ETV Bharat / state

निकष बाजूला ठेवा, आधी 25 हजार हेक्टरी द्या; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी - परभणीमधील पिकांची नासाडी

शासनाने त्यांचे निकष बाजूला ठेवावेत आणि शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये तात्काळ द्यावेत, अशी मागणी आपण सरकारकडे केल्याची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.

उद्धव ठाकरे
author img

By

Published : Nov 8, 2019, 12:32 PM IST

परभणी - जिल्ह्यात अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. यामध्ये लाखो हेक्‍टरवरील पिकांची नासाडी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर गुरवारी सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परभणी जिल्ह्यातील राणीसावरगाव आणि इसाद या गावातील नुकसानग्रस्त शेतांची पाहणी केली. यावेळी शासनाने त्यांचे निकष बाजूला ठेवावेत आणि शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये तात्काळ द्यावेत, अशी मागणी आपण सरकारकडे केल्याची माहिती त्यांनी दिली.

निकष बाजूला ठेवा, आधी 25 हजार हेक्टरी द्या; उद्धव ठाकरेंची परभणीत शेतकऱ्यांबाबत शासनाकडे मागणी


अवकाळी पावसामुळे झालेली नुकसान भरपाई मिळावी आणि सातबारा कोरा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे लावून धरली. खरीप सोबतच रब्बीचा हंगाम देखील शेतकऱ्यांच्या हातून गेल्याची व्यथा यावेळी उद्धव ठाकरे यांच्यापुढे मांडण्यात आली.


प्रशासनाकडून बांधावर येऊन पंचनामे होणार आहेत. शेतकऱ्यांना कुठलेही कागदपत्र किंवा पुरावे देण्याची आवश्यकता नाही. नुकसान झालेलं सर्वांच्या पुढेच आहे. त्यामुळे निश्चित राहा, प्रत्येकाला नुकसान भरपाई मिळेल. शेतकऱ्यांना कुठलेही निकष न लावता तात्काळ हेक्टरी 25 हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी मी शासनाकडे केली आहे. ती पूर्ण करून घेण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करू, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिले.


यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते तथा मंत्री सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, जयदत्त क्षीरसागर, खासदार संजय जाधव, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार डॉ.राहुल पाटील, जिल्हाप्रमुख विशाल कदम आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान परभणीवरून उद्धव ठाकरे गंगाखेडमार्गे परळीकडे रवाना झाले.

परभणी - जिल्ह्यात अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. यामध्ये लाखो हेक्‍टरवरील पिकांची नासाडी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर गुरवारी सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परभणी जिल्ह्यातील राणीसावरगाव आणि इसाद या गावातील नुकसानग्रस्त शेतांची पाहणी केली. यावेळी शासनाने त्यांचे निकष बाजूला ठेवावेत आणि शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये तात्काळ द्यावेत, अशी मागणी आपण सरकारकडे केल्याची माहिती त्यांनी दिली.

निकष बाजूला ठेवा, आधी 25 हजार हेक्टरी द्या; उद्धव ठाकरेंची परभणीत शेतकऱ्यांबाबत शासनाकडे मागणी


अवकाळी पावसामुळे झालेली नुकसान भरपाई मिळावी आणि सातबारा कोरा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे लावून धरली. खरीप सोबतच रब्बीचा हंगाम देखील शेतकऱ्यांच्या हातून गेल्याची व्यथा यावेळी उद्धव ठाकरे यांच्यापुढे मांडण्यात आली.


प्रशासनाकडून बांधावर येऊन पंचनामे होणार आहेत. शेतकऱ्यांना कुठलेही कागदपत्र किंवा पुरावे देण्याची आवश्यकता नाही. नुकसान झालेलं सर्वांच्या पुढेच आहे. त्यामुळे निश्चित राहा, प्रत्येकाला नुकसान भरपाई मिळेल. शेतकऱ्यांना कुठलेही निकष न लावता तात्काळ हेक्टरी 25 हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी मी शासनाकडे केली आहे. ती पूर्ण करून घेण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करू, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिले.


यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते तथा मंत्री सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, जयदत्त क्षीरसागर, खासदार संजय जाधव, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार डॉ.राहुल पाटील, जिल्हाप्रमुख विशाल कदम आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान परभणीवरून उद्धव ठाकरे गंगाखेडमार्गे परळीकडे रवाना झाले.

Intro:परभणी - अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे कागदपत्र किंवा पुरावे दाखवण्याची आवश्यकता नाही. सरकारी यंत्रणा बांधावर येऊन त्यांचे काम करत आहे. मात्र हे काम चालतच राहील; परंतु शासनाने त्यांचे निकष बाजूला ठेवावेत आणि शेतकऱ्यांना आधी हेक्टरी 25 हजार रुपये तात्काळ द्यावेत, अशी मागणी आपण केली असल्याची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज परभणीत शेतकऱ्यांना दिली.Body: परभणी जिल्ह्यात 19 ऑक्टोंबर पासून अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. यामध्ये लाखो हेक्‍टरवरील पिकांची नासाडी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज सायंकाळी 6 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड जवळील राणीसावरगाव आणि इसाद या गावांच्या शिवारातील नुकसानग्रस्त शेतांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाईचा मिळावी, तसेच सातबारा कोरा करावा, अशी मागणी लावून धरली होती. तसेच सोयाबीन आणि कापसाचे पीक शंभर टक्के हातून गेले आहे. शिवाय येणारी रब्बीची पेरणी देखील करणे शक्य नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे खरीप सोबतच रब्बीचा हंगाम देखील शेतकऱ्यांच्या हातून गेल्याची व्यथा यावेळी उद्धव ठाकरे यांच्यापुढे मांडण्यात आली. त्यावर दिलासा देताना उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना संकटात खंबीर राहण्याचे आवाहन केले. संकटे येत असतात, परंतु शिवसेना तुमच्या पाठीशी कायम आहे. घाबरून जाऊ नका. नसते विचार मनात आणू नका. हा काळ राहणार नाही. शासन आपले काम करत आहे. प्रशासनाकडून देखील बांधावर येऊन पंचनामे होणार आहेत. शेतकऱ्यांना कुठलेही कागदपत्र किंवा पुरावे देण्याची आवश्यकता नाही. नुकसान झालेलं सर्वांच्या पुढेच आहे. त्यामुळे निश्चिंत राहा. प्रत्येकाला नुकसान भरपाई मिळेल; परंतु मी शासनाकडे शेतकऱ्यांना कुठलेही निकष आता न लावता तात्काळ हेक्टरी 25 हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी केली आहे आणि ती आपण पूर्ण करून घेण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करू, असे देखील उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना आश्वासित केले. या ठिकाणाहून ते पुढे गंगाखेडमार्गे परळीकडे रवाना झाले. यांच्यासोबत शिवसेना नेते तथा मंत्री सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, जयदत्त क्षीरसागर, खासदार संजय जाधव, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार डॉ.राहुल पाटील, जिल्हाप्रमुख विशाल कदम आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- photo & udhav thakre talking visConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.