ETV Bharat / state

नाशिक : प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे बेवारस मृतदेहांची अवहेलना; मृतदेहांच्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त

खरेतर शवविच्छेदन झाल्यानंतर ३ दिवसानंतर बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार करणे ही पोलीस आणि महापालिकेची जबाबदरी आहे. बेवारस मृतदेहांबाबत पोलिसांनी अहवाल दिल्यानंतर महानगरपालिका बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार करते.

author img

By

Published : May 18, 2019, 11:36 PM IST

Updated : May 19, 2019, 12:01 AM IST

मृतदेहांच्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त

नाशिक - जिल्हा रुग्णालयाच्या आवारात असलेल्या शवागरातील वातानुकूलित यंत्र बंद असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याचा सर्वाधिक त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. जिल्हा रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार महानगरपालिका आणि पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे बेवारस मृतदेह अनेक महिने पडून आहेत.

मृत्यूनंतर कोणत्याही परिस्थितीत मृत शरीराची हेळसांड होऊ दिली जात नाही. मात्र, नाशिक जिल्हा रुग्णालय याला अपवाद ठरत आहे. जिल्हा रुग्णालयात असलेल्या शवागारातील ६ वातानुकूलित यंत्रे बंद असल्याने मृतदेह कुजून त्यांची परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. या भागातून जातांना नागरिकांना नाकावर रुमाल लाऊन जावे लागते. या शवागारात आज मितीला ५४ कोल्ड स्टोरेज-असून यातील ६ बंद अवस्थेत आहे. यात सध्या ३९ मृतदेह ठेवण्यात आले आहेत. राज्य सरकारने या शवागाराच्या देखभालीची जबाबदारी सिंधुरी कंपनीला दिली आहे. मात्र, वेळोवेळी पत्र व्यवहार करूनसुद्धा दुरुस्ती होत नसल्याचे जिल्हा रुग्णालय प्रशासनचे म्हणणे आहे.

महापालिका आणि पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे बेवारस मृतदेहांची अवहेलना

खरेतर शवविच्छेदन झाल्यानंतर ३ दिवसानंतर बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार करणे ही पोलीस आणि महापालिकेची जबाबदारी आहे. बेवारस मृतदेहांबाबत पोलिसांनी अहवाल दिल्यानंतर महानगरपालिका बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार करते. मात्र, या दोन्ही विभागात ताळमेळ नसल्याने महिनो-महिने इथे मृतदेह पडून आहेत.

कोल्ड स्टोरेजमध्ये मृतदेह कुजत नाही हा समज चुकीचा असून फक्त मृतदेह कुजण्याच्या प्रक्रियेचा कालावधी वाढला जात असल्याचे जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पोलीस आणि महानगरपालिकेने आपली जबाबदारी समजून या बेवारस मृतदेहांवर लवकरात लवकर अंत्यसंस्कार करून मृतदेहांची होणारी हेळसांड थांबवावी, अशी मागणी होत आहे.

नाशिक - जिल्हा रुग्णालयाच्या आवारात असलेल्या शवागरातील वातानुकूलित यंत्र बंद असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याचा सर्वाधिक त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. जिल्हा रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार महानगरपालिका आणि पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे बेवारस मृतदेह अनेक महिने पडून आहेत.

मृत्यूनंतर कोणत्याही परिस्थितीत मृत शरीराची हेळसांड होऊ दिली जात नाही. मात्र, नाशिक जिल्हा रुग्णालय याला अपवाद ठरत आहे. जिल्हा रुग्णालयात असलेल्या शवागारातील ६ वातानुकूलित यंत्रे बंद असल्याने मृतदेह कुजून त्यांची परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. या भागातून जातांना नागरिकांना नाकावर रुमाल लाऊन जावे लागते. या शवागारात आज मितीला ५४ कोल्ड स्टोरेज-असून यातील ६ बंद अवस्थेत आहे. यात सध्या ३९ मृतदेह ठेवण्यात आले आहेत. राज्य सरकारने या शवागाराच्या देखभालीची जबाबदारी सिंधुरी कंपनीला दिली आहे. मात्र, वेळोवेळी पत्र व्यवहार करूनसुद्धा दुरुस्ती होत नसल्याचे जिल्हा रुग्णालय प्रशासनचे म्हणणे आहे.

