ETV Bharat / state

मराठ्यांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणारा सिंहगड... - सिंहगड लढाई न्यूज

कोंढाणा किल्ला लढाई करुन कोणीही ताब्यात घेऊ शकले नव्हते. मात्र, केवळ दीडशे मावळ्यांना सोबतीला घेऊन नरवीर तान्हाजी मालुसरे यांनी हा पराक्रम करुन दाखवला. 4 फेब्रुवारीला सिंहगडाच्या लढाईला 350 वर्ष पूर्ण होत आहेत.

सिंहगड
सिंहगड
author img

By

Published : Feb 4, 2020, 4:48 PM IST

Updated : Feb 4, 2020, 9:35 PM IST

पुणे - शहरापासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर असलेला सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी आवडीचे पर्यटन स्थळ आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीसाठी मावळ्यांनी दिलेल्या बलिदानाची आठवण करुन देणारा हा किल्ला आहे. या किल्ल्यावर मराठी मावळ्यांनी अपरिमीत शौर्य दाखवले होते. 4 फेब्रुवारीला सिंहगडाच्या लढाईला 350 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त हा स्पेशल रिपोर्ट...

मराठ्यांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणारा सिंहगड


सिंहगडाला अगोदर कोंढाणा नाव होते. त्याच्या निर्मितीनंतर कोंढाणा किल्ला लढाई करुन कोणीही ताब्यात घेऊ शकले नव्हते. मात्र, केवळ दीडशे मावळ्यांना सोबतीला घेऊन नरवीर तान्हाजी मालुसरे यांनी हा पराक्रम करुन दाखवला.

हेही वाचा - तेलंगणाच्या धरणाचा गडचिरोलीला फटका; मेडीगट्टाचे दरवाजे बंद केल्याने शेतात पाणी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीत कोंढण्याला अनन्य साधारण महत्त्व होते. राजकीय अपरिहार्यतेमुळे महाराजांना तह करावा लागला आणि तहात कोंढाणा मुघलांच्या ताब्यात गेला. मुघल सरदार उदयभान राठोडकडे कोंढण्याची जबाबदारी होती. त्याच्या अत्याचाराने जनता भयभीत झाली होती. स्वराज्य कमजोर पडत चालेले असताना महाराजांनी कोंढाणा सर करण्याची मोहीम आखली. तान्हाजी मालुसरे यांनी आपल्या प्राणांची बाजी लावून कोंढाणा स्वराज्यात आणला.

कोंढाणा किल्ला जिंकला मात्र, तान्हाजी मालूसरेंसारखा महान योद्धा गमावल्याने 'गड आला पण माझा सिंह गेला' असे छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होते. तेव्हा पासून कोंढण्याचे नाव सिंहगड झाले. सध्या हजारो पर्यटक सिंहगडावर येतात आणि परत जाताना मराठ्यांच्या बलिदानाचा जाज्वल्य इतिहास घेऊन जातात.

पुणे - शहरापासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर असलेला सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी आवडीचे पर्यटन स्थळ आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीसाठी मावळ्यांनी दिलेल्या बलिदानाची आठवण करुन देणारा हा किल्ला आहे. या किल्ल्यावर मराठी मावळ्यांनी अपरिमीत शौर्य दाखवले होते. 4 फेब्रुवारीला सिंहगडाच्या लढाईला 350 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त हा स्पेशल रिपोर्ट...

मराठ्यांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणारा सिंहगड


सिंहगडाला अगोदर कोंढाणा नाव होते. त्याच्या निर्मितीनंतर कोंढाणा किल्ला लढाई करुन कोणीही ताब्यात घेऊ शकले नव्हते. मात्र, केवळ दीडशे मावळ्यांना सोबतीला घेऊन नरवीर तान्हाजी मालुसरे यांनी हा पराक्रम करुन दाखवला.

