ETV Bharat / state

परभणीत रोपवाटिका चालकाने फसवले; बहारात आलेली मिरची शेतकऱ्याने टाकली उपटून

author img

By

Published : Sep 23, 2019, 1:02 PM IST

सेलू तालुक्यातील एका शेतकऱ्याला रोपवाटिका चालकाने फसवले. त्यामुळे त्याच्यावर शेतात उगवलेले उत्पादन उपटून फेकून देण्याची वेळ आली आहे. या शेतकऱ्याला आर्थिक नुकसानीसोबत मनस्तापही सहन करावा लागत आहे.

शेतातून मिर्चीचे रोपटे उपटून फेकून टाकताना शेतकरी

परभणी- अनियमित आणि अल्प पावसामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी राहिलेली नाही. निसर्गासोबतच सुलतानी संकटामुळे शेतकरी हताश झाला आहे. सेलू तालुक्यातील एका शेतकऱ्याला रोपवाटिका चालकाने फसवले आहे. त्यामुळे त्याच्यावर शेतात उगवलेले पीक उपटून फेकून देण्याची वेळ आली आहे. या शेतकऱ्याला आर्थिक नुकसानीसोबत मनस्तापही सहन करावा लागत आहे.

शेतातून मिर्चीचे रोपटे उपटून फेकून टाकताना शेतकरी

ज्ञानेश्वर मोगल असे फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते सेलू तालुक्यातील नरवाडी येथील रहिवासी आहेत. मोगल यांनी गावाजवळ असलेल्या लिपने अॅग्रो रोपवाटिका येथून कलश कंपनीचे मगधीरा हे मिरचीचे वाण घेतले होते. ते वाण त्यांनी आपल्या शेतातील १० गुंठा जमिनीवर लावले होते. यासाठी त्यांनी १५ हजाराची रोपे आणली होती. रोप घेताना रोपवाटिका चालक लिपने यांनी मिरची बहारात आल्यावर पोपटी रंगाची होईल, असे सागितले होते. पण प्रत्यक्षात मिरची बहारात आल्यावर काळी पडू लागली. त्यामुळे या मिर्चीला बाजारात विकत घ्यायला कोणीही तैयार नव्हते. परिणामी ज्ञानेश्वर यांनी ही काळी पडलेली मिरची उपटून टाकण्याचा निर्णय घेतला आणि सर्व मिरचीची झाडे उपटून टाकली.

हेही वाचा- परभणी : दिव्यांग प्राण्यांना कृत्रीम अवयव प्रत्यर्पणाचा प्रयोग यशस्वी

मिरची लागवडीसाठी मोगल यांना एकूण २० हजार रुपये खर्च आला होता. या मिरचीपासून त्यांना ७५ हजार रुपयांची कमाई झाली असती. मात्र नुकसान झाल्याने त्यांना एकूण १ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, संबंधीत प्रशासनाने फसवणूक करणाऱ्यावर कारवाई करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

परभणी- अनियमित आणि अल्प पावसामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी राहिलेली नाही. निसर्गासोबतच सुलतानी संकटामुळे शेतकरी हताश झाला आहे. सेलू तालुक्यातील एका शेतकऱ्याला रोपवाटिका चालकाने फसवले आहे. त्यामुळे त्याच्यावर शेतात उगवलेले पीक उपटून फेकून देण्याची वेळ आली आहे. या शेतकऱ्याला आर्थिक नुकसानीसोबत मनस्तापही सहन करावा लागत आहे.

शेतातून मिर्चीचे रोपटे उपटून फेकून टाकताना शेतकरी

ज्ञानेश्वर मोगल असे फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते सेलू तालुक्यातील नरवाडी येथील रहिवासी आहेत. मोगल यांनी गावाजवळ असलेल्या लिपने अॅग्रो रोपवाटिका येथून कलश कंपनीचे मगधीरा हे मिरचीचे वाण घेतले होते. ते वाण त्यांनी आपल्या शेतातील १० गुंठा जमिनीवर लावले होते. यासाठी त्यांनी १५ हजाराची रोपे आणली होती. रोप घेताना रोपवाटिका चालक लिपने यांनी मिरची बहारात आल्यावर पोपटी रंगाची होईल, असे सागितले होते. पण प्रत्यक्षात मिरची बहारात आल्यावर काळी पडू लागली. त्यामुळे या मिर्चीला बाजारात विकत घ्यायला कोणीही तैयार नव्हते. परिणामी ज्ञानेश्वर यांनी ही काळी पडलेली मिरची उपटून टाकण्याचा निर्णय घेतला आणि सर्व मिरचीची झाडे उपटून टाकली.

हेही वाचा- परभणी : दिव्यांग प्राण्यांना कृत्रीम अवयव प्रत्यर्पणाचा प्रयोग यशस्वी

मिरची लागवडीसाठी मोगल यांना एकूण २० हजार रुपये खर्च आला होता. या मिरचीपासून त्यांना ७५ हजार रुपयांची कमाई झाली असती. मात्र नुकसान झाल्याने त्यांना एकूण १ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, संबंधीत प्रशासनाने फसवणूक करणाऱ्यावर कारवाई करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

Intro:परभणी - अनियमित आणि अल्प पावसामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्याला उत्पन्नाची हमी राहिली नाही. निसर्गासोबतच सुलतानी संकटाने शेतकरी परेशान झाला आहे. सेलू तालुक्यातील एका शेतकऱ्याला रोपवाटिका चालकाने फसवल्याने त्याच्यावर उगवलेले उत्पादन उपटून फेकून देण्याची वेळ आली आहे. या शेतकऱ्याला आर्थिक नुकसानीसोबतच मनस्तापही सहन करावा लागत आहे.
Body:ज्ञानेश्वर मोगल असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते सेलू तालुक्यातील नरवाडी येथील रहिवासी आहेत. तरूण असलेल्या या शेतकऱ्याने एका रोपवाटिकेकडून आणलेल्या मिरची रोप बहारात येताच मिरची काळी पडली. त्यामुळे बाजारात तिला कोणी घेत नव्हते. म्हणून ही मिरची उपटून टाकण्याचा निर्णय ज्ञानेश्वर यांनी घेेेतला. आणि सर्व मिरचीचे झाडं उपटून टाकली.

मोगल यांनी गावाजवळ असलेल्या लिपने अग्रो रोपवाटीका येथून कलश कंपनीचे मगधीरा हे मिरचीचे वाण शेतातील 10 गुंठा जमिनीवर लागवड केले होते. यासाठी 15 हजाराची रोपे आणली होती. रोप घेताना रोपवाटीकाचालक लिपने यांनी मिरची बहारात आल्यावर पोपटी रंगाची होईल, असे सागितले होते. पण प्रत्यक्षात मिरची बहारात आल्यावर काळी पडू लागली. तिला बाजारात कोणी घेत नसल्याने आता उपटून टाकण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यानुसार गेल्या दोन दिवसात त्यांनी हे झाड उपडून फेकले सुद्धा. मिरची लागवडीसाठी मोगल यांना एकूण 20 हजार रुपये खर्च आला होता. या मिरची पासून त्यांना 75 हजार रुपयांची कमाई झाली असती. असे एकूण एक लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, आशा पध्दतीने शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल तर संबंधित प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करावी आणि भविष्यात योग्य नियंत्रण करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- vis - Pbn_Farmer_chilli_tree_To_arise_visConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.