ETV Bharat / state

पालघर पर्यटन विकासाला चालना मिळावी; नागरिकांची मागणी - पालघर पर्यटन विकासाला चालना

पालघर जिल्ह्याला वसईपासून डहाणूपर्यंत मोठा समुद्र किनारा लाभला आहे. विरारमधील जीवदानी माता मंदिर, डहाणूतील महालक्ष्मी मंदिर अशी प्रसिद्ध मंदिरं येथे आहेत. कोहज किल्ला येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. तरीही या किल्ल्याचे संर्वधन आणि पर्यटन विकास मात्र रखडला आहे.

पालघर पर्यटन
पालघर पर्यटन
author img

By

Published : Dec 12, 2019, 10:37 AM IST

Updated : Dec 12, 2019, 12:33 PM IST

पालघर - पर्यटन म्हटले की हौसे-मौजचे ठिकाण, मग तो सागर किनारा असो किंवा उंच ठिकाणचा डोंगरमाथा. रोजच्या धकाधकीच्या जीवनातील शीन घालवण्यासाठी आपण पर्यटक म्हणून इतरत्र जात असतो. पर्यटन स्थळ हे त्या विशिष्ट परिसराची आणि जिल्ह्याची ओळख असते. त्यामुळेच वाडा तालुक्यातील पुरातन मंदिरांचा आणि किल्ले कोहजचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करावा, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.

पालघर पर्यटन विकासाला चालना मिळावी


पालघर जिल्ह्याला वसई ते डहाणूपर्यंत मोठा सागरी किनारा लाभला आहे. विरारमधील जीवदानी माता मंदीर, डहाणूतील महालक्ष्मी मंदिर अशी प्रसिद्ध मंदिरं येथे आहेत. कोहज किल्ला येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. तरीही या किल्ल्याचा संर्वधन आणि पर्यटन विकास मात्र रखडला आहे. येथे पर्यटन विकास झाला तर स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होतील.

हेही वाचा - B'Day Special : बारामतीकारांनी अनुभवलेले शरद पवार...

वाडा शहरात पुरातन पांडवकालीन मंदीर आहे. पुरातत्त्व खात्याने हे मंदीर संरक्षित स्मारक म्हणून घोषितही केलेले आहे. याशिवाय खंडेश्वर, नागदेवता, शनिदेवता, यम आणि यमी आणि पांडवकालीन दगडी चूल आहे. या पांडवकालीन पुरातन वास्तू काळाच्या ओघात भग्नावस्थेकडे जात आहेत. गारगाव धाकेदा या गावातही रामेश्वराचे पुरातन मंदिर आहे. तेथेही गावकऱ्यांच्या लोकवर्गणीतून वार्षिक उत्सव होत असतो, असे ग्रामस्थ सांगतात.


गुंज येथे डोंगरमाथ्यावर बाल्यावस्थेतील परशुरामाचे मंदिर आहे. याच परिसरात तलावाच्या ठिकाणी एका मंदिराचे भग्नावशेष पहायला मिळतात. परशुराम मंदिर आणि या ठिकाणी असलेले वज्रेश्वरी देवीचे मुळ उगमस्थानाचे स्थळ हे अविकसित आहे.


उत्तर-दक्षिण दिशेने वैतरणा नदीपात्रात तिलसेश्वराचे शिवलिंग आहे. या मंदिर परिसरात महाशिवरात्रीला मोठी गर्दी होत असते. या घाटावर दशक्रीया विधी केले जातात. घाटावर बसण्यासाठी आणि विधीसाठी मंडपाची व्यवस्था लोक देणगीतून केली आहे. पालघर जिल्ह्याला असा समृद्ध पुरातन वास्तूंचा वारसा लाभलेला आहे. या सर्व ठिकाणांचा पर्यटन स्थळे म्हणून विकास व्हावा, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.

