ETV Bharat / state

ग्रामसेवकाने तब्बल दीड कोटींची ढापली वाळू; भोगावती नदी परिसरातील प्रकार - GIRIDHAR EDAKE SAND ROBBERY

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एका गावातील ग्रामसेवकाच्या (वडिलांचे नावे जमीन) शेतामध्ये भोगावती नदीमधील अंदाजे दीड कोटी रुपये किंमतीची वाळू सापडली आहे.

sand robbery
ग्रामसेवकाने तब्बल दीड कोटींची ढापली वाळू; भोगावती नदी परिसरातील प्रकार
author img

By

Published : Feb 2, 2020, 6:21 AM IST

उस्मानाबाद - शहराला वळसा घालून राघूचीवाडी, चिलवडी, झरेगाव या गावांमधून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या भोगावती नदीतील वाळू ग्रामसेवकाने उपसली आहे. यासंदर्भात प्रशासनाकडे कुठलीही माहिती नसल्याने प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर आला आहे. ग्रामसेवकाने वाळू उपसा करुन त्याचा साठा स्वतःच्या शेतात करुन ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

ग्रामसेवकाने तब्बल दीड कोटींची ढापली वाळू; भोगावती नदी परिसरातील प्रकार

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एका गावातील ग्रामसेवकाच्या (वडिलांचे नावे जमीन) शेतामध्ये भोगावती नदीमधील अंदाजे दीड कोटी रुपये किंमतीची वाळू सापडली आहे. गेल्या दहा दिवसांपासून या भोगावती नदीतील वाळू उपसा सुरू होता मात्र, याची कल्पना महसूल (गौण खनिज) अधिकार्‍यांना नव्हती. वाळू उपश्यावर निर्बंध असताना देखील कोट्यवधी रुपयांची वाळू काढली आहे. परंडा तालुक्यातील तहसीलदार अनिल हेळकर यांच्यावरती केलेल्या वाळूमाफियांनी हल्ल्यासंदर्भात महसूल कर्मचाऱ्यांनी आंदोलन करुन जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून सोडले होते. मात्र, शासकीय कर्मचारी आता वाळूमाफीया झाले असल्याचे पाहायला मिळत आहे.

भोगावती नदीमधील वाळू उपसण्यासाठी याच परिसरात प्रचंड वृक्षतोडी केली असून, पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसानही केले आहे वृक्षतोडीबाबत वनविभागाचे परवानगी घेतली नसल्याचे समजते आहे.

जेसीबीच्या साह्याने केला वाळू उपसा -

सलग पाच दिवस रात्रंदिवस वाळू उपसा सुरू असल्याची माहिती स्थानिकांनी पत्रकारांना सांगितली आहे. यासाठी जेसीबी व चार ट्रॅक्टरचा वापर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

उस्मानाबाद - शहराला वळसा घालून राघूचीवाडी, चिलवडी, झरेगाव या गावांमधून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या भोगावती नदीतील वाळू ग्रामसेवकाने उपसली आहे. यासंदर्भात प्रशासनाकडे कुठलीही माहिती नसल्याने प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर आला आहे. ग्रामसेवकाने वाळू उपसा करुन त्याचा साठा स्वतःच्या शेतात करुन ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

ग्रामसेवकाने तब्बल दीड कोटींची ढापली वाळू; भोगावती नदी परिसरातील प्रकार

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एका गावातील ग्रामसेवकाच्या (वडिलांचे नावे जमीन) शेतामध्ये भोगावती नदीमधील अंदाजे दीड कोटी रुपये किंमतीची वाळू सापडली आहे. गेल्या दहा दिवसांपासून या भोगावती नदीतील वाळू उपसा सुरू होता मात्र, याची कल्पना महसूल (गौण खनिज) अधिकार्‍यांना नव्हती. वाळू उपश्यावर निर्बंध असताना देखील कोट्यवधी रुपयांची वाळू काढली आहे. परंडा तालुक्यातील तहसीलदार अनिल हेळकर यांच्यावरती केलेल्या वाळूमाफियांनी हल्ल्यासंदर्भात महसूल कर्मचाऱ्यांनी आंदोलन करुन जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून सोडले होते. मात्र, शासकीय कर्मचारी आता वाळूमाफीया झाले असल्याचे पाहायला मिळत आहे.

भोगावती नदीमधील वाळू उपसण्यासाठी याच परिसरात प्रचंड वृक्षतोडी केली असून, पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसानही केले आहे वृक्षतोडीबाबत वनविभागाचे परवानगी घेतली नसल्याचे समजते आहे.

जेसीबीच्या साह्याने केला वाळू उपसा -

सलग पाच दिवस रात्रंदिवस वाळू उपसा सुरू असल्याची माहिती स्थानिकांनी पत्रकारांना सांगितली आहे. यासाठी जेसीबी व चार ट्रॅक्टरचा वापर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Intro:भाग 1


ग्रामसेवकाने भोगावती नदी मधली ढापली वाळू; किंमत अंदाजे दीड कोटी....



उस्मानाबाद - शहराला वळसा घालून राघूचीवाडी, चिलवडी, झरेगाव या गावांमधून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या भोगावती नदीतील वाळू ग्रामसेवकाने उपसली आहे. यासंदर्भात प्रशासनाकडे कुठलीही माहिती नसल्याने प्रशासनाचा हलगर्जी पणा समोर आला आहे ग्रामसेवक गिरीधर रंगनाथ एडके यांनी वाळू उपसा करून त्याचा साठा स्वतःच्या शेतात करून ठेवला आहे झरेगाव या गावातील रहिवासी असलेले शासकीय नोकरदार गिरीधर रंगनाथ एडके या ग्रामसेवकाने भोगावती नदी मधील अंदाजे दीड कोटी रुपयांची वाळूउपसा करून स्वतःच्या शेतात गट नंबर 17 मध्ये साठा करून ठेवला आहे गेल्या दहा दिवसांपासून या भोगावती नदीतील वाळू उपसा सुरू होता मात्र याची कल्पना बिलकुल महसूल (गौण खनिज) अधिकार्‍यांच्या कानावरती आलेले नाही तसेच ग्रामसेवक गिरिधर एडके यांनी वाळू उपशाबाबतनिर्बंध असताना देखील कोट्यवधी रुपयांची वाळू काढली आहे. परंडा तालुक्यातील तहसीलदार तहसीलदार अनिल हेळकर यांच्या वरती केलेल्या वाळूमाफियांनी हल्ल्यासंदर्भात महसूल कर्मचाऱ्यांनी आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून सोडले होते मात्र शासकीय कर्मचारी आता वाळूमाफिया झाले असल्याचे पाहायला मिळते आहे या भोगावती नदी मधील वाळू उपसण्यासाठी याच परिसरात प्रचंड वृक्षतोडी केली असून पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसानही केले आहे वृक्षतोडीबाबत वनविभागाचे परवानगी घेतली नसल्याचे समजते आहे



जेसीबीच्या साह्याने केला वाळू उपसा


सलग पाच दिवस हा वाळूउपसा सुरू असल्याचे झरेगाव येथील काही नागरिक नाव न सांगण्याच्या अटीवर सांगतात हा वाळू उपसा रात्र आणि दिवस सुरू होता या साठी जेसीबी व चार ट्रॅक्टरचा वापर करण्यात आल्याचे सांगितले जात आहेBody:हे एडिट करून पाठवत आहे

Conclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.