ETV Bharat / state

अपघातग्रस्त स्कॉर्पिओला लागलेल्या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू; संतप्त जमावाचा पोलिसांवर हल्ला

उमरगा तालुक्यातील तलमोड गावाजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर समोरुन येणाऱ्या गाडीला चुकवत स्कॉर्पिओ गाडी पलटी झाली. तेव्हा गाडीने अचानक पेट घेतला. या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला असून २ जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

author img

By

Published : Apr 21, 2019, 11:37 PM IST

अपघातग्रस्त स्कॉर्पिओला लागलेल्या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू

उस्मानाबाद - उमरगा तालुक्यातील तलमोड गावाजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर समोरुन येणाऱ्या गाडीला चुकवत स्कॉर्पिओ गाडी पलटी झाली. तेव्हा गाडीने अचानक पेट घेतला. या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला असून २ जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. अग्निशामक दल घटनास्थळी उशिरा पोहचल्याने संतप्त नागरिकांनी पोलिसांवर हल्ला चढवत अग्निशामक दलाची गाडी धक्का देऊन पलटी केली.

स्कॉर्पिओला लागलेली आग


याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमोल जोमदे हा पुणे येथे राहतो. तो मामाला भेटण्यासाठी त्याच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये बसून इतर तिघे जण उमरग्याहून तलमोड या गावी निघाला होता. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कराळी गावाजवळ समोरून वाहन आले. तेव्हा अपघात होऊ नये यासाठी अमोलने अचानक ब्रेक लावल्याने गाडी पलटी झाली. पलटी झालेल्या गाडीने अचानक पेट घेतला.
यात अमोल जोमदे (वय २३), ऋषीकेश मोरे (वय २२) या दोघांचा जागीच जळून मृत्यू झाला, तर प्रदीप राजेंद्र मुगले (वय १९), संस्कार तळभोगे (वय १०) हे जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, संस्कार पाटील याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.


अपघात झाल्यानंतर पोलीस काही वेळात घटनास्थळी हजर झाले. यावेळी मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता. मात्र, अग्निशमन दलाची गाडी लवकर का येत नाही असा सवाल करत संतप्त जमावाने पोलिसांवरच हल्ला चढवला. त्यानंतर उशिरा आलेल्या अग्निशामक दलाच्या गाडीला नाल्यात ढकलून दिले. जमाव संतप्त झाल्याचे पाहून अधिकची पोलीस यंत्रणा मागवण्यात आली. तेव्हा जमावाला घटनास्थळापासून हटवण्यास पोलिसांना यश आले.

उस्मानाबाद - उमरगा तालुक्यातील तलमोड गावाजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर समोरुन येणाऱ्या गाडीला चुकवत स्कॉर्पिओ गाडी पलटी झाली. तेव्हा गाडीने अचानक पेट घेतला. या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला असून २ जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. अग्निशामक दल घटनास्थळी उशिरा पोहचल्याने संतप्त नागरिकांनी पोलिसांवर हल्ला चढवत अग्निशामक दलाची गाडी धक्का देऊन पलटी केली.

स्कॉर्पिओला लागलेली आग


याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमोल जोमदे हा पुणे येथे राहतो. तो मामाला भेटण्यासाठी त्याच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये बसून इतर तिघे जण उमरग्याहून तलमोड या गावी निघाला होता. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कराळी गावाजवळ समोरून वाहन आले. तेव्हा अपघात होऊ नये यासाठी अमोलने अचानक ब्रेक लावल्याने गाडी पलटी झाली. पलटी झालेल्या गाडीने अचानक पेट घेतला.
यात अमोल जोमदे (वय २३), ऋषीकेश मोरे (वय २२) या दोघांचा जागीच जळून मृत्यू झाला, तर प्रदीप राजेंद्र मुगले (वय १९), संस्कार तळभोगे (वय १०) हे जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, संस्कार पाटील याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.


अपघात झाल्यानंतर पोलीस काही वेळात घटनास्थळी हजर झाले. यावेळी मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता. मात्र, अग्निशमन दलाची गाडी लवकर का येत नाही असा सवाल करत संतप्त जमावाने पोलिसांवरच हल्ला चढवला. त्यानंतर उशिरा आलेल्या अग्निशामक दलाच्या गाडीला नाल्यात ढकलून दिले. जमाव संतप्त झाल्याचे पाहून अधिकची पोलीस यंत्रणा मागवण्यात आली. तेव्हा जमावाला घटनास्थळापासून हटवण्यास पोलिसांना यश आले.

Intro:अपघात झालेल्या गाडीने घेतला पेट दोघांचा जागीच होरपळून मृत्यू


उस्मानाबाद उमरगा तालुक्यातील तलमोड गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर चालत्या स्कॉरपिओ गाडीने अचानक पेट घेतला अपघात झल्यानंतर गाडीने पेट घेतल्याने दोघांचा जागेवर जळून मृत्यू झाला तर दोन जखमी असून एकाची प्रकृती गंभीर आहे. यावेळी संतप्त जमावाने पोलिसावर हल्ला करीत उशीरा आलेल्या अग्निशमन दलाच्या गाडीला धक्का देत उलटी केली .
याबाबत माहिती अशी कि ,अमोल जोमदे हा तलमोड येथील भाचा असुन तो पुणे येथे राहतो . त्यांच्या स्कॉरपिओ या गाडीमध्ये बसून इतर तिघेजण उमरग्याहुन तलमोड कडे गावी जात होते. राष्ट्रीय महामार्गावर कराळी गावानजीक समोरून वाहन आले.आपली गाडी वाचविण्यासाठी अचानक ब्रेक लावल्याने स्कॉरपिओ गाडीने दोन तीन पलट्या मारल्या. यावेळी गाडीने अचानक पेट घेतला . यात अमोल जोमदे, वय २३ ,ऋषीकेश मोरे वय २२ दोघेही राहणार तलमोड हे जागीच जळून मृत्यू पावले तर . प्रदीप राजेंद्र मुगले १९ संस्कार तळभोगे १० तलमोड हे जखमी झाले . त्यांना तात्काळ उपचारासाठी येथील उपजिल्हारुग्णालयात दाखल केले आहे . पैकी संस्कार पाटील याची प्रकृती गंभीर आहे .
अपघात घडल्यावर पोलिस काही वेळात घटनास्थळी हजर झाले . यावेळी मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता . मात्र अग्निशमन दलाची गाडी लवकर का येत नाही म्हनत ,संतप्त जमावाने पोलिसावरच हल्ला चढविला . व उशीरा आलेल्या उमरगाच्या अग्निशमन च्या गाडीला धक्क देत नाल्यात ढकलून दिले . परिणामी पेट घेतलेले वाहन विजविता आले नाही.पोलिसांची जादा कुमक आल्यावर,पोलिसांनी जमावास घटनास्थळपासून दुर केले.Body:यातच vis जोडत आहेConclusion:कैलास चौधरी
ई.टिव्ही भारत उस्मानाबाद

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.