पालघर - पर्यटन म्हटले की हौसे-मौजचे ठिकाण, मग तो सागर किनारा असो किंवा उंच ठिकाणचा डोंगरमाथा. रोजच्या धकाधकीच्या जीवनातील शीन घालवण्यासाठी आपण पर्यटक म्हणून इतरत्र जात असतो. पर्यटन स्थळ हे त्या विशिष्ट परिसराची आणि जिल्ह्याची ओळख असते. त्यामुळेच वाडा तालुक्यातील पुरातन मंदिरांचा आणि किल्ले कोहजचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करावा, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.

पालघर पर्यटन विकासाला चालना मिळावी


पालघर जिल्ह्याला वसई ते डहाणूपर्यंत मोठा सागरी किनारा लाभला आहे. विरारमधील जीवदानी माता मंदीर, डहाणूतील महालक्ष्मी मंदिर अशी प्रसिद्ध मंदिरं येथे आहेत. कोहज किल्ला येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. तरीही या किल्ल्याचा संर्वधन आणि पर्यटन विकास मात्र रखडला आहे. येथे पर्यटन विकास झाला तर स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होतील.

हेही वाचा - B'Day Special : बारामतीकारांनी अनुभवलेले शरद पवार...

वाडा शहरात पुरातन पांडवकालीन मंदीर आहे. पुरातत्त्व खात्याने हे मंदीर संरक्षित स्मारक म्हणून घोषितही केलेले आहे. याशिवाय खंडेश्वर, नागदेवता, शनिदेवता, यम आणि यमी आणि पांडवकालीन दगडी चूल आहे. या पांडवकालीन पुरातन वास्तू काळाच्या ओघात भग्नावस्थेकडे जात आहेत. गारगाव धाकेदा या गावातही रामेश्वराचे पुरातन मंदिर आहे. तेथेही गावकऱ्यांच्या लोकवर्गणीतून वार्षिक उत्सव होत असतो, असे ग्रामस्थ सांगतात.


गुंज येथे डोंगरमाथ्यावर बाल्यावस्थेतील परशुरामाचे मंदिर आहे. याच परिसरात तलावाच्या ठिकाणी एका मंदिराचे भग्नावशेष पहायला मिळतात. परशुराम मंदिर आणि या ठिकाणी असलेले वज्रेश्वरी देवीचे मुळ उगमस्थानाचे स्थळ हे अविकसित आहे.


उत्तर-दक्षिण दिशेने वैतरणा नदीपात्रात तिलसेश्वराचे शिवलिंग आहे. या मंदिर परिसरात महाशिवरात्रीला मोठी गर्दी होत असते. या घाटावर दशक्रीया विधी केले जातात. घाटावर बसण्यासाठी आणि विधीसाठी मंडपाची व्यवस्था लोक देणगीतून केली आहे. पालघर जिल्ह्याला असा समृद्ध पुरातन वास्तूंचा वारसा लाभलेला आहे. या सर्व ठिकाणांचा पर्यटन स्थळे म्हणून विकास व्हावा, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.