हेही वाचा - तेलंगणाच्या धरणाचा गडचिरोलीला फटका; मेडीगट्टाचे दरवाजे बंद केल्याने शेतात पाणी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीत कोंढण्याला अनन्य साधारण महत्त्व होते. राजकीय अपरिहार्यतेमुळे महाराजांना तह करावा लागला आणि तहात कोंढाणा मुघलांच्या ताब्यात गेला. मुघल सरदार उदयभान राठोडकडे कोंढण्याची जबाबदारी होती. त्याच्या अत्याचाराने जनता भयभीत झाली होती. स्वराज्य कमजोर पडत चालेले असताना महाराजांनी कोंढाणा सर करण्याची मोहीम आखली. तान्हाजी मालुसरे यांनी आपल्या प्राणांची बाजी लावून कोंढाणा स्वराज्यात आणला.

कोंढाणा किल्ला जिंकला मात्र, तान्हाजी मालूसरेंसारखा महान योद्धा गमावल्याने 'गड आला पण माझा सिंह गेला' असे छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होते. तेव्हा पासून कोंढण्याचे नाव सिंहगड झाले. सध्या हजारो पर्यटक सिंहगडावर येतात आणि परत जाताना मराठ्यांच्या बलिदानाचा जाज्वल्य इतिहास घेऊन जातात.

Intro:कोंढण्याच्या लढाईला 350 वर्षे, मराठ्यांचा ज्वाजल्या इतिहास....Body:mh_pun_01_kondhana_war_story_pkg_special_story_7201348


anchor
पुणे शहरापासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर असलेला किल्ले सिंहगड, पुणे आणि पुण्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी आवडीचे पर्यटन स्थळ, मात्र फक्त पर्यटनस्थळ म्हणून या किल्ल्याकडे पाहिले जात नाही तर स्वराज्य निर्मितीसाठी बलिदानाची, महान शौर्याची साक्ष देणारा, लढावयया मावळ्यांचा लढाऊपणा रोमारोमात भिनलेला हा गड.. याच किल्ले सिंहगड वर 20 फेब्रुवारीला बरोबर 350 वर्षांपूर्वी
एक महान इतिहास लिहिला गेला होता, निर्मिती नंतरच्या शेकडो वर्षाच्या इतिहासात कोंढाणा किल्ला लढाई करून कोणी ही ताब्यात घेऊ शकले नव्हते, मात्र हा पराक्रम केवळ शे दीडशे मावळ्यांच्या सोबतीने काळ्या पाषाणाला, विशाल कडे कपारी, खोलच खोल दऱ्याना मात देत नरवीर तान्हाजी मालुसरे यांनी केला होता आणि गडावर स्वराज्याचे भगवे निशाण फडकवले होते.....
स्वराज्य निर्मितीच्या काळात किल्ले सिंहगड ची ओळख कोंढाणा अशी होती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीत कोंढण्याला अनन्य साधारण महत्व होते....मात्र राजकीय अपरिहार्यतेमुळे महाराजांना तह करावा लागला आणि तहात कोंढाणा मोगलांच्या ताब्यात गेला, उलट्या काळजाचा मोगल सरदार उदयभान राठोड कडे कोंढण्याची जबाबदारी आली मात्र त्याच्या अत्याचाराने जनता भयक्रांत झालेली, स्वराज्य कमजोर पडत चालेले असताना महाराजांनी कोंढाणा सर करण्याची मोहीम आखली....
जगातील लढायांच्या इतिहासात नोंदवली जाईल अशी कोंढण्याची लढाई मानता येईल, हा इतिहास आज ही जागवला जातोय...कोंढाणा किल्ला जिंकला मात्र तान्हाजी मालूसरेंसारखा महान योद्धा गमावल्याने गड आला पण माझा सिंह गेला असे छत्रपती म्हणाले होते आणि तेव्हा पासून कोंढणाचे नाव सिहगड झाले, आज हजारो पर्यटक सिहगडावर येत असतात आणि परत जाताना या महान नरविरा च्या बलिदानाचा जाज्वल्य इतिहास घेऊन जातात .....

Byte दत्ताजी नलावडे, इतिहास अभ्यासक
Byte मावळ्यांचे वंशज
Conclusion:
Last Updated : Feb 4, 2020, 9:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.