ETV Bharat / state

परभणीत शेतकरी संघर्ष समितीचा ४ ठिकाणी रास्तारोको; ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

author img

By

Published : Nov 4, 2020, 5:17 PM IST

ओला दुष्काळ जाहीर करून जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीने शहरात येणार्‍या चार मार्गांवर आज 'रास्तारोको' आंदोलन केले.

shetkari sangharsh samiti roadjam parbhani
शेतकरी संघर्ष समितीचा ४ ठिकाणी रास्तारोको

परभणी - जिल्ह्यात सततच्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे, ओला दुष्काळ जाहीर करून जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी शेतकर्‍यांना सरासरी पंचनामे ग्राह्य धरून विमा मंजूर करण्यात यावा, जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात सीसीआयची किमान दोन खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करावीत यासह अन्य मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीने शहरात येणार्‍या चारही मार्गांवर आज 'रास्तारोको' आंदोलन केले. यामध्ये मोठ्या संख्येने शेतकर्‍यांनी सहभाग नोंदवला.

परभणी तालुक्यातील पोखर्णी फाटा, पेडगाव फाटा, त्रिधारा फाटा व टाकळी कुंभकर्ण या ठिकाणी हे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. दुपारच्या सुमारास पार पडलेल्या या आंदोलनामुळे शहरात येणाऱ्या जिंतूर, पाथरी, वसमत आणि गंगाखेड या प्रमुख चारही महामार्गांवरील वाहतूक ठप्प झाली होती. सुमारे तास-दीड तास शेतकरी रस्त्यावर ठिय्या मांडून होते. ज्यामुळे या मार्गांवर दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.

परभणीत शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन

हेक्टरी 50 हजाराच्या मदतीची मागणी

संततधार पावसामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. विशेषतः मुगाच्या शेंगांना कोंब फुटली आहेत. सोयाबीन व कापूस या दोन्ही पिकांना तडाखा बसला आहे. परतीच्या पावसाने हळद, तूर आणि उसाचे प्रचंड नुकसान केले आहे. तसेच, अन्य पिकांनाही तडाखा बसला आहे. अशा स्थितीत प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येऊन स्वीकारली निवेदने

शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने पेडगाव फाट्यावर रास्तारोको आंदोलन करून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सरसकट प्रती हेक्टरी ५० हजार रुपये मदत करावी, यासह अन्य मागणीचे निवेदन परभणीचे नायब तहसीलदार मंदार इंदुरकर यांना देण्यात आले. या आंदोलनात संतोष देशमुख, टी.एम. देशमुख, दिलीप साबळे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले होते. तसेच, पोखर्णी फाटा येथे गणेश घाडगे यांच्या हस्ते, तर टाकळी कुंभकर्ण येथे माऊली कदम यांच्या हस्ते अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

अनेक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग

परभणी शहराच्या चारही बाजूने झालेल्या या आंदोलनात प्रामुख्याने काँग्रेसचे गणेश घाडगे, वंचित बहुजन आघाडीचे डॉ. धर्मराज चव्हाण, शेतकरी संघटनेचे माऊली कदम, लिंबाजीराव कचरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख, किरण चक्रपाणी, सचिन जवंजाळ आदींनी भाग घेतला.

हेही वाचा- आमदार बोर्डीकरांचे उपोषण स्थगित; ठोस निर्णय घेण्यास आचारसंहितेची आडसर

परभणी - जिल्ह्यात सततच्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे, ओला दुष्काळ जाहीर करून जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी शेतकर्‍यांना सरासरी पंचनामे ग्राह्य धरून विमा मंजूर करण्यात यावा, जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात सीसीआयची किमान दोन खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करावीत यासह अन्य मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीने शहरात येणार्‍या चारही मार्गांवर आज 'रास्तारोको' आंदोलन केले. यामध्ये मोठ्या संख्येने शेतकर्‍यांनी सहभाग नोंदवला.

परभणी तालुक्यातील पोखर्णी फाटा, पेडगाव फाटा, त्रिधारा फाटा व टाकळी कुंभकर्ण या ठिकाणी हे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. दुपारच्या सुमारास पार पडलेल्या या आंदोलनामुळे शहरात येणाऱ्या जिंतूर, पाथरी, वसमत आणि गंगाखेड या प्रमुख चारही महामार्गांवरील वाहतूक ठप्प झाली होती. सुमारे तास-दीड तास शेतकरी रस्त्यावर ठिय्या मांडून होते. ज्यामुळे या मार्गांवर दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.

परभणीत शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन

हेक्टरी 50 हजाराच्या मदतीची मागणी

संततधार पावसामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. विशेषतः मुगाच्या शेंगांना कोंब फुटली आहेत. सोयाबीन व कापूस या दोन्ही पिकांना तडाखा बसला आहे. परतीच्या पावसाने हळद, तूर आणि उसाचे प्रचंड नुकसान केले आहे. तसेच, अन्य पिकांनाही तडाखा बसला आहे. अशा स्थितीत प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येऊन स्वीकारली निवेदने

शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने पेडगाव फाट्यावर रास्तारोको आंदोलन करून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सरसकट प्रती हेक्टरी ५० हजार रुपये मदत करावी, यासह अन्य मागणीचे निवेदन परभणीचे नायब तहसीलदार मंदार इंदुरकर यांना देण्यात आले. या आंदोलनात संतोष देशमुख, टी.एम. देशमुख, दिलीप साबळे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले होते. तसेच, पोखर्णी फाटा येथे गणेश घाडगे यांच्या हस्ते, तर टाकळी कुंभकर्ण येथे माऊली कदम यांच्या हस्ते अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

अनेक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग

परभणी शहराच्या चारही बाजूने झालेल्या या आंदोलनात प्रामुख्याने काँग्रेसचे गणेश घाडगे, वंचित बहुजन आघाडीचे डॉ. धर्मराज चव्हाण, शेतकरी संघटनेचे माऊली कदम, लिंबाजीराव कचरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख, किरण चक्रपाणी, सचिन जवंजाळ आदींनी भाग घेतला.

हेही वाचा- आमदार बोर्डीकरांचे उपोषण स्थगित; ठोस निर्णय घेण्यास आचारसंहितेची आडसर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.