Intro: ग्रामीण भागातील गड कोटांचा आणि पुरातन मंदिरांचा पर्यटन विकास हवा  जनतेकडून मागणी पालघर (वाडा)संतोष पाटील पालघर जिल्ह्य़ातील वाडा तालुक्यातील पुरातन मंदिरांचा व किल्ले कोहजचा पर्यटन विकास करावा अशी मागणी जनतेकडून व गावकर्‍यांकडून केली जातेय. पर्यटन म्हटले की हौसे-मौजचे ठिकाण,मग तो सागर किनारा असो की, उंच ठिकाणचा डोंगरमाथा.रोजच्या धकाधकीतील जीवनातील क्षीण घालविण्यासाठी आपण एक दिवस पर्यटक म्हणून इतरञ जात असतो. असल्या या पर्यटनाखेरीज काही ठिकाणी धर्म,पंथ सांगणा-या वास्तूंना आणि पारंपारिक संस्कृतीचे प्रतिबिंब असणा-या ठिकाणी आपण पर्यटन करीत असतो. तेथे उमटलेल्या इतिहासाच्या पाऊलखुणा पहायला मिळतात.तर कुठे आपल्या इतिहासतिल शौर्य हे गड किल्ल्याच्या भ्रमंतीने पहात असतो.धर्म आणि संस्कृती ,पारंपरिकतचे दर्शन लेणीतून पहायला मिळत असते. अशा या धार्मिक स्थळांचा आणि गड कोटांचा पर्यटन विकास झालेला दिसत नसल्याची ओरड जनतेकडून होत असते. ब-याच कालावधीत ग्रामीण भागातील पुरातन मंदीरं गड किल्ल्यांचा आणि सागरी किना-यावरील निसर्गदत्त भागाचा विकास झालेला नाही. अजुनही विकसनशील म्हणून तो भाग दृष्टीक्षेपात पडतोय हे बोलणे आजघडीला तरी वावगे ठरणार नाही.  पालघर जिल्ह्याला वसई ते डहाणू भागापर्यंत मोठा सागरी किनारा लाभला आहे.विरार मधील जीवदानी माता मंदीर,डहाणूतील महालक्ष्मी मंदिर अशी प्रसिद्ध मंदिरे आहेत. वाडा शहरातच पुरातन पांडवकाळीन मंदीर आहे.पुरातत्त्व खात्याचे मंदीर असल्याने ते संरक्षित स्मारक म्हणून घोषित आहे. या ठिकाणी खंडेश्र्वराचे मंदीर आहे. शिवलिंग असलेले मंदीर परिसरात नागदेवता, शनिदेवता,यम आणि यमी,आणि पांडवकालीन दगडी चूल आहे.हे सर्व पांडव कालीन असुन येथील पुरातन वास्तू शिल्प भग्नावस्थेत पहायला मिळतात. उत्तर-दक्षिण दिशेने वैतरणा नदीपात्रात वसलले तिलसेश्वरचे शिवलिंग मंदिर आहे.या मंदिर परिसरात महाशिवरात्र  यात्रेत मोठी गर्दी होत असते.तसेच दशक्रीया विधी यानदी घाटावर केले जातात.या घाटावरील बसण्याची व्यवस्था व मंडपाची व्यवस्था लोक देणगीतून केली आहे.यापरिसरातील विकास व्हावा अशी मागणी भक्तगण व जनता करीत आहे. ग्रामीण भागातील पर्यटन विकास व्हायला हवा जेणेकरून पर्यटनस्थळ विकासाबरोबर परिसरातील रोजगार वृधीला चालना मिळेल. वाडा तालुक्यातील  ग्रामीण भागातील कोहज किल्ला येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते.दरम्यानच्या काळात  या किल्लाच्या संर्वधन आणि पर्यटनविकासाचा विकास मात्र रखडला.आणि  किल्ले कोहज पर्यटनविकासाची मोहीम खुंटल्याने रोजगाराची उपलब्ध होणारी संधी रखडली आहे.या किल्ल्याचा पर्यटन विकास व्हावा अशी मागणी दामोदर पाटील यांची आहे.  गारगांव धाकेदा येथील रामेश्वराचे मंदीर पुरातन आहे.तेथेही यात्रा असोत की जत्रा येथे विकासाला हातभार गावक-यांच्या लोकवर्गणीतून होत असतो. असे ग्रामस्थ सुधीर भोईर सांगतात. उत्तर-दक्षिण दिशेने वैतरणा नदीपात्रात वसलले तिलसेश्वरचे शिवलिंग मंदिर आहे.या मंदिर परिसरात महाशिवरात्र  यात्रेत मोठी गर्दी होत असते.तसेच दशक्रीया विधी यानदी घाटावर केले जातात.या घाटावरील बसण्याची व्यवस्था व मंडपाची व्यवस्था लोक देणगीतून केली आहे.यापरिसरातील विकास व्हावा अशी मागणी भक्तगण व जनता करीत आहे. ग्रामीण भागातील पर्यटन विकास व्हायला हवा जेणेकरून पर्यटनस्थळ विकासाबरोबर परिसरातील रोजगार वृधीला चालना मिळेल. Visual pakege story.  


Body:byte & visual


Conclusion:ok
Last Updated : Dec 12, 2019, 12:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.