ETV Bharat / state

परभणीत पुन्हा मुसळधार पाऊस; उरलीसुरल्या पिकांची दाणादाण

author img

By

Published : Oct 1, 2020, 6:52 AM IST

परभणी जिल्ह्यात बुधवारी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्याची पिके पुन्हा एकदा पाण्याखाली गेली आहेत. त्यातच यापूर्वीच गोदावरी नदीला पूर आला असल्याने अनेक पिकांमध्ये पाणी उभे राहिले होते. काहीचे सोयाबीन पाण्यातच कूजत आहे. यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने पंचनामे न करता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी आता केली जात आहे.

Heavy Rain Damages crop
परभणीत पुन्हा मुसळधार पाऊस

परभणी - चार दिवसांच्या उघडीपीनंतर बुधवारी सायंकाळी जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. ज्यामुळे जिल्ह्यातल्या अनेक भागात काढणीला आलेल्या व शेतांमध्ये काढून ठेवलेल्या सोयाबीन पिकांची प्रचंड प्रमाणात नासाडी झाली आहे. या पावसाने पिकांना अक्षरश: झोडपल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचा घास निसर्गाकडून हिरावण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील काही भागातील लहान मोठ्या ओढे आणि नाल्यांना पूर आला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाल्याने नागरिकांची तारांबळ झाली, तर शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले.

heavy rainfall in parabhani
परभणीत पुन्हा मुसळधार पाऊस

जिल्ह्यात तब्बल दहा ते बारा दिवसाच्या सततच्या पावसानंतर गेल्या चार दिवसात पावसाने उसंत घेतली होती. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी पदरात पडेल ते सोयाबीन काढण्यासाठी लगबग सुरू केली. मात्र, त्यातच बुधवारी सायंकाळी जोरदार पावसाला सुरुवात झाली. यात मानवत तालुक्यातील ताडबोरगाव, कोल्हा, देवलगाव अवचार, सोमठाणा, कोथाळा भागात अर्धा ते पाऊणतास तुफान पाऊस पडला. या भागात अनेक शेतकर्‍यांची सोयाबीनच्या काढणीची लगबग सुरू होती. परंतू, मुसळधार पडलेल्या पावसाने उभे पीक डोळ्यासमोर पाण्यात तरंगताना पाहावे लागले. तर अशीच परिस्थिती पूर्णा तालुक्यातील लिमला, वझूर व परभणीतील ईटलापूर या गावांतील होती. अचानक आलेल्या पावसाने कापलेल्या सोयाबीनच्या शेतामध्ये पाहता पाहता पाणीच पाणी करून टाकले. गेल्या काही वर्षात अल्पप्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी हैराण झाला असून, आता मात्र अतिवृष्टीमुळे हाच शेतकरी संकटात सापडला आहे.

परभणीत पुन्हा मुसळधार पाऊस
"260 मिलिमीटर पाऊस"परभणी जिल्ह्यातील सप्टेंबर महिन्याची पावसाची सरासरी 157 मिमी असताना तब्बल 260 मिमी पाऊस झाला आहे. तब्बल 164 टक्के अधिक पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे पिके धोक्यात आली आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील अनेक मंडळांमध्ये तब्बल अडीचशे टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला. परभणी तालुक्यात 152 टक्के तर पाथरी तालुक्यात 177, जिंतूर 173, पालम 196, पूर्ण 151, सोनपेठ 200 आणि मानवत तालुक्यात तब्बल 196 टक्के पाऊस पडला आहे. "वालूर-हातनूर रस्ता बंद, शहरात पाणीच पाणी"बुधवारी सायंकाळी परभणीसह गंगाखेड, सेलू, वालूर आदी भागात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे सर्वदूर पाणीच पाणी झाले. अनेक भागात ओढ्या-नाल्यांना पूर आला असून, त्याप्रमाणे सेलू तालुक्यातील वालूर-हातनुर रस्त्यावरील ओढ्यास पूर आल्याने या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे. ज्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा ग्रामस्थ मोठ्या स्ंख्येने अडकून पडले होते.

"धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग"

यापूर्वीच जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात पाऊस बरसात असतानाच जायकवाडी धरणातून 94 हजार क्युसेकने आणि माजलगाव धरणातून 35 हजार क्युसेकने पाणी गोदावरीच्या पात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे ठिक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्याप्रमाणेच येलदरी प्रकल्पातून देखील वेळोवेळी पाणी सोडल्याने पूर्णा आणि दुधना या नद्यांना पूर आला. ज्यामध्ये हजारो हेक्टर शेतात पुराचे पाणी शिरल्याने उभ्या पिकांची नासाडी झाली. त्यानंतर बुधवारी पडलेल्या पावसामुळे इतर शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीचे पंचनामे न करता सरसकट भरपाई द्यावी, अशी मागणी परभणी जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत.


