ETV Bharat / state

मालेगावमध्ये 600 हून अधिक जणांचा मृत्यू..! माजी आमदाराची धक्कादायक माहिती

author img

By

Published : May 6, 2020, 11:24 AM IST

Updated : May 6, 2020, 11:31 AM IST

सध्या कोरोनाचा कहर सर्वत्र पसरला आहे. यामुळे देशात टाळेबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांना उपचारासाठी रुग्णालयात जाता आले नाही. वेळेवर उपचार न मिळाल्याने मालेगात 600 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप मालेगावचे माजी आमदार असिफ शेख यांनी केला आहे.

माजी आमदार असिफ शेख
माजी आमदार असिफ शेख

मालेगाव (नाशिक) - लॉकडाऊनच्या उपचार मिळाले नाही म्हणून इतर आजारांमूळे 600 हुन अधfक रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप माजी आमदार असिफ शेख यांनी केला आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात कोरोनाचे थैमान सुरू असून आतापर्यंत एकट्या मालेगावात 331 जणांना कोरोनाची लागण झाली असून 13 जणांचा यात मृत्यू झाला आहे. मात्र, दुसरीकडे लॉकडाऊन काळात विविध आजारांमुळे वेळेवर उपचार मिळाले नाही म्हणून 600 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप माजी आमदार असिफ शेख यांनी म्हटलं आहे.

बोलताना माजी आमदार असिफ शेख

या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहून माहिती कळवली आहे. माजी आमदार शेख यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, आमच्या माहिती प्रमाणे लॉकडाऊन काळात मालेगावात कोरोनाबाधित रुग्णांव्यतिरिक्त 600 जणांचा मृत्यू हा हृदय विकार, मधुमेह, उच्च रक्तदाबमुळे झाले आहेत. या रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले नाही म्हणून त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप शेख यांनी केला आहे. मालेगाव शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री छगन भुजबळ आणि कृषीमंत्री दादा भुसे हे विविध उपाययोजना राबवत आहेत. मात्र, कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारांबाबत प्रशासनाने कोणतेही नियोजन नसल्याने मालेगावात परिस्थिती गंभीर झाली आहे. यामुळे संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी माजी आमदार असिफ शेख यांनी केली आहे.

मालेगाव येथील बडा कब्रस्थानात 2019 साली जानेवारीमहिन्यात 192, फेब्रुवारी 172, मार्च 201 तर एप्रिल महिन्या 140, असे एकूण 705 मृत्यूंची नोंद झाली होती. तुलनेत 2020 साली जानेवारी महिन्यात 148, फेब्रुवारी 166, मार्च 205, एप्रिल महिन्यात 459 एकूण 987 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

हेही वाचा - ठेकेदारने पगार न दिल्याने मध्यप्रदेशच्या कामगारांची पायपीट

मालेगाव (नाशिक) - लॉकडाऊनच्या उपचार मिळाले नाही म्हणून इतर आजारांमूळे 600 हुन अधfक रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप माजी आमदार असिफ शेख यांनी केला आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात कोरोनाचे थैमान सुरू असून आतापर्यंत एकट्या मालेगावात 331 जणांना कोरोनाची लागण झाली असून 13 जणांचा यात मृत्यू झाला आहे. मात्र, दुसरीकडे लॉकडाऊन काळात विविध आजारांमुळे वेळेवर उपचार मिळाले नाही म्हणून 600 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप माजी आमदार असिफ शेख यांनी म्हटलं आहे.

बोलताना माजी आमदार असिफ शेख

या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहून माहिती कळवली आहे. माजी आमदार शेख यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, आमच्या माहिती प्रमाणे लॉकडाऊन काळात मालेगावात कोरोनाबाधित रुग्णांव्यतिरिक्त 600 जणांचा मृत्यू हा हृदय विकार, मधुमेह, उच्च रक्तदाबमुळे झाले आहेत. या रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले नाही म्हणून त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप शेख यांनी केला आहे. मालेगाव शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री छगन भुजबळ आणि कृषीमंत्री दादा भुसे हे विविध उपाययोजना राबवत आहेत. मात्र, कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारांबाबत प्रशासनाने कोणतेही नियोजन नसल्याने मालेगावात परिस्थिती गंभीर झाली आहे. यामुळे संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी माजी आमदार असिफ शेख यांनी केली आहे.

मालेगाव येथील बडा कब्रस्थानात 2019 साली जानेवारीमहिन्यात 192, फेब्रुवारी 172, मार्च 201 तर एप्रिल महिन्या 140, असे एकूण 705 मृत्यूंची नोंद झाली होती. तुलनेत 2020 साली जानेवारी महिन्यात 148, फेब्रुवारी 166, मार्च 205, एप्रिल महिन्यात 459 एकूण 987 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

हेही वाचा - ठेकेदारने पगार न दिल्याने मध्यप्रदेशच्या कामगारांची पायपीट

Last Updated : May 6, 2020, 11:31 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.