आहे. अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांनाही वाढीव मदत करण्यात येत आहे. जलयुक्त शिवार योजना प्रभाविपणे सुरू करण्यात आली आहे. कृषि क्षेत्रातील संशोधनाला चालना देणे, गरजेचे कृषि उत्पादनावर प्रक्रीया करणाऱ्या उद्योगात वस्त्रोद्योगानंतर साखर उद्योगाचा क्रमांक लागतो. ग्रामीण भागाच्या विकासात या उद्योगाचे मोठे योगदान आहे. नवीन अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने कमी खर्चात अधिकचे उत्पादन करण्यासाठी व्हीएसआयचे सहकार्य मिळते आहे.

कृषि संशोधनाला चालना- संशोधन, विकास, प्रशिक्षण, विस्तार हे संस्थेचे उद्दीष्ट आहे. ऊस उत्पादनापासून साखर निर्मितीच्या तंत्रापर्यंत विविध टप्यांवर आधुनिकीकरण कसे करता येईल याबाबतचे संशोधन व्हीएसआय करत असल्याने सहकारी क्षेत्राला फायदा होत आहे. जागतिक स्पर्धेत पुढे जाण्यासाठी नवीन अद्ययावत तंत्रज्ञान वापरावे लागेल. कृषि संशोधनाला चालना मिळाली तर, राज्याच्या प्रगतीला चालना मिळेल. साखर उद्योग क्षेत्रातील संशोधनात व्हीएसआयचे मोठे योगदान आहे.

मराठवाडा, खानदेशच्या शेतकऱ्यांना फायदा - ऊसशेती, साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असलेली तसेच शेतकऱ्यांनी स्थापन केलेली वसंतदाद शुगर इन्स्टिट्यूट ही अशा स्वरुपाची जगातली एकमात्र संस्था आहे. व्हीएसआयने जालना येथे विविध ऊसाची बियाणाची निर्मिती केली आहे. त्याचा मराठवाडा, खानदेशच्या शेतकऱ्यांना फायदा होत आहे. विदर्भातदेखील संस्थेचे केंद्र सुरू करण्यात येत आहे. कृषि विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरणाचा शास्त्रीय विचार, अल्कोहल निर्मितीचे आधुनिक तंत्र अशा, अनेक अंगांनी संस्था संशोधन करते आहे. ऊस लागवड, जमिनीची सुपीकता ऊसाच्या बेण्यातील बदल, जैविक तंत्रज्ञान अशा महत्वाच्या विषयावर संस्था शेतकऱ्यांना माहिती देते असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

साखर उत्पादनात महाराष्ट्र तिसरा - आंबोली येथे विकसीत केलेल्या व्हीएसआय ८००५ आणि १२१२१ या जातीच्या ऊसाचे क्षेत्र वाढते आहे. अवर्षण परिस्थितीत ही जात शेतकऱ्यांना हे उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इथेनॉल निर्मितीला शासनाचे प्रोत्साहन चालू गळीत हंगामात ५०८ लाख मे.टन ऊसाचे गाळप होऊन ४७ लाख मे.टन साखरेचे गाळप झाले आहे. जगात महाराष्ट्राचा साखर उत्पादनात तिसरा क्रमांक आहे, ही अभिमानाची बाब आहे. राज्यात गतवर्षी १३७.२० लाख मे.टन साखरेचे उत्पादन झाले. १२.६ लाख मे.टन साखरेचा वापर इथेनॉलच्या निर्मितीसाठी झाला आहे. इथेनॉलला प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण आहे. यामुळे साखर कारखान्यांना नवसंजीवनी मिळते आहे. १०६ कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती सुरू केली आहे. चालू हंगामातही मोठ्या प्रमाणत इथेनॉल निर्मिती होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

फळबागांचेही क्षेत्र वाढवावे - ऊसासोबत फळबागांचेही क्षेत्र वाढवावे ऊसाचे वाढते उत्पादन, गाळपाशिवाय रहाणारा ऊस अशी आव्हाने साखर कारखान्यांसमोर आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रात ऊस हा उत्तम पर्याय असला तरी, उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न व्हायला हवेत. राज्यात साखरेचे अतिरिक्त उत्पादन असल्याने साखर निर्यात, साखरेचे कमी उत्पादन होणाऱ्या अन्य राज्यात साखर विक्रीचे व्यवस्थापन करण्यावर कारखान्यांनी भर द्यावा. ऊस उत्पादनासोबत खरीपातील कापूस-सोयाबीनचाही पेरा शेतकऱ्यांनी वाढवावा. फळबाग क्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. ऊस पीकासाठी ठिबक सिंचनाचा वापर वाढवा यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना आवश्यक असणारा ऊस कमी क्षेत्रात, कमी पाण्यात उपलब्ध करणे शक्य होईल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. केवळ नफा-तोटा यावर लक्ष केंद्रीत न करता साखर काराखान्यांनी आपत्तीच्यावेळी सामाजिक बांधिलकी जपली आहे. साखर कारखान्यांनी असे उपक्रम वाढविण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. हायड्रोजन इंधन निर्मितीकडे साखर उद्योगाने लक्ष द्यावे.