परभणी - चार दिवसांच्या उघडीपीनंतर बुधवारी सायंकाळी जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. ज्यामुळे जिल्ह्यातल्या अनेक भागात काढणीला आलेल्या व शेतांमध्ये काढून ठेवलेल्या सोयाबीन पिकांची प्रचंड प्रमाणात नासाडी झाली आहे. या पावसाने पिकांना अक्षरश: झोडपल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचा घास निसर्गाकडून हिरावण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील काही भागातील लहान मोठ्या ओढे आणि नाल्यांना पूर आला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाल्याने नागरिकांची तारांबळ झाली, तर शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले.

heavy rainfall in parabhani
परभणीत पुन्हा मुसळधार पाऊस

जिल्ह्यात तब्बल दहा ते बारा दिवसाच्या सततच्या पावसानंतर गेल्या चार दिवसात पावसाने उसंत घेतली होती. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी पदरात पडेल ते सोयाबीन काढण्यासाठी लगबग सुरू केली. मात्र, त्यातच बुधवारी सायंकाळी जोरदार पावसाला सुरुवात झाली. यात मानवत तालुक्यातील ताडबोरगाव, कोल्हा, देवलगाव अवचार, सोमठाणा, कोथाळा भागात अर्धा ते पाऊणतास तुफान पाऊस पडला. या भागात अनेक शेतकर्‍यांची सोयाबीनच्या काढणीची लगबग सुरू होती. परंतू, मुसळधार पडलेल्या पावसाने उभे पीक डोळ्यासमोर पाण्यात तरंगताना पाहावे लागले. तर अशीच परिस्थिती पूर्णा तालुक्यातील लिमला, वझूर व परभणीतील ईटलापूर या गावांतील होती. अचानक आलेल्या पावसाने कापलेल्या सोयाबीनच्या शेतामध्ये पाहता पाहता पाणीच पाणी करून टाकले. गेल्या काही वर्षात अल्पप्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी हैराण झाला असून, आता मात्र अतिवृष्टीमुळे हाच शेतकरी संकटात सापडला आहे.

परभणीत पुन्हा मुसळधार पाऊस
"260 मिलिमीटर पाऊस"परभणी जिल्ह्यातील सप्टेंबर महिन्याची पावसाची सरासरी 157 मिमी असताना तब्बल 260 मिमी पाऊस झाला आहे. तब्बल 164 टक्के अधिक पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे पिके धोक्यात आली आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील अनेक मंडळांमध्ये तब्बल अडीचशे टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला. परभणी तालुक्यात 152 टक्के तर पाथरी तालुक्यात 177, जिंतूर 173, पालम 196, पूर्ण 151, सोनपेठ 200 आणि मानवत तालुक्यात तब्बल 196 टक्के पाऊस पडला आहे. "वालूर-हातनूर रस्ता बंद, शहरात पाणीच पाणी"बुधवारी सायंकाळी परभणीसह गंगाखेड, सेलू, वालूर आदी भागात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे सर्वदूर पाणीच पाणी झाले. अनेक भागात ओढ्या-नाल्यांना पूर आला असून, त्याप्रमाणे सेलू तालुक्यातील वालूर-हातनुर रस्त्यावरील ओढ्यास पूर आल्याने या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे. ज्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा ग्रामस्थ मोठ्या स्ंख्येने अडकून पडले होते.

"धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग"

यापूर्वीच जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात पाऊस बरसात असतानाच जायकवाडी धरणातून 94 हजार क्युसेकने आणि माजलगाव धरणातून 35 हजार क्युसेकने पाणी गोदावरीच्या पात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे ठिक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्याप्रमाणेच येलदरी प्रकल्पातून देखील वेळोवेळी पाणी सोडल्याने पूर्णा आणि दुधना या नद्यांना पूर आला. ज्यामध्ये हजारो हेक्टर शेतात पुराचे पाणी शिरल्याने उभ्या पिकांची नासाडी झाली. त्यानंतर बुधवारी पडलेल्या पावसामुळे इतर शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीचे पंचनामे न करता सरसकट भरपाई द्यावी, अशी मागणी परभणी जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत.


ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.