ETV Bharat / state

नाशिकमध्ये रिपाइं गट नाराज ; युतीविरोधात स्वतंत्र उमेदवार देण्याची आठवलेंकडे मागणी - rpi

जिल्हा समितीच्या बैठकीत नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातून स्वतंत्र उमेदवार देण्याचा ठराव संमत करण्यात आल्याची माहिती रिपाई जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी दिली.

रिपाइं जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे
author img

By

Published : Apr 3, 2019, 2:25 AM IST

नाशिक - महायुतीत समावेश असून सुद्धा स्थानिक पातळीवर भाजप शिवसेनेकडून विचारले जात नसल्याने नाशिकमधील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाने नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हा समितीच्या बैठकीत नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातून स्वतंत्र उमेदवार देण्याचा ठराव संमत करण्यात आल्याची माहिती रिपाइंजिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी दिली.

रिपाइंजिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे


महायुतीच्या बैठकांना बोलवले जात नाही, तसेच कार्यक्रमांमध्ये रिपाई नेत्यांचे फोटोही लावले जात नसल्याने कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. जिल्ह्यातील स्थितीबाबतचा अहवाल ४ एप्रिलला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना देण्यात येणार असल्याचे लोंढे यांनी सांगितले.


आरपीआय आठवले गट केंद्रात आणि राज्यात महायुतीत सहभागी आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यातील आरपीआय आठवले गटाला विश्वासात घेतले जात नाही, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. नाशिक आणि दिंडोरीमधील लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेत आठवले गटाला डावलले जात असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. काही दिवसांपुर्वी नाशिकच्या एका हॉटेलमध्ये महायुतीच्या पदाधिकाऱयांची बैठक झाली. या बैठकीचे निमंत्रण सुद्धा भाजप आणि शिवसेनेने दिले नाही, तसेच युतीच्या मेळाव्यात रामदास आठवले यांचा फोटो सुद्धा लावण्यात आला नसून हेतूपुरस्कार आठवले गटाला डावलले जात असल्याचे आरपीआय आठवले गटाचे मत झाले आहे.


नाशिक आणि दिंडोरीमधून रिपाइने स्वतंत्र उमेदवार द्यावा, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे करणार असल्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे. या बैठकीचा अहवाल ४ एप्रिलला मुंबईत होणाऱ्या राज्यस्तरीय आरपीआयच्या बैठकीत ठेवला जाणार असल्याचे लोंढे यांनी स्पष्ट केले आहे.


नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघात रिपाइंची ताकद मोठी असून नाशिकमधून मराठा समाजाचा उमेदवार द्यावा, अशी मागणी आठवले यांच्याकडे करणार असल्याचे ही लोंढे म्हणले. भविष्यात जर रिपाइंने नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातून उमेदवार उभे केले तर युतींच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढणार हे नक्की.

नाशिक - महायुतीत समावेश असून सुद्धा स्थानिक पातळीवर भाजप शिवसेनेकडून विचारले जात नसल्याने नाशिकमधील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाने नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हा समितीच्या बैठकीत नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातून स्वतंत्र उमेदवार देण्याचा ठराव संमत करण्यात आल्याची माहिती रिपाइंजिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी दिली.

रिपाइंजिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे


महायुतीच्या बैठकांना बोलवले जात नाही, तसेच कार्यक्रमांमध्ये रिपाई नेत्यांचे फोटोही लावले जात नसल्याने कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. जिल्ह्यातील स्थितीबाबतचा अहवाल ४ एप्रिलला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना देण्यात येणार असल्याचे लोंढे यांनी सांगितले.


आरपीआय आठवले गट केंद्रात आणि राज्यात महायुतीत सहभागी आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यातील आरपीआय आठवले गटाला विश्वासात घेतले जात नाही, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. नाशिक आणि दिंडोरीमधील लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेत आठवले गटाला डावलले जात असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. काही दिवसांपुर्वी नाशिकच्या एका हॉटेलमध्ये महायुतीच्या पदाधिकाऱयांची बैठक झाली. या बैठकीचे निमंत्रण सुद्धा भाजप आणि शिवसेनेने दिले नाही, तसेच युतीच्या मेळाव्यात रामदास आठवले यांचा फोटो सुद्धा लावण्यात आला नसून हेतूपुरस्कार आठवले गटाला डावलले जात असल्याचे आरपीआय आठवले गटाचे मत झाले आहे.


