ETV Bharat / state

उद्धव ठाकरे प्रत्येक गोष्टीत 'यू टर्न' मारतात - चंद्रकांत पाटील

author img

By

Published : Dec 25, 2019, 7:15 PM IST

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेना मेजर पार्ट आहे. ज्यावेळी युती म्हणून अजित पवारांवर आरोप झाले त्यात शिवसेनाही अजित पवारांवर आरोप करीत होती. मात्र, आता अजित पवार निर्दोष कसे? असा खडा सवाल पाटील यांनी शिवसेनेला विचारला आहे.

chandrakant-patil
चंद्रकांत पाटील

पुणे- आमचे सरकार अजित पवार यांच्या सोबत स्थापन झाले, त्यावेळी अजित पवार यांच्यावरील गुन्हे मागे घेतल्याचे बोलते जात होते. मात्र, ती एक रूटीन प्रोसेस होती. त्यात आमचा काहीच हस्तक्षेप नव्हता. मात्र, महाविकास आघाडीच्या सरकारने अजित पवार दोषी नाहीत, असा अहवाल दिला आहे. शिवसेनेनेही अजित पवारांवर आरोप केले होते. मग आता ते निर्दोष कसे? असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

चंद्रकांत पाटील

हेही वाचा-पुण्यातील बारमध्ये बाऊन्सरचा गोळीबार; दारुचे बिल देण्यावरून वाद

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेना मेजर पार्ट आहे. ज्यावेळी युती म्हणून अजित पवारांवर आरोप झाले त्यात शिवसेनाही अजित पवारांवर आरोप करीत होती. मात्र, आता अजित पवार निर्दोष कसे? असा खडा सवाल पाटील यांनी शिवसेनेला विचारला आहे. बुधवारी चंद्रकांत पाटील विविध कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, दोन लाखाची कर्जमाफी ही फसवणूक आहे. त्यांनी जो शब्द दिला होता तो पाळला नाही, उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. उद्धव ठाकरे यांनी 'यू टर्न' मारला. ते प्रत्येक गोष्टीत 'यू टर्न' मारतात.

पुणे- आमचे सरकार अजित पवार यांच्या सोबत स्थापन झाले, त्यावेळी अजित पवार यांच्यावरील गुन्हे मागे घेतल्याचे बोलते जात होते. मात्र, ती एक रूटीन प्रोसेस होती. त्यात आमचा काहीच हस्तक्षेप नव्हता. मात्र, महाविकास आघाडीच्या सरकारने अजित पवार दोषी नाहीत, असा अहवाल दिला आहे. शिवसेनेनेही अजित पवारांवर आरोप केले होते. मग आता ते निर्दोष कसे? असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

चंद्रकांत पाटील

हेही वाचा-पुण्यातील बारमध्ये बाऊन्सरचा गोळीबार; दारुचे बिल देण्यावरून वाद

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेना मेजर पार्ट आहे. ज्यावेळी युती म्हणून अजित पवारांवर आरोप झाले त्यात शिवसेनाही अजित पवारांवर आरोप करीत होती. मात्र, आता अजित पवार निर्दोष कसे? असा खडा सवाल पाटील यांनी शिवसेनेला विचारला आहे. बुधवारी चंद्रकांत पाटील विविध कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, दोन लाखाची कर्जमाफी ही फसवणूक आहे. त्यांनी जो शब्द दिला होता तो पाळला नाही, उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. उद्धव ठाकरे यांनी 'यू टर्न' मारला. ते प्रत्येक गोष्टीत 'यू टर्न' मारतात.

Intro:उद्धव ठाकरे हे प्रत्येक गोष्टीत यु टर्न मारतात, चंद्रकांत पाटीलBody:mh_pun_03_chadrkant_patil_on_gov_avb_7201348

Anchor
ज्यावेळी तीन दिवसांच सरकार होत तेव्हा अजितदादा वरील केसेस मागे घेण्यात आल्याच सांगितले जात पण तसे काही नाही त्यावेळी ती रुटीन प्रोसेस होती मात्र आताच्या या सरकारने अजित पवार दोषी नाहीत असा रिपोर्ट दिला आहे या सरकारने अस का केलं,या सरकारमध्ये शिवसेना मेजर पार्ट आहे ज्यावेळी युती म्हणून अजित पवारांवर आरोप झाले हे आरोप करण्यात शिवसेना ही होती त्यामूळे आता अजित पवार निर्दोष कसे असा प्रश्न भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केलाय....बुधवारी चंद्रकांत पाटील विविध कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते त्यावेळी त्यांनी सरकारवर टीका केली
दोन लाखाची कर्जमाफी ही फसवणूक आहे त्यांनी जो शब्द दिला होता तो पाळला नाही उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक केली उद्धव ठाकरे यांनी यु टर्न मारला ते प्रत्येक गोष्टीत यु टर्न मारतात असा टोला पाटील यांनी यावेळी लगावला

Byte चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्षConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.