ETV Bharat / state

अजित पवारांचा संजय राऊतांना इशारा; मिठाचा खडा टाकण्याचे काम करू नये - उपमुख्यमंत्री अजित पवारांची टीका

महाविकास आघाडी सरकार हे तीन पक्षांचे आहे. त्यामुळे कुणी मिठाचा खडा टाकण्याचे काम करू नये, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलेच फटकारले आहे. आज बारामतीत अजित पवार यांनी कोरोना परिस्थितीची आढावा बैठक घेतली. त्यानंतर विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार यांनी संजय राऊत यांना इशारा दिला.

author img

By

Published : Mar 28, 2021, 4:18 PM IST

बारामती (पुणे) - 'राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना अपघाताने गृहमंत्रिपद मिळाले', असे जाहीरपणे लिखाण करून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत खळबळ उडवून दिली. यावर महाविकास आघाडी सरकार हे तीन पक्षांचे आहे. त्यामुळे कुणी मिठाचा खडा टाकण्याचे काम करू नये, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलेच फटकारले आहे. आज बारामतीत अजित पवार यांनी कोरोना परिस्थितीची आढावा बैठक घेतली. त्यानंतर विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार यांनी संजय राऊत यांना इशारा दिला.

राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे शिवसेनेत कुणाला मंत्रिपद द्यायचे, याचा निर्णय उद्धव ठाकरे घेत असतात. काँग्रेसमध्ये सुद्धा कुणाला मंत्रिपद द्यायचे याचा अधिकार हा सोनिया गांधी यांना आहे आणि राष्ट्रवादीमध्ये 1999 पासून मधली 5 वर्षे वगळता सरकारमध्ये काम करतोय. पवार साहेबांना 50 वर्षांचा राजकीय अनुभव आहे, त्यामुळे कुणाला मंत्रिपद द्यायचे, कुणाला कोणता विभाग द्यायचा, हे राष्ट्रवादीमध्ये तेच ठरवत असतात. विरोधकांनी वक्तव्य केले तर समजू शकतो. पण महाविकास आघाडीमध्ये असताना मान्यवरांनी एकमेकांना अडचणीत आणणारी वक्तव्ये करू नयेत, असे म्हणत अजित पवार यांनी राऊत यांना बजावले.

महिलांचा योग्य मानसन्मान राखला गेला पाहिजे

वनाधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येसंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले की, 'महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी या संदर्भात योग्य त्या सूचना केलेल्या असून संबंधित अधिकाऱ्यास निलंबित करून त्यास अटक केलेली आहे. राज्यातील कोणत्याही कार्यालयात काम करत असताना महिला व पुरुष अधिकार्‍यांचा ज्या त्या ठिकाणी योग्य मानसन्मान राखला गेला पाहिजे. यासंदर्भात राज्य सरकारने निर्देश दिलेले आहेत.'

बारामती (पुणे) - 'राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना अपघाताने गृहमंत्रिपद मिळाले', असे जाहीरपणे लिखाण करून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत खळबळ उडवून दिली. यावर महाविकास आघाडी सरकार हे तीन पक्षांचे आहे. त्यामुळे कुणी मिठाचा खडा टाकण्याचे काम करू नये, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलेच फटकारले आहे. आज बारामतीत अजित पवार यांनी कोरोना परिस्थितीची आढावा बैठक घेतली. त्यानंतर विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार यांनी संजय राऊत यांना इशारा दिला.

राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे शिवसेनेत कुणाला मंत्रिपद द्यायचे, याचा निर्णय उद्धव ठाकरे घेत असतात. काँग्रेसमध्ये सुद्धा कुणाला मंत्रिपद द्यायचे याचा अधिकार हा सोनिया गांधी यांना आहे आणि राष्ट्रवादीमध्ये 1999 पासून मधली 5 वर्षे वगळता सरकारमध्ये काम करतोय. पवार साहेबांना 50 वर्षांचा राजकीय अनुभव आहे, त्यामुळे कुणाला मंत्रिपद द्यायचे, कुणाला कोणता विभाग द्यायचा, हे राष्ट्रवादीमध्ये तेच ठरवत असतात. विरोधकांनी वक्तव्य केले तर समजू शकतो. पण महाविकास आघाडीमध्ये असताना मान्यवरांनी एकमेकांना अडचणीत आणणारी वक्तव्ये करू नयेत, असे म्हणत अजित पवार यांनी राऊत यांना बजावले.

महिलांचा योग्य मानसन्मान राखला गेला पाहिजे

वनाधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येसंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले की, 'महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी या संदर्भात योग्य त्या सूचना केलेल्या असून संबंधित अधिकाऱ्यास निलंबित करून त्यास अटक केलेली आहे. राज्यातील कोणत्याही कार्यालयात काम करत असताना महिला व पुरुष अधिकार्‍यांचा ज्या त्या ठिकाणी योग्य मानसन्मान राखला गेला पाहिजे. यासंदर्भात राज्य सरकारने निर्देश दिलेले आहेत.'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.