हायड्रोजन धोरण - योवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, भारत सरकारने राष्ट्रीय हायड्रोजन धोरण जाहीर केले आहे. हायड्रोजन हे पेट्रोल, डिझेलपेक्षा प्रभावी इंधन असल्याचे सिद्ध झाले आहे. भविष्यातील पर्यायी म्हणुण हायड्रोजन इंधन ठरणार आहे. हायड्रोजन स्वच्छ इंधन आहे. हायड्रोजनवर आधारित वाहने डिझेल इंजिनापेक्षा तिप्पट परिणाम देतात. साखर उद्योगाकडे भरपूर संसाधने असून त्यांचा वापर हायड्रोजनच्या उत्पादनासाठी केला जाऊ शकतो. साखर कारखान्यात आसवनींतील बायोगॅस, वीज निर्मिती प्रकल्पा पासून हायड्रोजन तयार केला जाऊ शकतो असे विचार शरद पावार यांनी व्यक्त केल.

उप-उत्पादनांचे उत्पादन घेण्याची गरज - भविष्यात साखर कारखान्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी सध्याच्या जागतिक स्पर्धेत टिकुन राहावयाचे असेल तर, साखरेव्यतिरिक्त इतर उप-पदार्थावर आधारित उत्पादने तयार करण्याची नितांत गरज आहे. साखर कारखान्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी भविष्यात साखर, इथेनॉल, सी.बी. जी., हायड्रोजन आदी उप-उत्पादनांचे उत्पादन घेतले पाहिजे. भारत सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आखला आहे. सरकारने फ्लेक्स इंधन वाहनांच्या उत्पादनासाठी प्रोत्साहन दिलेले आहे. त्यामुळे इथेनॉलच्या मागणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असून त्याची पूर्तता करणे ही आजची गरज आहे. इथेनॉल व्यतिरिक्त, सी.बी. जी. कॉप्रेस्ड बायोगॅस, हायड्रोजन सारखे अक्षय ऊर्जा स्त्रोत देशाच्या ऊर्जेच्या गरजेमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावतील अशी अपेक्षा शरद पावारांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांचे उसाचे उत्पादन वाढवायचे असेल तर, शुद्ध बेण्याचा वापर झाला पाहिजे. याकडे साखर कारखान्यांनी लक्ष देणे आवश्यक तसेच गरजेचे असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण - मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विभागवार ऊस भूषण पुरस्कार, उत्कृष्ट शेती अधिकारी, उत्कृष्ट पर्यावरण अधिकारी, उत्कृष्ट चीफ इंजिनिअर, उत्कृष्ट चिफ केमिस्ट, उत्कृष्ट फायनान्स मॅनेजर, उत्कृष्ट आसवनी व्यवस्थापक, उत्कृष्ट कार्यकारी संचालक, संस्थेत काम करणरे उत्कृष्ट कर्मचारी, विभागवार तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार, उत्कृष्ट ऊस विकास, संवर्धन पुरस्कार, उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कै.वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखानाह पुरस्कार डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना वांगी ता.कडेगाव जि.सांगली या कारखान्याला प्रदान करण्यात आला. कै.रावसाहेबदादा पवार सर्वोत्कृष्ट आसवनी पुरस्कार जयवंत शुगर्स लि. धावरवाडी ता. कराड जि. सातारा, कै.किसन महादेव ऊर्फ आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार क्रांती अग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखाना कडूस ता. पलूस जि. सांगली, कै. कर्मयोगी शंकररावजी पाटील सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना, कै. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा.रे.पाटील सर्वोत्कृष्ट ऊस विकास, संवर्धन पुरस्कार दौंड शुगर प्रा.लि.पो.आलेगाव ता. दौंड, जि. पुणे, कै.विलासरावजी देशमुख उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना ता. कागल जि. कोल्हापूर या कारखान्याला प्रदान करण्यात आला.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या कार्यक्षमता पुरस्कारांचेही यावेळी वितरण करण्यात आले. संघाकडून देण्यात येणारा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लि. कागल या कारखान्यास प्रदान करण्यात आला.

विविध मान्यवर उपस्थित - या सभेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख म्हणून उपस्थित होते. तसेच यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, संस्थेचे उपाध्यक्ष माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, तसेच संस्थेचे विश्वस्त सदस्य संबंधित खात्याचे वरिष्ठ अधिकारी, साखर उद्योगातील विविध मान्यवर व्यक्ती उपस्थित होते. या सभेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे साखर उद्योगातील सर्वोत्कृष्ट कार्यक्षमतेसाठी दिल्या जाणाऱ्या सन २०२१-२२ मधील विविध पुस्कारांचे वितरण करण्यात आले आहे.

हेही वाचा - Ajit Pawar On Swarajyarakshak : अजित दादा काय मागे हटत नाहीत! म्हणाले, माफी मागायला आपण मोकळे नाही, छत्रपती संभाजी स्वराज्य रक्षकच

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.