नाशिक आणि दिंडोरीमधून रिपाइने स्वतंत्र उमेदवार द्यावा, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे करणार असल्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे. या बैठकीचा अहवाल ४ एप्रिलला मुंबईत होणाऱ्या राज्यस्तरीय आरपीआयच्या बैठकीत ठेवला जाणार असल्याचे लोंढे यांनी स्पष्ट केले आहे.


नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघात रिपाइंची ताकद मोठी असून नाशिकमधून मराठा समाजाचा उमेदवार द्यावा, अशी मागणी आठवले यांच्याकडे करणार असल्याचे ही लोंढे म्हणले. भविष्यात जर रिपाइंने नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातून उमेदवार उभे केले तर युतींच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढणार हे नक्की.

Intro:नाशिक - आठवलेंना का विसरले


Body:
"आठवलेंना का विसरले"
नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातुन रिपाइं ने उमेदवार दयावा...शिवसेना- भाजप कडून डावलले जात असल्याने रिपाइं आठवले गट नाराज...

महायुतीत समावेश असून सुद्धा स्थानिक पातळीवर भाजप शिवसेना कडून विचारले जात नसल्याने नाशिकमधील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या रिपाइं आठवले गटाने नाराजी व्यक्त केली आहे,नाशिक जिल्हा समितीच्या झालेल्या बैठकीत नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातुन स्वतंत्र उमेदवार देण्याचा ठराव संमत करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी दिली,महायुतीच्या बैठकांना बोलवले जात नाही,तसेंच रिपाइं नेत्यांचे फोटो ही लावले जात नसक्याने कार्यकर्ते संतप्त आहेत..जिल्ह्यातील स्थिती बाबत चा अहवाल 4 एप्रिल रोजी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना देण्यात येणार असल्याचे लोंढे यांनी सांगितलं .
आरपीआय आठवले गट केंद्रात आणि राज्यत महायुतीत सहभागी आहे,मात्र नाशिक जिल्ह्यातील आरपीआय आठवले गटाला विश्वासा घेतले जात नाही असं म्हणणं कार्यकर्तेच म्हणणं असल्याचं आरपीआय आठवले गटा चे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांचं म्हणणं आहे,नाशिक आणि दिंडोरी मधील लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेत आठवले गटाला डावलले जात असल्याची भावना कार्यकर्ते मध्ये आहे,काही दिवसांन पूर्वी नाशिकच्या एका हॉटेल मध्ये महायुती च्या पदाधिकारयांची बैठक झाली ह्यात साधं निमंत्रण सुद्धा भाजप आणि शिवसेने दिल नाही,तसेच युतीच्या मेळाव्यात रामदास आठवले यांचा फोटो सुद्धा लावण्यात आला नसून हेतूपुरस्कार आठवले गटाला डावलले जात असल्याचे आरपीआय आठवले गटाच्या बैठकीत कार्यकर्तेच म्हणणं झालं असून, नाशिक आणि दिंडोरी मधून रिपाइं ने स्वतंत्र उमेदवार द्यावा अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कडे करणार असल्याचं आरपीआय च्या बैठकीत निश्चित करण्यात आलं आहे..ह्या बैठकीचा अहवाल 4 एप्रिल रोजी मुंबई मध्ये होणाऱ्या आरपीआय च्या बैठकीत ठेवला जाणार असल्याचे लोंढे यांनी स्पष्ट केलं आहे...
नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघात रिपाइं ची ताकद मोठी असून नाशिक मधून मराठा समाजाचा उमेदवार द्यावा अशी मागणी आठवले यांच्या कडे करणार असल्याचे ही लोंढे म्हणले।।
भविष्यात जर रिपाइं ने नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातून उमेदवार उभे केले तर युतींच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढणार हे नक्की..
बाईट
प्रकाश लोंढे जिल्हाअध्यक्ष रिपाइं..



Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.