ETV Bharat / state

मनमाडमध्ये घरातील टाकीतूनच पाण्याची चोरी; तक्रार घेण्यास पोलिसांचा नकार, असे दिले कारण - ३०० लिटर

घरफोडी, जबरी चोरी, दरोडा, चेन स्नॅचिंग, अशा घटना मनमाड शहराला काही नवीन नाहीत. मात्र, काही दिवसांपासून मनमाड शहर आणि परिसरात पाण्याच्या चोरीची घटना घडली आहे.

मनमाडमध्ये घरातील टाकीतूनच पाण्याची चोरी
author img

By

Published : May 14, 2019, 12:07 PM IST

नाशिक - घरफोडी, जबरी चोरी, दरोडा, चेन स्नॅचिंग, अशा घटना मनमाड शहराला काही नवीन नाहीत. मात्र, काही दिवसांपासून मनमाड शहर आणि परिसरात पाण्याच्या चोरीची घटना घडली आहे. मागील दोन दिवसांत घरातील पाण्याच्या टाकीतून चक्क ३०० लिटर पाण्याची चोरी झाल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

मनमाडमध्ये घरातील टाकीतूनच पाण्याची चोरी

विलास आहेर, सामाजिक कार्यकर्ते (श्रीवस्ती नगर, मनमाड) यांच्या राहत्या घराच्या छतावरील ५०० लिटर पाण्याच्या टाकीतून सुमारे ३०० लिटर पाणी चोरीला गेले आहे. याबाबत आहेर यांनी शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी आहेर यांचा तक्रार अर्ज स्वीकारला नाही. त्यामुळे हे पाणी कोणी चोरले, याचे गूढ निर्माण झाले आहे.

मनमाडमध्ये सध्या महिन्यातून एक दिवस पाणीपुरवठा होतो. त्यामुळे घराच्या छतावर, घराच्या बाहेर ओट्यावर, तसेच घरात जिथे जागा मिळेल तिथे घरातील भांड्यात पाणी साठा केला जातो. तब्बल महिनाभर पुरेल इतका पाणीसाठा प्रत्येकजण आपल्या घरामध्ये करताना दिसून येते. पालिकेच्या नळाद्वारे होणारा पाणीपुरवठ्याशिवाय मनमाडकरांना सध्या दुसरा कोणताच पर्याय नाही, अशा गंभीर परिस्थितीमध्ये साठवलेले पाणी चोरी घटना घडत आहेत.

मनमाडमध्ये घरातील टाकीतूनच पाण्याची चोरी
मनमाडमध्ये घरातील टाकीतूनच पाण्याची चोरी

पाणी चोरीची पोलिसांत तक्रार देण्यासाठी आहिरे गेले असताना त्यांना पाणी चोरीची तक्रार देऊ नका, पाहिजे तर तुमच्याकडे टँकर पाठवून देतो, असा सल्ला पोलिसांनी दिला आहे. परिस्थितीजन्य पुरावा नसल्याने पाणी चोरीचा पंचनामा करता येणार नाही. पाण्याला रंग, वास, किंमत ठरवता येत नाही, किती पाणी होते व कसे चोरीला गेले हे कसे ओळखायचे त्यासाठी साक्षीदार कोणाला घ्यायचे? असे अनेक प्रश्न पोलिसांसमोर उभे राहिले म्हणून पोलिसांनीदेखील याबाबत काढता पाय घेतला. त्यामुळे आता मनमाडकरांना घरातील मौल्यवान वस्तूंचे संरक्षण करण्याबरोबरच साठवून ठेवलेल्या पाण्याचेदेखील रक्षण करावे लागणार आहे.

नाशिक - घरफोडी, जबरी चोरी, दरोडा, चेन स्नॅचिंग, अशा घटना मनमाड शहराला काही नवीन नाहीत. मात्र, काही दिवसांपासून मनमाड शहर आणि परिसरात पाण्याच्या चोरीची घटना घडली आहे. मागील दोन दिवसांत घरातील पाण्याच्या टाकीतून चक्क ३०० लिटर पाण्याची चोरी झाल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

मनमाडमध्ये घरातील टाकीतूनच पाण्याची चोरी

विलास आहेर, सामाजिक कार्यकर्ते (श्रीवस्ती नगर, मनमाड) यांच्या राहत्या घराच्या छतावरील ५०० लिटर पाण्याच्या टाकीतून सुमारे ३०० लिटर पाणी चोरीला गेले आहे. याबाबत आहेर यांनी शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी आहेर यांचा तक्रार अर्ज स्वीकारला नाही. त्यामुळे हे पाणी कोणी चोरले, याचे गूढ निर्माण झाले आहे.

मनमाडमध्ये सध्या महिन्यातून एक दिवस पाणीपुरवठा होतो. त्यामुळे घराच्या छतावर, घराच्या बाहेर ओट्यावर, तसेच घरात जिथे जागा मिळेल तिथे घरातील भांड्यात पाणी साठा केला जातो. तब्बल महिनाभर पुरेल इतका पाणीसाठा प्रत्येकजण आपल्या घरामध्ये करताना दिसून येते. पालिकेच्या नळाद्वारे होणारा पाणीपुरवठ्याशिवाय मनमाडकरांना सध्या दुसरा कोणताच पर्याय नाही, अशा गंभीर परिस्थितीमध्ये साठवलेले पाणी चोरी घटना घडत आहेत.

