ETV Bharat / state

अर्नाळा समुद्रकिनारी लाटांचा मारा; पालघरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू

author img

By

Published : May 17, 2021, 9:18 AM IST

अर्नाळा समुद्र किनारी काल रात्रीपासून वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात वेगवान वारे वाहायला सुरुवात झाली आहे. तर पालघर किनारपट्टीवर याचा फटका बसायला सुरुवात झाली आहे.

पालघरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू
पालघरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू

विरार /अर्नाळा - अरबी समुद्रात तयार झालेल्या तौक्ते चक्री वादळाचा फटका पालघर किनारपट्टी भागालाही बसत आहे. रविवारी रात्रीपासून वसई-विरारसह संपूर्ण जिह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. समुद्र किनारपट्टी भागात प्रती ६० किमी वेगाने वारे वाहत असून या वादळीवाऱ्यामुळे अनेक झाडांची पडझड झाली आहे.

रविवारी रात्रीपासून वादळी वाऱ्यासह पाऊस
रविवारी रात्रीपासून वादळी वाऱ्यासह पाऊस
विरारच्या अर्नाळा परिसरात रविवारी वादळीवाऱ्यामुळे समुद्र चांगलाच खवळला होता. वादळाच्या भीतीने मध्यरात्री ग्रामस्थांनी घराबाहेर धाव घेतली होती. नेमकी अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर वादळी वाऱ्याची काय परिस्थिती होती याबाबत अधिक माहिती घेणार आहोत आमचे विपुल पाटील यांकडून.
तौक्ते चक्रीवादळ हे सध्या रायगड मुंबई किनारपट्टी भागात दक्षिणेकडे सुमारे १५० किलोमीटर आतमध्ये घोंगावत आहे. यावादळामुळे कोकण किनारपट्टीच्या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्याच प्रमाणे पालघर जिल्ह्यातील किनारपट्टी भागासही या वादळाचा फटका बसला असून झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत.

विरार /अर्नाळा - अरबी समुद्रात तयार झालेल्या तौक्ते चक्री वादळाचा फटका पालघर किनारपट्टी भागालाही बसत आहे. रविवारी रात्रीपासून वसई-विरारसह संपूर्ण जिह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. समुद्र किनारपट्टी भागात प्रती ६० किमी वेगाने वारे वाहत असून या वादळीवाऱ्यामुळे अनेक झाडांची पडझड झाली आहे.

रविवारी रात्रीपासून वादळी वाऱ्यासह पाऊस
रविवारी रात्रीपासून वादळी वाऱ्यासह पाऊस
विरारच्या अर्नाळा परिसरात रविवारी वादळीवाऱ्यामुळे समुद्र चांगलाच खवळला होता. वादळाच्या भीतीने मध्यरात्री ग्रामस्थांनी घराबाहेर धाव घेतली होती. नेमकी अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर वादळी वाऱ्याची काय परिस्थिती होती याबाबत अधिक माहिती घेणार आहोत आमचे विपुल पाटील यांकडून.
तौक्ते चक्रीवादळ हे सध्या रायगड मुंबई किनारपट्टी भागात दक्षिणेकडे सुमारे १५० किलोमीटर आतमध्ये घोंगावत आहे. यावादळामुळे कोकण किनारपट्टीच्या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्याच प्रमाणे पालघर जिल्ह्यातील किनारपट्टी भागासही या वादळाचा फटका बसला असून झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.