महापालिका आणि पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे बेवारस मृतदेहांची अवहेलना

खरेतर शवविच्छेदन झाल्यानंतर ३ दिवसानंतर बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार करणे ही पोलीस आणि महापालिकेची जबाबदारी आहे. बेवारस मृतदेहांबाबत पोलिसांनी अहवाल दिल्यानंतर महानगरपालिका बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार करते. मात्र, या दोन्ही विभागात ताळमेळ नसल्याने महिनो-महिने इथे मृतदेह पडून आहेत.

कोल्ड स्टोरेजमध्ये मृतदेह कुजत नाही हा समज चुकीचा असून फक्त मृतदेह कुजण्याच्या प्रक्रियेचा कालावधी वाढला जात असल्याचे जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पोलीस आणि महानगरपालिकेने आपली जबाबदारी समजून या बेवारस मृतदेहांवर लवकरात लवकर अंत्यसंस्कार करून मृतदेहांची होणारी हेळसांड थांबवावी, अशी मागणी होत आहे.

Intro:महानगर पालिका आणि पोलिसांच्या हलगर्जी पणामुळे बेवारस मृतदेहांची अवेहलणा,शवागारातील वातानुकूलित यंत्र बंद असल्याने मृतदेहांच्या दुर्गंधी मुळे नागरिक त्रस्त...








Body:नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या आवारात असलेल्या शवागरातील वातानुकूलित यंत्र बंद असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.. ह्याचा सर्वाधिक त्रास सर्वसामान्य नागरिकांना होतोय..जिल्हा रुग्णालयाच्या म्हणण्या नुसार महानगर पालिका आणि पोलिसांच्या हलगर्जी पणामुळे बेवारस मृतदेह महिनो महिने पडून आहेत...

असं म्हटलं जातं की मृत्यू झाल्या नंतर तरी शरीराची हेळसांड होऊ नये..मात्र नाशिक जिल्हा रुग्णालय ह्याला अपवाद ठरत आहे.जिल्हा रुग्णालयात असलेल्या शवागारातील 6 वातानुकूलित यंत्र बंद असल्याने मृतदेह कुजून त्यांची परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलीय.. ह्या भागातून जातांना नागरिकांना नाकावर रुमाल लाऊन जावं लागतं,ह्या शवागारात आज मितीला 54 कोल्ड स्टोरेज-असून ह्यातील 6 बंद अवस्थेत आहे..ह्यात सध्या 39 मृतदेह ठेवण्यात आली आहे..राज्य सरकारने ह्या शवागाराच्या देखभालीची जबाबदारी सिंधुरी कंपनीला दिली आहे..मात्र वेळोवेळी पत्र व्यवहार करून सुद्धा दुरुस्ती होतं नसल्याचं जिल्हा रुग्णालय प्रशासनचं म्हणणं आहे..


खरं तर शवविच्छेदन झाल्या नंतर 3 दिवसात नंतर बेवारस मृतदेहावर अंतीमसंस्कार करणे ही पोलीस आणि महानगर पालिकेची जबाबदरी आहे,बेवारस मृतदेहा बाबत पोलिसांनी रिपोर्ट दिल्या नंतर महानगरपालिका बेवारस मृतदेहावर अंतिम संस्कार करत करते.मात्र ह्या दोन्ही विभागात ताळमेळ नसल्याने महिनो महिने इथं मृतदेह पडून आहेत.

कोल्ड स्टोरेज मध्ये मृतदेह कुजत हा समज चुकीचा असून..फक्त मृतदेह कुजण्याच्या प्रक्रियेचा कालावधी वाढला जात असल्याचं जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे..पोलीस आणि महानगर पालिकेने आपली जबाबदारी समजून ह्या बेवारस मृतदेहांवर लवकरात लवकर अंतिमसंस्कार करून होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी होतेय...
बाईट
1 नागरिक बाईट
2 डॉ निखिल सौंदाणे जिल्हा शल्य चिकित्सक
टीप फीड ftp
nsk dead body cold storage viu 1
nsk dead body cold storage viu 2
nsk dead body cold storage byte


Conclusion:
Last Updated : May 19, 2019, 12:01 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.