मनमाडमध्ये घरातील टाकीतूनच पाण्याची चोरी
मनमाडमध्ये घरातील टाकीतूनच पाण्याची चोरी

पाणी चोरीची पोलिसांत तक्रार देण्यासाठी आहिरे गेले असताना त्यांना पाणी चोरीची तक्रार देऊ नका, पाहिजे तर तुमच्याकडे टँकर पाठवून देतो, असा सल्ला पोलिसांनी दिला आहे. परिस्थितीजन्य पुरावा नसल्याने पाणी चोरीचा पंचनामा करता येणार नाही. पाण्याला रंग, वास, किंमत ठरवता येत नाही, किती पाणी होते व कसे चोरीला गेले हे कसे ओळखायचे त्यासाठी साक्षीदार कोणाला घ्यायचे? असे अनेक प्रश्न पोलिसांसमोर उभे राहिले म्हणून पोलिसांनीदेखील याबाबत काढता पाय घेतला. त्यामुळे आता मनमाडकरांना घरातील मौल्यवान वस्तूंचे संरक्षण करण्याबरोबरच साठवून ठेवलेल्या पाण्याचेदेखील रक्षण करावे लागणार आहे.

Intro:मनमाड मध्ये घराच्या टाकीतून 300 लिटर पाण्याची चोरी..मनमाड पोलीसांनी तक्रार अर्ज नाकारला


Body:
घरफोडी ,जबरी चोरी,दरोडा,चेंन स्मचिंग या घटना मनमाड शहराला नवीन नाहीत,मात्र काही दिवसांन पासुन मनमाड शहर आणि परिसरात सातत्याने चोरीच्या घटना घडतात आहेत..सोने दागिन्यांची चोरी आणि हजारो रक्कम चोरीला जाते ह्या मुळे मनमाडकरांन मध्ये भीतीचे वातावरण आहे..अशात गेल्या दोन दिवसात चक्क 300 लिटर पाण्याची चोरी झाल्याची घटना मनमाड मध्ये घडल्याने घरोघरी पाण्यासाठा करून ठेवणाऱ्या नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे...

मनमाड येथील श्रीवस्ती नगर मध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते विलास आहे यांच्या राहत्या घराच्या छतावर असलेल्या पाचशे लिटर पाण्याच्या टाकीतून सुमारे 300 लिटर पाणी चोरीला गेले आहे... याबाबत आहेर यांनी शहर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली,मात्र पोलिसांनी आहेर यांचा पाणी चोरीचा तक्रार अर्ज स्वीकारला नाही मात्र पोलिसांनी आहेर यांनी केलेल्या पाणी चोरीचा तक्रार अर्ज स्वीकारला नाही, त्यामुळे ही पाणी चोरी कोणी केली याचे गूढ निर्माण झालेय...
मनमाड मध्ये सध्या महिन्यातून एक दिवस पाणीपुरवठा होतो, त्यामुळे घराच्या छतावर, घराच्या बाहेर ओट्यावर,तसेच घरात त जिथे जागा मिळेल तिथे घरातील भांड्यात पाणी साठा केला जातो..तब्बल महिनाभर पुरेल इतका पाणीसाठा प्रत्येकजण आपल्या घरामध्ये करताना दिसून येतो, पालिकेच्या नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा शिवाय सध्या दुसरा कोणताच पर्याय मनमाडकरांना नाहीये,तब्बल 25 ते 30 दिवसांनंतर मनमाड शहराला पाणीपुरवठा केला जातो अशा गंभीर परिस्थिती साठवलेले पाणी चोरी गेल्यामुळे आहेर यांच्या समोर संकट उभं राहिलंय...पाणी चोरीची तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आहिरे गेले असतात पाणी चोरीची तक्रार देऊ नका वाटेल तर तुमच्याकडे टँकर पाठवून देतो असा सल्ला पोलीसांनी दिल्याचं कळतंय..

परिस्थितीजन्य पुरावा नसल्याने पाणी चोरीचा पंचनामा करता येणार नाही,पाण्याला रंग, वास ,किंमत ठरवता येत नाही, किती पाणी होते व कसे चोरीला गेले हे कसे ओळखायचे त्यासाठी साक्षीदार कोणाला घ्यायचं असे अनेक प्रश्न पोलिसांसमोर उभे राहिले म्हणून पोलिसांनी देखील याबाबत काढता पाय घेतला. आता मनमाडकरांना घरातील मौल्यवान वस्तूचं संरक्षण करण्याबरोबरच साठवून ठेवलेल्या पाण्याचं देखील रक्षण करण्याची जबाबदारी आली आहे....
बाईट
विलास आहिरे तक्रारदार
टीप फीड ftp
nsk pani chori byte.
nsk pani chori viu 1
nsk pani chori viu 2
nsk pani chori viu 3
nsk pani chori viu 4
nsk pani chori viu 5
nsk pani chori viu 6
nsk pani chori viu 7
nsk pani chori viu 8
nsk pani chori viu 9






Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.