ETV Bharat / state

कोरोनाच्या संकटात विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करा; 'आम्ही नायगावकर'ची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

author img

By

Published : Jun 27, 2020, 7:05 PM IST

आम्ही नायगावकर संस्थेचे संस्थापक चेतन घरत आणि महिला कार्यकर्त्या श्रद्धा चेतन घरत यांनी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. नायगाव परिसरातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ व्हावे, अशी मागणी केली.

विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची मागणी
विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची मागणी

वसई(पालघर) - वसई-विरार शहर महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत असताना नायगाव परिसरातील शाळांनी मात्र विद्यार्थ्यांच्या पालकांकडे शुल्क भरणा करण्यासंदर्भात तगादा लावला आहे. याबाबत आम्ही नायगावकर संस्थेने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे शुल्क माफीची मागणी केली आहे.

आम्ही नायगावकर संस्थेचे संस्थापक चेतन घरत आणि महिला कार्यकर्त्या श्रद्धा चेतन घरत यांनी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. नायगाव परिसरातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ व्हावे, अशी मागणी केली. कोरोना व टाळेबंदीमुळे उद्भवलेल्या पालकांच्या गंभीर आर्थिक परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार सरकारने करावा, अशी त्यांनी विनंतीही केली. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी लवकरच राज्याच्या मंत्रिमंडळात पुनिर्णय घेवू, असे आश्वासन दिले आहे.

काम-धंदा ठप्प असल्याने सर्वसामान्य पालक विद्यार्थ्यांचे भरमसाठ शुल्क कसे भरणार आहेत? अशा प्रश्न संघटनेने उपस्थित केला आहे. पूर्व विभागातील पालकांची टाळेबंदीच्याकाळात आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. टाळेबंदीच्याकाळात रोजगार व उद्योगधंदे स्थिर होईपर्यंत शालेय विद्यार्थ्यांची शिक्षण व प्रवास फ्री माफ करावी, अशी नायगावकर संस्थेने मागणी केली आहे.

आगाऊ घेतलेल्या शुल्कामधून शाळांनी वर्षातील फीमध्ये सवलत द्यावी. अथवा सुलभ हप्त्यांमध्ये फी भरण्याची विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशीही संस्थेने मागणी केली आहे.

वसई(पालघर) - वसई-विरार शहर महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत असताना नायगाव परिसरातील शाळांनी मात्र विद्यार्थ्यांच्या पालकांकडे शुल्क भरणा करण्यासंदर्भात तगादा लावला आहे. याबाबत आम्ही नायगावकर संस्थेने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे शुल्क माफीची मागणी केली आहे.

आम्ही नायगावकर संस्थेचे संस्थापक चेतन घरत आणि महिला कार्यकर्त्या श्रद्धा चेतन घरत यांनी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. नायगाव परिसरातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ व्हावे, अशी मागणी केली. कोरोना व टाळेबंदीमुळे उद्भवलेल्या पालकांच्या गंभीर आर्थिक परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार सरकारने करावा, अशी त्यांनी विनंतीही केली. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी लवकरच राज्याच्या मंत्रिमंडळात पुनिर्णय घेवू, असे आश्वासन दिले आहे.

काम-धंदा ठप्प असल्याने सर्वसामान्य पालक विद्यार्थ्यांचे भरमसाठ शुल्क कसे भरणार आहेत? अशा प्रश्न संघटनेने उपस्थित केला आहे. पूर्व विभागातील पालकांची टाळेबंदीच्याकाळात आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. टाळेबंदीच्याकाळात रोजगार व उद्योगधंदे स्थिर होईपर्यंत शालेय विद्यार्थ्यांची शिक्षण व प्रवास फ्री माफ करावी, अशी नायगावकर संस्थेने मागणी केली आहे.

आगाऊ घेतलेल्या शुल्कामधून शाळांनी वर्षातील फीमध्ये सवलत द्यावी. अथवा सुलभ हप्त्यांमध्ये फी भरण्याची विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशीही संस्थेने मागणी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.