ETV Bharat / state

'माझ्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी बैलगाडा शर्यती खुल्या करणार'

author img

By

Published : Oct 19, 2019, 11:49 AM IST

अतुल देशमुख भाजपमधून बाहेर पडून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यासाठी राजगुरुनगर येथे त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी बैलगाडा शर्यती सुरू करणार असल्याचे सांगितले.

अतुल देशमुख

पुणे - आम्ही सर्वजण शेतकरी कुटुंबातील मुले आहोत. आम्हाला काही नको. मात्र, या भागातील बैलगाडा शर्यत बंद आहे. बैलगाडा शर्यत बंदीविरोधात आंदोलने केली जातात. आमदार मात्र पोलिसांच्या भीतीने पळपुटेपणा करतात. मात्र, आता घाबरू नका 'मी आमदार झाल्यावर बैलगाडे खुशाल पळवा. कुणाला घाबरायची गरज नाही. माझ्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील. मी खोट्या गुन्ह्यांना घाबरत नाही' असे वक्तव्य अपक्ष उमेदवार अतुल देशमुख यांनी केले. राजगुरुनगर येथील त्यांच्या जाहीर सभेत ते बोलत होते.

'माझ्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी बैलगाडा शर्यती खुल्या करणार'

अतुल देशमुख हे भाजपमधून बाहेर पडून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. निवडणुका आल्या की अनेकजण आश्वासनांचा पाऊस पाडतात. जनतेची दिशाभूल केली जाते. मात्र, खेड तालुक्यात अद्यापही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. बेरोजगारी वाढत आहे. स्थानिक मुलांमध्ये काम करण्याची क्षमता आणि शिक्षण असताना देखील स्थानिकांना कामे दिली जात नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी, काँग्रेसच्या या आमदारांना कुटुंबातील सदस्यांसाठी एमआयडीसी पाहीजे असल्याचे ते म्हणाले. आमदार सुरेश गोरे गेल्या ५ वर्षांपासून विधीमंडळात काय करत होते? झोपा काढत होते का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपचार केला.

सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या व्यक्तीला शेतकरी जनता डोक्यावर घेते. आता तुमच्यासमोर शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून अतुल देशमुख हा सक्षम पर्याय उभा आहे. त्याला साथ द्या, असे आवाहन जय मल्हार मालिकेतील अभिनेता देवदत्त नागे यांनी भंडाराची उधळण करत केले.

पुणे - आम्ही सर्वजण शेतकरी कुटुंबातील मुले आहोत. आम्हाला काही नको. मात्र, या भागातील बैलगाडा शर्यत बंद आहे. बैलगाडा शर्यत बंदीविरोधात आंदोलने केली जातात. आमदार मात्र पोलिसांच्या भीतीने पळपुटेपणा करतात. मात्र, आता घाबरू नका 'मी आमदार झाल्यावर बैलगाडे खुशाल पळवा. कुणाला घाबरायची गरज नाही. माझ्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील. मी खोट्या गुन्ह्यांना घाबरत नाही' असे वक्तव्य अपक्ष उमेदवार अतुल देशमुख यांनी केले. राजगुरुनगर येथील त्यांच्या जाहीर सभेत ते बोलत होते.

'माझ्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी बैलगाडा शर्यती खुल्या करणार'

अतुल देशमुख हे भाजपमधून बाहेर पडून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. निवडणुका आल्या की अनेकजण आश्वासनांचा पाऊस पाडतात. जनतेची दिशाभूल केली जाते. मात्र, खेड तालुक्यात अद्यापही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. बेरोजगारी वाढत आहे. स्थानिक मुलांमध्ये काम करण्याची क्षमता आणि शिक्षण असताना देखील स्थानिकांना कामे दिली जात नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी, काँग्रेसच्या या आमदारांना कुटुंबातील सदस्यांसाठी एमआयडीसी पाहीजे असल्याचे ते म्हणाले. आमदार सुरेश गोरे गेल्या ५ वर्षांपासून विधीमंडळात काय करत होते? झोपा काढत होते का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपचार केला.

सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या व्यक्तीला शेतकरी जनता डोक्यावर घेते. आता तुमच्यासमोर शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून अतुल देशमुख हा सक्षम पर्याय उभा आहे. त्याला साथ द्या, असे आवाहन जय मल्हार मालिकेतील अभिनेता देवदत्त नागे यांनी भंडाराची उधळण करत केले.

Intro:Anc__आम्ही सर्वजण शेतकरी कुटुंबातील मुलं आहे आम्हाला काही नको मात्र या भागातील बैलगाडा शर्यत बंद आहे मात्र निवडणुकी आल्या कि अनेकांकडुन आश्वासनांचा पाऊस पाडला जातोय आणि जनतेची दिशाभूल केली जाते बैलगाडा शर्यत बंदी विरोधात आंदोलने केली गेलीय पोलीसांच्या भितीने या आमदारांनी पळकुटेपणा केलाय पण आता घाबरु नका "मी आमदार झाल्यावर बैलगाडा खुला पळवा कुनाला घाबराची गरज नाही माझ्यावर कितीपण गुन्हे दाखल होऊ द्या मी खोट्या गुन्ह्यांना घाबरत नसल्याचे वक्तव्य भाजपातुन बाहेर पडुन अपक्ष उमेदवार अतुल देशमुख यांनी राजगुरुनगर येथील अतुलपर्व विजयाच्या जाहिर सभेत बोलत होते

खेड तालुक्यात अनेक प्रश्न प्रलंबित असताना शिवसेनेच्या आमदाराला पाहिलं कि प्रश्न पडतो हा आमदार प्रश्न निर्माण करणार आमदार आहे खेड तालुक्यात बेरोजगारी वाढत आहे स्थानिक मुलांमध्ये काम करण्याची क्षमता व शिक्षण सर्व काही असतानाही स्थानिक तरुण म्हणुन काम दिलं जात नाही या तरुणांसाठी भुमिका घेणारा आमदार व्हायला हवा असल्याचे अतुल देशमुख यांनी सांगत शिवसेना व राष्ट्रवादी कॉग्रेसच्या उमेदवारांना लक्ष करत म्हणाले "या आमदारांना आमदारकी कुटुंबातील सदस्यांसाठी एमआयडीसी पाहिजे मात्र मला या तालुक्यातील तरुणांना रोजगार मिळवुन देण्यासाठी एमआयडीसी पाहिजे"


गेल्या पाच वर्षापासुन गोरे तुम्ही विधीमंडळात काय करत होतात..! का झोपा घेत होते..! का झोपी गेलेल्यावर जागेच झाला नाहीत असे अनेक प्रश्न पडायला लागले आहेत खेड तालुक्यात वाहतुक कोंडीचा प्रश्न गंभीर आहे भिमाशंकर विकास आराखडा,हुतात्मा राजगुरु जन्मस्थळ दुर्लक्षीत आहे यामध्ये आमदार गोरेंची भुमिका कधीच कळाली नसल्याचे सांगात देशमुखांनी शिवसेनेच्या आमदारांची खरडपट्टीच काढली.

भाजपातुन बाहेर पडलेले उमेदवार शेतक-यांचा मुलगा.. देवदत्त नागे_सिनेअभिनेता.

जो सर्व सामान्य जनता व शेतक-यांसाठी लढुतो त्यालाच हि शेतकरी जनता डोक्यावर घेते आणि आता तुमच्यासमोर शेतक-यांचाच मुलगा म्हणून अतुल देशमुख हा सक्षम पर्याय उभा आहे त्याला साथ देण्याचे आवाहन जय मल्हार मालिकेतील अभिनेता देवदत्त नागे यांनी भंडाराची उधळण करत अतुलपर्वाच्या विजयाच्या जाहिर सभेत उपस्थित जनतेला शपथ देऊ साथ देण्याचे आवाहन करण्यात आलेBody:....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.