ETV Bharat / state

धक्कादायक; मेंढ्यांच्या कळपावर विद्युत वाहिनीची तार पडल्याने 55 मेंढ्या ठार

वादळी पावसामुळे विद्युत वाहिनीची तार तुटून मेढ्यांच्या कळपावर पडली. यामुळे ५५ मेंढ्या ठार झाल्याने मेंढपाळाचे नुकसान झाले.

author img

By

Published : Jun 24, 2019, 8:56 AM IST

मृत मेंढ्या

पुणे - विद्युत वाहिनीची तार तुटून मेंढ्याच्या कळपावर पडल्याने 55 मेंढ्या ठार झाल्याने खळबळ उडाली. ही घटना खेड तालुक्यातील कडूस-टोकेवाडी येथील आवटे मळ्यात रविवारी सायंकाळी घडली. सुदैवाने मेंढपाळ कुटुंब यातून थोडक्यात बचावले.


कडूस परिसरात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. वादळामुळे टोकेवाडी येथील आवटे मळ्यात विद्युत वाहिनीची तार तुटून शेतातील मेंढ्यांच्या कळपावर पडली. यात विजेच्या धक्क्यामुळे शिवाजी नाथा तिखोळे व बाळू नाथा तिखोळे (रा. ढवळपुरी, जि. नगर ) या मेंढपाळ भावांच्या 55 मेंढ्या जागेवरच मरण पावल्या.


घटनास्थळी मृत मेंढ्यांचा अक्षरशः ढीग लागलेला आहे. तार तुटलेली विद्युत वाहिनी सायगाव-कडूस दरम्यान भिमानदीच्या बाजूकडे आहे. घटनेवेळी दहा ते पंधरा माणसांचे तिखोळे कुटुंब तुटलेल्या तारेपासून थोडे दूर अंतरावर होते, त्यामुळे हे कुटुंब अपघातातून थोडक्यात बचावले. मेंढपाळ मेंढ्यांचा कळप घेऊन पाणी व चारा शोधत रोज एका गावात आपला संसार उघड्यावर शेतात मांडतात.

पुणे - विद्युत वाहिनीची तार तुटून मेंढ्याच्या कळपावर पडल्याने 55 मेंढ्या ठार झाल्याने खळबळ उडाली. ही घटना खेड तालुक्यातील कडूस-टोकेवाडी येथील आवटे मळ्यात रविवारी सायंकाळी घडली. सुदैवाने मेंढपाळ कुटुंब यातून थोडक्यात बचावले.


कडूस परिसरात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. वादळामुळे टोकेवाडी येथील आवटे मळ्यात विद्युत वाहिनीची तार तुटून शेतातील मेंढ्यांच्या कळपावर पडली. यात विजेच्या धक्क्यामुळे शिवाजी नाथा तिखोळे व बाळू नाथा तिखोळे (रा. ढवळपुरी, जि. नगर ) या मेंढपाळ भावांच्या 55 मेंढ्या जागेवरच मरण पावल्या.


घटनास्थळी मृत मेंढ्यांचा अक्षरशः ढीग लागलेला आहे. तार तुटलेली विद्युत वाहिनी सायगाव-कडूस दरम्यान भिमानदीच्या बाजूकडे आहे. घटनेवेळी दहा ते पंधरा माणसांचे तिखोळे कुटुंब तुटलेल्या तारेपासून थोडे दूर अंतरावर होते, त्यामुळे हे कुटुंब अपघातातून थोडक्यात बचावले. मेंढपाळ मेंढ्यांचा कळप घेऊन पाणी व चारा शोधत रोज एका गावात आपला संसार उघड्यावर शेतात मांडतात.

Intro:Anc__खेड तालुक्यातील कडूस-टोकेवाडी येथील आवटे मळ्यात विद्युत वहिनीची तार तुटून मेंढ्यांच्या कळपावर पडुन 55 मेंढ्यांचा जागीच मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली आहे दैव बलवत्तर म्हणून यामध्ये मेंढपाळ कुटुंब यातून थोडक्यात बचावले.

कडूस परिसराला सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. वादळामुळे टोकेवाडी येथील आवटे मळ्यात विद्युत वहिनीची तार अचानक तुटून अपघाताची घटना घडली. विद्युत प्रवाह सुरू असलेली ही तार शेतातील मेंढ्यांच्या कळपावर पडली. यात विजेच्या धक्क्यामुळे शिवाजी नाथा तिखोळे व बाळू नाथा तिखोळे (रा.ढवळपुरी, जि.नगर) या मेंढपाळ भावांच्या 55 मेंढ्या जागेवरच मरण पावल्या. घटनास्थळी मृत मेंढ्यांचा अक्षरशः ढीग लागलेला आहे. तार तुटलेली विद्युत वाहिनी सायगाव-कडूस दरम्यान भिमानदीच्या बाजूकडे आहे. घटनेवेळी दहा ते पंधरा माणसांचे तिखोळे कुटुंब तुटलेल्या तारेपासून थोडे दूर अंतरावर होते, त्यामुळे हे कुटुंब अपघातातून सुदैवाने थोडक्यात बचावले.


मेंढपाळ मेंढ्यांचा कळप घेऊन पाणी व चारा शोधत रोज एका गावात आपला संसार उघड्यावर शेतात मांडतात,मात्र सध्या पावसांच्या दिवसात भरपाऊसात है मेंढपाल आपलं जीवन जगत आहे.
Body:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.