ETV Bharat / state

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, पालघरमधील शेतकऱ्यांची मागणी

author img

By

Published : Dec 3, 2019, 11:35 PM IST

राज्यातील ठाकरे सरकारकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण होतील. वेळ पडली तर बुलेट ट्रेन सारखा प्रकल्प रद्द करावा आणि शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Demand for loan waiver of farmers
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा

पालघर - शिवसेना पक्षप्रमुखांनी आमचं सरकार आले की, सातबारा कोरा करू, अशी घोषणा निवडणूक पूर्वी केली होती. आता महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. सात बारा कोरा करून लवकरच शेतकऱ्यांबाबत मोठा निर्णय घेणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनी लवकरात-लवकर सातबारा कोरा करावा, अशी मागणी केली आहे.

पालघरमधील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी

हेही वाचा - भाजप नेत्यांनी देशातील संघटना वाचवण्यासाठी प्रयत्न करावे - उदय सामंत

राज्यातील ठाकरे सरकारकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण होतील. वेळ पडली तर बुलेट ट्रेन सारखा प्रकल्प रद्द करावा आणि शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने तत्काळ शेतकऱ्यांना मदत करावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

हेही वाचा - उद्धव ठाकरे पर्यावरणाबाबत संवेदनशील, त्यामुळे पुण्याच्या टेकड्या वाचतील - नीलम गोऱ्हे

भाजीपाला असो की भात पीक अडत्यांकडून किंवा व्यापारी वर्गाकडून कमी दराने खरेदी करण्यात येते. त्यामुळे शेतकरीवर्गाचा उत्पादन खर्चही निघत नाही. त्यात सरकार तुटपुंजी नुकसान भरपाई जाहीर करते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे ठाकरे सरकारने सरसकट सात-बारा कोरा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पालघर - शिवसेना पक्षप्रमुखांनी आमचं सरकार आले की, सातबारा कोरा करू, अशी घोषणा निवडणूक पूर्वी केली होती. आता महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. सात बारा कोरा करून लवकरच शेतकऱ्यांबाबत मोठा निर्णय घेणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनी लवकरात-लवकर सातबारा कोरा करावा, अशी मागणी केली आहे.

पालघरमधील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी

हेही वाचा - भाजप नेत्यांनी देशातील संघटना वाचवण्यासाठी प्रयत्न करावे - उदय सामंत

राज्यातील ठाकरे सरकारकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण होतील. वेळ पडली तर बुलेट ट्रेन सारखा प्रकल्प रद्द करावा आणि शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने तत्काळ शेतकऱ्यांना मदत करावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

हेही वाचा - उद्धव ठाकरे पर्यावरणाबाबत संवेदनशील, त्यामुळे पुण्याच्या टेकड्या वाचतील - नीलम गोऱ्हे

भाजीपाला असो की भात पीक अडत्यांकडून किंवा व्यापारी वर्गाकडून कमी दराने खरेदी करण्यात येते. त्यामुळे शेतकरीवर्गाचा उत्पादन खर्चही निघत नाही. त्यात सरकार तुटपुंजी नुकसान भरपाई जाहीर करते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे ठाकरे सरकारने सरसकट सात-बारा कोरा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Intro:सातबारा कोरा करा पण शेतकऱ्याला उभारी द्या -शेतकरी वर्गाची मागणी सातबारा को-यावर शेतक-यांचा उतारा काय हवे शेतकरीवर्गाला पालघर (वाडा)-संतोष पाटील  शेतकरीवर्गाला कर्जमुक्ती वा कर्जमाफीसाठी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या प्रयत्नात आहेत.शिवसेना सत्तेत आल्यावर सातबारा कोरा करण्याच्या दृष्टीने पावले उचलत असताना शेतकरीवर्गाला ही  सातबारा कोरा करण्याबरोबर शेतकऱ्याला उभारणीसाठी सरकारने काही उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरीवर्गाकडून होऊ लागली आहे. राज्यातील शेतकरीवर्गाचा सातबारा कोरा करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून होत आहेत.या अनुषंगाने पालघर जिल्ह्य़ातील शेतकरीवर्गही सातबारा कोरा करण्याच्या या निर्णयाच्या प्रतिक्षेत आहेत.या निर्णयाने आपल्या सातबारा वरील बोजा कमी होईल पण पुढे काय?  त्यासाठी सरकारने शेतकरीवर्गाला अर्थिक संकटातून उभारी घेण्यासाठी  आणि नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी काही उपाययोजना सरकारने करायला हव्यात. दरम्यानच्या काळात महापुराने व अवकाळीपावसाने शेतकरीवर्गाचे मोठ्या प्रमाणात भातशेतीचे नुकसान केले. नुकसानभरपाईचे पंचनामेही झाले आहेत. आता शेतकरीवर्ग  मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.यात सरकारकडून सातबारा कोरा करण्याच्या वल्गना होत आहे.  यावर शेतकरीवर्ग एकदा सातबारा वरील  कर्ज कमी होईल पण पुढे शेतकरीवर्गाला पुन्हा कर्ज काढून शेती करावी लागणार आहे. यात शेतकरी पिकविलेल्या शेती मालाला हमी भाव नाही.त्यामुळे उत्पादन खर्चही परवडत नाहीत.त्याचबरोबर उत्पादित शेतमालाला तालुका स्तरावर बाजार समित्या नाही.ठराविक शहरी भागाचे तालुके वगळता कृषी उत्पन्न  उपलब्ध  नाही.भाजीपाला असो की भातपिकाला अडत्यांकडून किंवा व्यापारीवर्गाकडून कमी दराने खरेदी करण्यात येत असते.त्याने शेतकरीवर्गाला उत्पादन खर्चही निघत नाही. असे राजु पाटील प्रतिक्रीया यावर नोंदवितात तर महागडे बियाणे ,मजुरीखर्च आणि खतांचे दर वाढलेले यात तुटपुंजी नुकसानभरपाई जाहीर केली जाते. असे नाणे गावातील शेतकरी तुकाराम पडवले हे असे यावर मत नोंदवितात. अवकाळी पावसाची झळ ही 2 नोव्हेंबर रोजी राञी 8 च्या सुमारास   पालघर जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना पुन्हा  अनुभवायला मिळाली. त्यामुळे असाच पुन्हा अवकाळी पाऊस सुरू राहीला तर रब्बी हंगामातील पिके घेण्याचीही शेतकरीवर्गाला भीती वाटू लागली आहे.   नुकसानग्रस्त  शेतकरीवर्गाला उभारी देण्यासाठी काही  उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत शेतकरीवर्ग करीत आहेत.


Body:1)सातबारा 2) महापूर 3)शेतकरी राजू पाटिल 4)तुकराम पडवले शेतकरी


Conclusion:ओके
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.